पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप जल व्यवस्थापनाचा जीवनशैलीत अंगीकार आवश्यक – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

इमेज
  अकोला, दि. ३० : जल व्यवस्थापनाची कृती केवळ पंधरवड्यापुरती मर्यादित न राहता जल व्यवस्थापनाचा जीवनशैलीत अंगीकार व्हावा, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश पुंडकर यांनी आज येथे केले. जलसंपदा विभागातर्फे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप कार्यक्रम नियोजन भवनात झाला, त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार, अकोला सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता योगेश दाभाडे, कार्यकारी अभियंता अमोल वसुलकर आदी उपस्थित होते.  पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले, इस्त्रायल तसेच काही आखाती देशांमध्ये कमी पावसातही उत्कृष्ट नियोजनातून समृध्दी निर्माण करण्यात आली. त्या तुलनेत आपल्याकडे पाण्याची मोठी उपलब्धता आहे. त्याचा उचित वापर झाला पाहिजे. हजारो वर्षांच्या पावसाने जमिनीत निर्माण झालेल्या पाण्याच्या साठ्याचा उपसा हानीकारक ठरेल. त्यामुळे पाण्याचा उचित वापर ही सवय व्हावी. कालव्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पाणी शेवटच्या बिंदुपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे स्वच्छतेत सातत्य हवे.पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत पाणी वापर संस्थांमध्ये जागरूकता...

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन

इमेज
  अकोला, दि. ३० : राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शन घेतले व महाआरती केली.  यावेळी आमदार संजय खोडके, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. नाईक यांचे कलश रथयात्रेनिमित्त जिल्ह्यात आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी पातूर येथे भेट दिली. पातूर येथे शहाबाबू दर्गा व सिदाजी महाराज मंदिर येथून पवित्र मातीचे पालखीमधून रथयात्रेत आगमन झाले. त्यानंतर राज्यमंत्री नाईक यांनी अकोला येथे श्री राजराजेश्वर मंदिराला भेट दिली व दर्शन घेतले.   यावेळी राज्यमंत्री श्री. नाईक यांच्या हस्ते महाआरती झाली. असदगड येथील माती, पवित्र नद्यांचे पाणी जलकलशात विसर्जित आले. ०००

जिल्हाधिका-यांकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी

इमेज
जिल्हाधिका-यांकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी अकोला, दि. २९ : खरीपपूर्व तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज शहरातील काही कृषी केंद्रांना भेट देऊन तपासणी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव, महेंद्र साल्के आदी उपस्थित होते. शहरातील शहा एजन्सीज, पाटणी ट्रेडर्स, मिलींद एजन्सी आदी दुकानांना जिल्हाधिका-यांनी भेट देऊन उपलब्ध खते, बियाणे आदी साठा यांचा आढावा घेतला. दर्शनी भागात फलक लावणे, अभिलेख अद्ययावत करणे, साठा नोंदवही अद्ययावत करणे, तसेच उन्हाचे प्रमाण जास्त असल्यास शेतकरी बांधवांसाठी सावलीची व पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. येत्या खरीप हंगामात आपण स्वत: रँडमली जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्राची तपासणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ०००

महाराष्ट्र दिनाचा मुख्य सोहळा शास्त्री क्रीडांगणावर

महाराष्ट्र दिनाचा मुख्य सोहळा शास्त्री क्रीडांगणावर अकोला दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिवसानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा गुरूवार, दि. ०१ मे रोजी लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे सकाळी 8 वाजता होईल. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश सुनीता पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.15 वाजता जिल्‍हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण, राष्ट्रगीत, राज्यगीत, पथसंचलन आदी कार्यक्रम होतील. 00000

महाराष्ट्र दिनाचा मुख्य सोहळा शास्त्री क्रीडांगणावर

  अकोला दि. 29 : महाराष्ट्र राज्या च्या ६६ व्या स्थापना दिव सानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा गु रू वार , दि . ०१ मे रोजी लालबहा दू र शास्त्री क्रीडांगण येथे सकाळी 8 वाजता होईल. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश सु नी ता पांडुरंग फुंडकर यां च्या हस्ते मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.15 वाजता जिल्‍हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण, राष्ट्रगीत, राज्यगीत, पथसंचलन आदी कार्यक्रम होतील. 00000

जात पडताळणी अर्जातील त्रुटीपूर्ततेसाठी शिबिर

  जात पडताळणी अर्जातील त्रुटीपूर्ततेसाठी शिबिर   अकोला, दि.२८ :   जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात पडताळणी अर्जांतील त्रुटींची पूर्तता करून घेण्यासाठी विशेष त्रुटी पूर्तता शिबिर दि. २ मे रोजी स. १० वा. समितीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.   २०२४-२५ या आर्थिक वर्षात इयत्ता ११ वी, १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी व व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ इच्छित असलेले विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केले, त्यात त्रुटी आढळुन आल्या. त्याची माहिती संबंधितांना ई-मेल व एसएमएसद्वारे कळवण्यात आली आहे. अद्यापही उमेदवाराकडून त्रुटींची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे त्रुटी पूर्तता करण्यासाठी शिबिर घेण्यात येणार आहे.   जात वैधता प्रमाणपत्राअभावी कोणाचेही शैक्षणिक नुकसान होऊ नये व पुढील शिक्षणापासुन वंचित राहू नये त्याकरिता विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी हे शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत ही ज्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा विद्यार्थी- वि...

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती पारदर्शक सेवेचे उत्तरदायित्व जाणून कार्य करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती पारदर्शक सेवेचे उत्तरदायित्व जाणून कार्य करा -         जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. २८ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि शासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा कायदा आहे. त्यानुसार प्रत्येक यंत्रणेने नागरिकांना वेळेत आणि पारदर्शकपणे सेवा देण्याचे आपले उत्तरदायित्व जाणून कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.   महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन कार्यक्रम नियोजनभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, निखिल खेमनार, अनिरुद्ध बक्षी, प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंह पवार यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ता, नागरिक यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेत लोकसेवा पुरवणे आणि सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हे कायद्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्र...

जिल्हाधिका-यांकडून विविध बाबींचा आढावा एप्रिलअखेरपर्यंत कामे पूर्ण करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  अकोला, दि. २५ : जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी सजग राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात. या अनुषंगाने सुरू असलेली किंवा प्रस्तावित कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले. जिल्ह्यातील पेयजल उपलब्धता, खरीप तयारी व इतर बाबींचा आढावा जिल्हाधिका-यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, पुढील काळात जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई उद्भवू नये यादृष्टीने आवश्यक उपाय  करावेत. शहरातील जलवाहिनी, जलकुंभ व्यवस्थेत आवश्यक सुधारणा व्हाव्यात. दुरूस्ती करताना पुरवठा बंद झाल्यास नागरिकांना त्रास होतो. ते टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रत्येक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात योग्य लक्ष द्यावे व तसे अचूक नियोजन करावे.   ते पुढे म्हणाले की, खरीपासाठी शेतकरी बांधवांना बियाणे, खते आदी निविष्ठा मिळण्यासाठी पुर...

अद्ययावत ‘रोड सेफ्टी व्हिजन व्हेईकल’ जिल्ह्याच्या सेवेत दाखल परिवहन कार्यालयाचा उपक्रम मदतकार्याबरोबरच लोकशिक्षणासाठी ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहन उपयुक्त - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  अद्ययावत ‘रोड सेफ्टी व्हिजन व्हेईकल’ जिल्ह्याच्या सेवेत दाखल परिवहन कार्यालयाचा उपक्रम मदतकार्याबरोबरच लोकशिक्षणासाठी ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहन उपयुक्त -         जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. २५ : जिल्ह्यात अपघातप्रवण स्थळांची संख्या शून्यावर आणणे आवश्यक आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणतानाच प्रभावी लोकशिक्षण देणे गरजेचे आहे. बचावकार्याबरोबरच लोकशिक्षणासाठी ‘रोड सेफ्टी व्हिजन व्हेईकल’ उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केला.   प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ‘रोड सेफ्टी व्हिजन’ हे अत्याधुनिक सुविधा असलेले वाहन जिल्ह्याच्या सेवेत रूजू झाले. त्याला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपवनसंरक्षक कुमार स्वामी, सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रसाद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन दराडे, अनिरूद्ध देवधर, संदीप तायडे, संदीप तुरकणे, किरण लोणे, मनोज शेळके आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा रस्ते सुरक...

वन्यप्राणी पीक नुकसानभरपाईसाठी मोबाईल ॲप

  वन्यप्राणी पीक नुकसानभरपाईसाठी मोबाईल ॲप अकोला, दि. २५ : वन्यप्राण्यांकडून पीकांचे नुकसान झाल्यास   शेतकरी बांधवांना नुकसानभरपाईचा लाभ विहित वेळेत मिळण्यासाठी वन विभागाने ‘महा वन्यजीव भरपाई’ (Maha Vanya-Jeev Bharapai) हे मोबाईल अॅप विकसित केले आहे.   जिल्ह्यात वन्यप्राणी रोही, रानडुक्कर व काळवीट यांची संख्या वाढली आहे. त्यांचा वावर वाढल्याने पीक नुकसानी होते.   शेतात वन्यप्राण्यांनी पीक नुकसानी केल्यास शेतकरी महाफॉरेस्ट (https.//mahaforest.gov.in) या संकेतस्थळावर नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्जाच्या छाननीनंतर शासन निर्णयानुसार व नियमानुसार वन्यप्राण्यांनी केलेल्या पिक नुकसानीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येते. त्याचप्रमाणे, महा वन्यजीव भरपाई या ॲपद्वारेही नुकसान भरपाईसाठी अर्ज करता येतो, अशी माहिती वन विभागातर्फे देण्यात आली. ०००

अकोल्यात बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे १८० पदे भरणार

      अकोल्यात बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे १८० पदे भरणार अकोला दि. 24 : नोकरी इच्छूक उमेदवारांना खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे दि. ३० एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स. १० वा. प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. कंपन्यांनी एकूण १८० पदांची मागणी नोंदवली आहे. इक्विटस बैंक (एकुण रिक्तपदे- २० शैक्षणीक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), स्वतंत्र मायक्रो फायनान्स कं. (एकुण रिक्तपदे 20 शैक्षणीक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), ग्रामीण कुटा (एकुण रिक्तपदे - ५० शैक्षणीक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), मुथूट मायक्रो फायनान्स (एकुण रिक्तपदे -३० शैक्षणीक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), यशस्वी ग्रुप (एकुण रिक्तपदे- ३० शैक्षणीक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), आयटीएमस्कील अॅकडमी आयसीआयसी बँक (एकुण रिक्तपदे - ३० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर). ऑनलाईन अर्ज   दि. ३० एप्रिलपूर्वी ‘एनसीएस.जीओव्ही.इन’ या संकेतस्थळावर करावा. जास्तीत जास्त...

परदेशात शिक्षण शिष्यवृत्तीसाठी १७ मे पर्यंत अर्ज करण्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन

  परदेशात शिक्षण शिष्यवृत्तीसाठी १७ मे पर्यंत अर्ज करण्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन   मुंबई , दि.२४ :  राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज) ,  इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ मे २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.                    या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी ,  पदव्युत्तर पदविका व पी एच डी अभ्यासक्रमासाठी  QS (Quacquarelli Symonds)  रँकिंग २०० च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय/ अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध आहेत.                     परद...

फळपिक विमाधारकांना ई-पीक पाहणी आवश्यक

  फळपिक वि माधारकांना ई-पीक पाहणी आवश्यक अकोला, दि. २४ : पुनर्रचित हवामा ना धारित फळपिक विमा योज नेत जिल्ह्यात युनिवर्सल सोम्पो जनरल   इन्शुरन्स कंपनीमार्फत मृग बहा रा मध्ये डाळिंब, पेरू, मोसंबी, लिंबू, संत्रा या फळपिकांसाठी . तर अंबिया बहा रात सन २०२४-२५ मध्ये केळी, डाळिंब, पपई, मोसंबी, संत्रा या फळपीकांसाठी राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होणा-या शेतक-यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतक-यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे. परंतु फळ पी कांची ई – पी क पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे ( DCS ) मोबाइल अॅपद्वारे केलेली नाही. त्यांनी दि.२५ एप्रिलपर्यंत ई- पी क पाहणी पूर्ण करावयाची आहे. अन्यथा दि. १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार ७/१२ उता-यावर ई- पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही , असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी स्पष्ट केले आहे.   ज्या शेतक-यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे त्यांनी ई-पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाइल अॅपद्वारे दि.२५ एप्रिल,२०२५ पर्यंत पूर्ण करावी असे आव...

कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक बियाणे, खतांच्या विक्री, व्यवहारात पारदर्शकता ठेवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक बियाणे, खतांच्या विक्री, व्यवहारात पारदर्शकता ठेवा -          जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. २४ : खरीपासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यासाठी दर, साठा आदी सर्व बाबींचे सुस्पष्ट फलक, उन्हाळा लक्षात घेऊन विक्री केंद्रांवर सावली, पेयजल आदी सुविधा असाव्यात. भरारी पथकांनी कठोर निगराणी ठेवावी. शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.   जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे,  कृषी विकास अधिकारी महेंद्र साल्के यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कृषी निविष्ठा विक्रेते आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, कृषी निविष्ठांची सार्वत्रिक मुबलक उपलब्धता असावी. त्याचप्रमाणे, क...

अकोला, बुलडाणा येथील प्रवासी सुखरूप

  अकोला, बुलडाणा येथील प्रवासी सुखरूप अकोला, दि. २३ : ‘गुरूमाऊली टुर्स’च्या माध्यमातून काश्मिर येथे पोहोचलेले ३१ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली असून, तसे राज्य नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले, तसेच प्रवाश्यांशी संपर्क करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे देण्यात आली. पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने ‘गुरूमाऊली टुर्स अँड ट्रॅव्हल्स’चे समन्वयक अंबादास सप्रे यांच्यामार्फत दूरध्वनी संदेशान्वये जिल्हा नियंत्रण कक्षाला माहिती प्राप्त झाली. त्यानुसार या कंपनीने काश्मिर येथे यात्रा आयोजित केली. त्यात अकोला, बुलडाणा व पुणे येथील ३१ प्रवासी रेल्वेने काश्मिर येथे पोहोचले आहेत. सद्य:स्थितीत हे पर्यटक श्रीनगर येथील डल नेकजवळ असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असून, सर्व सुखरूप असल्याची माहिती श्री. सप्रे यांच्याकडून नियंत्रण कक्षाला मिळाली. ही माहिती मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे तातडीने माहिती व संबंधित यादी राज्य नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली, तसेच प्रवाश्यांशी संपर्क करण्यात येत आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकर...

‘मनरेगा’तून १२०० हे. फळबागा विकसित करणार

इमेज
    ‘मनरेगा’तून १२०० हे. फळबागा विकसित करणार अकोला, दि. २३ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्ह्यातील १ हजार २०० हे. क्षेत्रावर फळबागा लागवडीचे उद्दिष्ट आहे.   त्यात फळबागेसाठी खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचन आदी कामांसाठी   कमाल २ हेक्टर क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदान देय आहे. प्रति हे. कमाल अनुदान मर्यादेनुसार रक्कम लाभार्थ्याला ३ वर्षांच्या कालावधीत ५० : ३० : २० या प्रमाणे वितरित होईल. इच्छूकांनी जुलैअखेरपर्यंत ग्रामपंचायत किंवा कृषी सहायकांकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. योजनेतील फळपीकांमध्ये आंबा, संत्रा, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब, आवळा, चिंच, बोर, जांभुळ, कवठ, फणस, कोकम, ड्रॅगनफ्रुट, अव्हॅकडो, केळी, निशिगंध, मोगरा, गुलाब, तसेच बांबू, शेवगा, साग, शिंदी, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. कमाल २ हे. क्षेत्र मर्यादेत सलग लागवड, बांधावर लागवड आदींसाठी अनुदान देय आहे. ०००

ज्वारी, बाजरी व मका हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

  ज्वारी, बाजरी व मका हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू अकोला, दि. २३ : आधारभूत किंमत खरेदी योजनेत शेतकऱ्यांकडून ज्वारी, बाजरी व मक्याची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   बाळापूर, कवठा, निंबा फाटा, कान्हेरी गवळी, तेल्हारा, अकोट, मुंडगाव अकोला, लाखनवाडा, मूर्तिजापूर, पातूर, आलेगाव व बार्शीटाकळी येथील खरेदी केंद्रावर ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. खरेदी १ मे ते ३० जून   दरम्यान करण्यात येणार आहे.   संकरित ज्वारीचा हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ३७१ रू. असून, मालदांडी ज्वारीचा हमीदर ३ हजार ४२९ रू. आहे. मक्याचा हमीभाव प्रतिक्विंटल २ हजार २२५ रू. असून, बाजरीचा हमीदर प्र. क्विं. २ हजार ६२५ रू. आहे.   शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर एनईएमएल पोर्टलवर करण्यासाठी शेतक-यांचा पिकाचा उल्लेख असलेला सातबारा उतारा आधारपत्राची प्रत, आधार जोडणी असलेले बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, शेतकऱ्याचा फोटो आवश्यक आहे. देय रक्कम अदा करण्याची प्रणाली पीएफएमएस असून, संयुक्त बँक खाते चालणार नाही...

व्यावसायिक वाहनांवरील जाहिराती आता मराठीत बंधनकारक

  व्यावसायिक वाहनांवरील जाहिराती आता मराठीत बंधनकारक   अकोला, दि. २३ : मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, राज्यात नोंदणीकृत सर्व व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांवरील सामाजिक संदेश, जाहिराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन मालकांना या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आवाहन केले आहे. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा असल्यामुळे आणि बहुतांश नागरिक हे मराठी भाषिक असल्यामुळे सार्वजनिक माहिती मराठीत देणे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लाभला आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन व सन्मान राखणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. अनेक व्यावसायिक वाहनांवर हिंदी अथवा अन्य भाषांतील जाहिरातींमुळे मराठीच्या प्रचार व प्रसारावर मर्यादा येतात.   त्यामुळे जाहिराती, तसेच प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहून मराठीचा योग्य सन्मान राखला जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी केले आहे. ०००

अनुसूचित जातीतील युवकांसाठी उपक्रम कपडेनिर्मितीबाबत विनामूल्य प्रशिक्षण

    अनुसूचित जातीतील युवकांसाठी उपक्रम कपडेनिर्मितीबाबत विनामूल्य प्रशिक्षण अकोला, दि. २३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील बेरोजगार युवक, युवती आणि महिलांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) वस्त्रनिर्मिती विनामूल्य प्रशिक्षण घेण्यात येत आहे.   हे ४५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण असेल. अमरावती येथील कस्तुरबा सौर खादी क्लस्टर परिसरात दि. २९ एप्रिल ते १४ जून २०२५ प्रशिक्षण होईल. या प्रशिक्षणात ४० पात्र लाभार्थ्यांची निवड होणार आहे. त्याद्वारे वस्त्रोद्योगातील सर्वसमावेशक तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात कापसापासून दोरा व कापड निर्मिती, त्यानंतर तयार कपडे निर्मितीचे   प्रात्यक्षिक, तसेच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, शासकीय योजनांची माहिती, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबी तज्ज्ञांकडून शिकविल्या जाणार आहेत.   प्रशिक्षणादरम्यान चहा, नाश्ता, भोजन व निवासाची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे. सहभागासाठी १८ ते ५० वर्षे या वयोमर्यादेतील किमान १० वी उत्तीर्ण किंवा आयट...

सेवा हक्क दिन 28 एप्रिलला साजरा होणार लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती; जिल्हास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन

  सेवा हक्क दिन 28 एप्रिलला साजरा होणार लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती; जिल्हास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन   अकोला, दि. २३: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून सेवा हक्क दिन जिल्ह्यात विशेष उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथे कार्यक्रम होईल. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अकोला ॲड. आकाश फुंडकर, तसेच विविध मान्यवर उपस्थित राहतील.   जिल्ह्यात ग्रामपातळीवर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांना लोकसेवा हक्क अधिनियम, राज्य सेवा हक्क आयोग आणि ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाइन सेवा यांची माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, त्याचप्रमाणे, प्रातिनिधीक स्वरूपात ५० लाभार्थ्यांना सेवा हक्क प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. आदर्श आपले सरकार केंद्राचे उद्घाटनही यादिवशी होईल. सर्व शासकीय कार्यालये आणि ‘आपले सरकार’ केंद्रांमध्ये सेवांची व शुल्कांची माहिती देणारे क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. नागरिकांना अधिक सुलभतेने सेवा व ...

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन संपर्क क्रमांक:- 022-22027990

 काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन संपर्क क्रमांक:- 022-22027990 मुंबई, दि. 23 : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि  त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्...

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

इमेज
  महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण By   Team DGIPR  - एप्रिल 23, 2025 मुंबई ,  दि. २३ :  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून, सर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणुका पार पडल्या आहेत. आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत दर तासाला सरासरी 58 लाख मतदारांनी मतदान केले. तथापि, शेवटच्या दोन तासांत अपेक्षित 116 लाखांच्या तुलनेत केवळ 65 लाख मतदारांनी मतदान केले, हे लक्षवेधी असले तरी त्यावरून कोणत्याही गैरप्रकाराचा निष्कर्ष काढता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून मतदानानंतर कोणतीही तक्रार अधिकृतपणे निवडणूक न...