पीक स्पर्धेत शेतक-यांनी सहभाग घेण्याचे आवाहन


        अकोला, दि. 21 : पीकस्पर्धा योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. 

पीक स्पर्धेत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य तूर, मूग, उडीद, मक्का. ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, सुर्यफुल व भूईमूग या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी उडीद व मूग या पिकांसाठी 31 जुलै व इतर पिकांसाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. 

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ