शिधा पत्रिकाधारकांना ई—केवायसी आवश्यक

 



अकोला द‍ि. 12 : धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शिधापत्रिका धारकांची 100 टक्के ई केवायसी करण्याबाबत सुचित केले आहे. 


त्यानुसार अकोला जिल्हामध्ये एकुण 12 लक्ष 94 हजार 608 लाभार्थी असून त्यांची तालुकानिहाय ई केवायसी झालेले व न झालेले यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. 



अकोला - एकूण लाभार्थी संख्या - 2 लक्ष 29 हजार 262, ई केवायसी झालेली एकूण लाभार्थी - 1 लक्ष 53 हजार 909, ईकेवायसी टक्केवारी - 67.13, ई केवायसी न केलेली लाभार्थी संख्या - 75 हजार 353, अकोला शहर -एकूण लाभार्थी संख्या - 1 लक्ष 83 हजार 371, ई केवायसी झालेली एकूण लाभार्थी -1 लक्ष 35 हजार 759, ईकेवायसी टक्केवारी - 74.03, ई केवायसी न केलेली लाभार्थी संख्या - 47 हजार 612, अकोट - एकूण लाभार्थी संख्या - 1 लक्ष 68 हजार 845, ई केवायसी झालेली एकूण लाभार्थी - 1 लक्ष 33 हजार 108, ईकेवायसी टक्केवारी - 78.83, ई केवायसी न केलेली लाभार्थी संख्या - 35 हजार 737, बाळापूर- एकूण लाभार्थी संख्या - 1 लक्ष 69 हजार 217, ई केवायसी झालेली एकूण लाभार्थी -  1 लक्ष 25 हजार 615, ईकेवायसी टक्केवारी - 74.23, ई केवायसी झालेली एकूण लाभार्थी - 43 हजार 602, बाशीटाकळी - एकूण लाभार्थी संख्या - 1 लक्ष 42 हजार 444, ई केवायसी झालेली एकूण लाभार्थी -  1 लक्ष 05 हजार 710, ईकेवायसी टक्केवारी - 74.21, ई केवायसी झालेली एकूण लाभार्थी - 36 हजार 734, मुर्तीजापुर - एकूण लाभार्थी संख्या - 1 लक्ष 42 हजार 053, ई केवायसी झालेली एकूण लाभार्थी -  1 लक्ष 03 हजार 592, ईकेवायसी टक्केवारी -  72.92, ई केवायसी न केलेली लाभार्थी संख्या -  38 हजार 461,  पातुर - एकूण लाभार्थी संख्या - 1 लक्ष 24 हजार 801, ई केवायसी झालेली एकूण लाभार्थी -  94                   हजार 507, ईकेवायसी टक्केवारी - 75.72, ई केवायसी न केलेली लाभार्थी संख्या -  30 हजार 294, तेल्हारा - एकूण लाभार्थी संख्या - 1 लक्ष 34 हजार 615, ई केवायसी झालेली एकूण लाभार्थी - 1 लक्ष 02 हजार 587, ईकेवायसी टक्केवारी - 76.20, ई केवायसी न केलेली लाभार्थी संख्या - 32 हजार 028



अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 12 लक्ष 94 हजार 608 लाभार्थी असून त्यापैकी 9 लक्ष 54 हजार 787 इतक्या लाभार्थ्यांनी त्यांची ईकेवायसी पुर्ण केली आहे. अद्यापही 3 लक्ष 39 हजार 821 पात्र लाभार्थींनी ईकेवायसी केलेली नाही. त्यांनी त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांची ईकेवायसी पुर्ण करून घ्यावी. शासनाने ईकेवायसी करण्याकरीता दि. 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ दिली असून यापुढे मुदतवाढ मिळणार नाही. ईकेवायसी न केल्यास आपल्या धान्याचा लाभ बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबधीत लाभार्थी यांची राहील. तरी सर्व पात्र लाभार्थींनी आपल्या कुटुंबातील सर्व लाभार्थीची ईकेवायसी पूर्ण करण्याकरीता आपण धान्य घेत असलेल्या किंवा नजिकच्या रास्तभाव दुकानामध्ये जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी. तसेच ईकेवायसी करण्याकरीता शासनाचे मेरा ईकेवायसी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याद्वारे देखील ईकेवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 


 आपल्या शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थीची ईकेवायसी दि. 30 एप्रिल 2025 पर्यंत पुर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा