पीक स्पर्धेत शेतक-यांनी सहभाग घेण्याचे आवाहन
अकोला, दि. 21 : पीकस्पर्धा
योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
पीक स्पर्धेत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य तूर, मूग, उडीद,
मक्का. ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, सुर्यफुल व भूईमूग या प्रमुख पिकांचा
समावेश आहे.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी उडीद व मूग या पिकांसाठी 31 जुलै व इतर
पिकांसाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज नजिकच्या
तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि
पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक
कृषी अधिका-यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा