शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे-पालकमंत्री ना. बच्चू कडू

  अकोला, दि.२९(जिमाका)-  अवकाळी पाऊस व गारपीटीने ज्या शेतकऱ्यांचे तसेच अन्य नागरिकांचे नुकसान झाले असेल तर त्यांनी अजिबात खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला आहे.

आज अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले की,  जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे  व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा तात्काळ करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. यापूर्वीही अशा नुकसानीत राज्यात सर्वाधिक व सर्वात आधी मदत मिळवून  दिलासा देण्याचे काम अकोला जिल्ह्यात झाले होते. यावेळीही यंत्रणा आपल्या बांधावर येऊन पंचनामा करुन अहवाल सादर करेल. त्यानुसार शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत स्वतःला एकटे समजू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात ना. कडू यांनी शेतकऱ्यांना व आपत्तीग्रस्तांना दिलासा दिला आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ