नदीनाल्याच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

 

अकोला,दि.21 (जिमाका) : भारतीय हवामान विभागाच्या संदेशानुसार आजपासून दि. 25 जुलैपर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता लक्षात घेता नदी नाल्यांच्या काठावरील गावांना व पुराचा प्रभाव असलेल्या वस्त्यांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.

पावसाळ्यात वीजेपासुन बचावासाठी झाडाखाली उभे राहू नये. नदी, नाले, तलाव, बंधारे यात मोठ्या संख्येने जलसाठा जमा होत आहे. अशा स्थितीत पोहण्याचे धाडस नागरिकांनी करु नये. रस्ता व पुलावरुन पाणी वाहत असल्यास ओलांडू नये. योग्य दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ