पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

इमेज
  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ अकोला, दि. 20 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रातील केंद्रांच्या लोकार्पणाचा मुख्य कार्यक्रम वर्धा येथे झाला. अकोला जिल्ह्यात १४ महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ कार्यक्रम श्रीमती मेहरबानु विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत झाला. जिल्हास्तरीय कार्यक्रमाला आमदार वसंत खंडेलवाल, संस्थेचे अध्यक्ष दीपेन शहा, सचिव नरेंद्र पटेल, कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके,  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता शिंगरूप, उपप्राचार्य डॉ. मयूर मालवीया आदी उपस्थित होते. वर्धा येथील मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात करण्यात आले. कौशल्य विकास केंद्रे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक - जिल्हाधिकारी कोणत्याही क्षेत्रात काम करताना प्रगतीसाठी कौशल्य आवश्यक असते. कार्यरत असताना अद्ययावत ज्ञान आत्मसात करत राहणे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर स्वागत

इमेज
  अकोला ,  दि.१९  :   राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी ४.३० वाजता शिवनी विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचे समवेत खा.अनुप धोत्रे ,  आ. वसंत खंडेलवाल ,  आ.रणधीर सावरकर ,  आ. प्रकाश भारसाकडे आ.हरीश पिंपळे ,  आ.डॉ. संजय कुटे आदी उपस्थित होते. प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अजित कुंभार ,  पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद जावळे ,  तसेच अन्य विभागप्रमुख ,  महानुभाव पंथ  प्रतिनिधी  उपस्थित होते. नंतर विमानाने नागपूरला रवाना झाले . ०००००

जिल्ह्यात 22 मतदान केंद्रे वाढली

  विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण जिल्ह्यात 22 मतदान केंद्रे वाढली अकोला, दि. 18 :  भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्‍या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण  करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 22 मतदान केंद्रे वाढली असून, एकूण केंद्रांची संख्या 1 हजार 741 झाली आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून  सर्व वि धानसभा मतदार संघांच्या सुसुत्रीकरण प्रस्‍तावांबाबत  मान्‍यताप्राप्‍त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमवेत  चर्चा करण्‍यात आली व प्रस्तावित बदलांबाबत त्यांना अवगत करण्‍यात आले. यासंबंधी  आक्षेप व सूचना मागवण्‍यात आल्‍या होत्‍या. त्या   विचारात घेऊन व प्रशासकीय बाबी तपासून मतदान केंद्र सुसुत्रीकरण प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला. त्याला भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 1 हजार 719 मतदान केंद्रे होती. या केंद्रांत नव्याने 22 मतदान केंद्रांची भर पडली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आता 1 हजार 741  मतदान केंद्रे आहेत.   विधानसभा मतदारसंघनिहाय केंद्रे २८- अक

वसतिगृहांत प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

  वसतिगृहांत प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ अकोला, दि. १८ : सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहातर्फे करण्यात आले आहे. अकोला येथे शिक्षण घेत असलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना   टक्केवारीनुसार रिक्त जागांवर प्रवेश देणे सुरू आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org   या संकेतस्थळावर भरता येईल. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न, जातीचा दाखला, आधारपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक प्रत, गुणपत्रिका, रहिवासी दाखला आदी कागदपत्रे जोडावीत. ऑनलाईन अर्जाची प्रिंट कार्यालयात आणून द्यावी. मुलांचे शासकीय वसतिगृह हनुमान वस्तीमधील संतोषी माता देवळाजवळ आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ८३०८०५८८३३ वर संपर्क साधावा. ०००

आत्महत्या प्रतिबंध उपायांबाबत स्त्री रुग्णालयात चर्चा

  आत्महत्या प्रतिबंध उपायांबाबत स्त्री रुग्णालयात चर्चा   अकोला,दिनांक १८ : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय कार्यक्रम नुकताच झाला. त्यात आत्महत्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. निराशा, अपयश यामुळे निर्माण होणारी आत्महत्येची भावना तसेच वेगवेगळ्या मोबाईल गेम्समुळे वर्तनात होणारे बदल, वाढते कौटुंबिक कलह आदी विविध बाबीं मानसिक आरोग्यावर परिणाम करतात, असे तज्ज्ञ डॉ. वंदना पटोकार यांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षण केंद्रातील मुलींनी 'आत्महत्या प्रतिबंध' बाबत पथनाट्य सादर करून आत्महत्या व त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत महत्व सांगितले.   वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्लम शेख, दंत शल्यचिकित्सक डॉ. मंगेश दातीर व वैद्यकीय अधिकारी डॉ. पोहुणीकर, मेटर्न श्रीमती कदम व परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जाधव व आभार सोपान अंभोरे यांनी मानले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व नर्सिंग शाळेतील

ईद-ए-मिलादनिमित्त जिल्ह्यात सोमवारी सुट्टी

अकोला, दि. १५ : मुंबई शहर व उपनगरात ईद ए मिलाद सणाची सुट्टी दि. १६ सप्टेंबरऐवजी दि. १८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. तथापि, महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना दि. ९.११.२०२३ अन्वये जिल्ह्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशाने ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी सोमवार, दि. १६ सप्टेंबर रोजी कायम ठेवण्यात आली आहे. ०००  

औ.प्र.संस्था (मुलींची) येथे संविधान मंदिराचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन प्रशिक्षणासोबतच संविधान जनजागृती करणारे संविधान मंदिर

इमेज
  अकोला,दि 15: जागतीक लोकशाही दिनाच्या निमित्याने राज्यातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये स्थापन केलेल्या संविधान मंदिरांचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते मुंबई येथील मुख्य सोहळ्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. अकोला येथील औ.प्र.संस्था (मुलींची) येथे आयोजीत कार्यक्रमात संविधान मंदीराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, खासदार अनुप धोत्रे, औ.प्र.संस्था (मुलींची) व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयंत पडगिलवार, प्राचार्य तथा प्र.जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी शरदचंद्र ठोकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. व्यवस्थापन समिती सदस्य विलास अनासाने,कांतीलाल गौरसिया,ॲड मुरलीधर इंगळे आदी उपस्थित होते.यावेळी संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले. अकोला शहरातील विवीध औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमधेही संविधान मंदिराचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक जयंत पडगिलवार यांनी बोलताना संविधान मंदीर ही संकल्पना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यासाठी कायदा व न्यायव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणारे दालन असल्याचे सांगितले. औद्योगिक प्रशिक्षणासोबत संविधानाने दिलेले हक्क अधिक

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

           अकोला, दि. १४  : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी  www.mahayojanadoot.org  या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.          महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख ६६ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.           या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आ

पालकमंत्र्यांचे निर्देश; विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे विभागीय आयुक्तांना पत्र शेती नुकसान पंचनामे करण्यास मंजुरी मिळण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव पाठविला

अकोला, दि. १४ : जिल्ह्यात सततच्या पावसाने पिकांच्या वाढीवर परिणाम होणे,  सोयाबीन पिकावर प्रतिकूल परिणाम होऊन शेंगा न लागणे या बाबी पाहता नुकसानीच्या अनुषंगाने बाधित क्षेत्राचे पंचनामे व सर्वेक्षण करण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. सततच्या पावसाने शेती पिकाचे झालेले नुकसान पाहता आर्थिक मदत मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींची मागणी, पत्रे, निवेदने प्रशासनाला प्राप्त झाली. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तत्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. त्यानुसार याबाबत सर्वेक्षण व पंचनामे करण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांच्याकडे पाठवला आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून शेती नुकसानीचा संयुक्त अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त आहे. त्यानुसार एक लाख 89 हजार 346 हे. आर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना २६ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अकोला ,  दि १३: पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने भटक्या जमाती - क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्हातील भज-क  प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थीसाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे ऑनलाईन अर्ज दि. २६ सप्टेंबर पर्यंत मागविण्यात येत आहेत. राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप.   सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप.मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान. पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान देण्यात येणारं आहे. ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन आहे ,  अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६ हजार प

जिल्ह्यात 17 सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम लोकचळवळ व्हावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

  जिल्ह्यात 17 सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा   ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम लोकचळवळ व्हावा -          जिल्हाधिकारी अजित कुंभार   अकोला, दि. 13 : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत आहे. हा उपक्रम लोकचळवळ व्हावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. अभियानाच्या अंमलबजावणी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिका-यांची ऑनलाईन बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, पंधरवड्यासाठी ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ ही थीम निश्चित करण्यात आली आहे. नियमित स्वच्छता न होणा-या स्थळांचे कायमस्वरूपी स्वच्छ व सुंदर स्थळात रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे. अशी ठिकाणे निवडणे, स्वच्छता, कच-याची शास्त्रोक्त विल्हेवाट, पर्यटनस्थळी

संविधान मंदिराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन अकोल्यात मुलींचे ‘आयटीआय’ येथे रविवारी कार्यक्रम

  संविधान मंदिराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन अकोल्यात मुलींचे ‘आयटीआय’ येथे रविवारी कार्यक्रम अकोला दि. 13 : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थापित संविधान मंदिराचा उद्घाटन समारंभ रविवारी दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आभासी पद्धतीने होणार आहे. मुख्य समारंभ मुंबईत कौशल्य ,रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने आयटीआय येथे संविधान मंदिर स्थापित करण्यात आले आहे. त्याचा राज्यातील मुख्य समारंभ मुंबई येथे होईल. त्यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने राज्यातील विविध संस्थांमधील संविधान मंदिराचे उद्घाटन होणार आहे. मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असतील. यावेळी अकोला येथे रतनलाल प्लॉटमधील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणाऱ्या कार्यक्रमाला विविध मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. संविधान मंदिराच्या शुभारंभ कार्यक्र

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी राज्यात 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी

इमेज
  ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी राज्यात 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी             मुंबई, दि. १२ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी   मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी   www.mahayojanadoot.org   या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.   महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.   या उपक्रमासाठी   आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.   या योजने

होमगार्ड पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध हरकत असल्यास कळविण्याचे आवाहन

maharashtracdhg.gov.in होमगार्ड पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध हरकत असल्यास कळविण्याचे आवाहन अकोला, दि. 12 : अकोला जिल्हा होमगार्डतर्फे पुरूष व महिलांसाठीच्या रिक्त जागांची सदस्य नोंदणी प्रक्रिया नुकतीच झाली. त्यात पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वा. पूर्वी आक्षेप, हरकती कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांची तात्पुरती यादी maharashtracdhg.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यादीतील गुणांबाबत हरकत, आक्षेप दि. 13 सप्टेंबर, तसेच 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात कळवावेत. दि. 14 सप्टेंबरनंतर प्राप्त हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे. ०००  

आपले सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी विशेष प्रशिक्षण सत्रात निर्देश

इमेज
      आपले सरकार पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी विशेष प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिका-यांचे निर्देश अकोला, दि. 12 ; नागरिक व प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा आपले सरकार 2.0 पोर्टलची हा शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या पोर्टलची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले जिल्हा प्रशासनातर्फे नियोजनभवनात सोमवारी हे प्रशिक्षण सत्र झाले. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, ई- गर्व्हनन्स तज्ज्ञ देवांग दवे,   तांत्रिक तज्ज्ञ हर्षल मंत्री , शुभम पै, विनोद वर्मा, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी, तसेच प्रशासनाकडून गतीने तक्रारीचे निवारण व्हावे यासाठी आपले सरकार 2.0 पोर्टल कार्य करते. प्रणालीत प्रत्येक तक्रारीचे ट्रॅकिंग आणि निराकरण होते. प्रक्रियेला गती येते व नागरिकांचा वेळ वाचतो. सर्व विभागांनी या माध्यमातून प्रलंबित तक्रारींचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. या पोर्टलमुळे सार

क्षयरूग्णांना सहकार्यासाठी ‘निक्षय मित्र’

  क्षयरूग्णांना सहकार्यासाठी ‘निक्षय मित्र’ जिल्ह्यातील अधिकाधिक व्यक्तींनी उपक्रमात सहभागी व्हावे -          सीईओ बी. वैष्णवी अकोला, दि. 12 : सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षयरूग्णांना सामाजिक सहकार्य होण्याच्या हेतूने जिल्ह्यात निक्षय मित्र जोडणी अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी या स्वतः निक्षय मित्र झाल्या असून, क्षयरूग्णांच्या सहकार्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तींनी निक्षय मित्र व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. उपक्रमात नव्याने 11 निक्षय मित्राची नोंदणी झाली   आहे. त्यानुसार 22 क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांनी दिली, निक्षय मित्र संकल्पनेबाबत… केंद्र शासनाने सन 2025 पर्यंत टीबीमुक्त भारत निर्माण करण्याचे धोरण आखले आहे. क्षय रुग्णांना सामुदायिक सहाय्य मिळण्यासाठी आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. निक्षयमित्र उपक्रमांद्वारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळते. समाजातील कोणतीही व्यक्ती, सेवाभावी संस्था, व

कुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचे- अजित कुंभार पोषण महा निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पोषण जनजागृती प्रदर्शनी

इमेज
  अकोला, दि 10 : कुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचा टप्पा ठरणार असून जिल्हाभरात पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. महिला व बालकल्याण विभाग तथा एकात्मिक बाल विकास सेवा विभागाच्या वतीने नियोजन भवन परिसरात राष्ट्रीय पोषण अभियान व पोषण महानिमित्त पोषण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रदर्शनीची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी राजश्री कोलखेडे व एकात्मिक बाल विकास सेवा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पोषण प्रदर्शनीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा तेल्हारा विभागाच्या वतीने पोषणासाठी महत्त्वपूर्ण असणारे घटक, एक पेड मा के नाम, मी  आहे पोषण मटका, स्तनपान जनजागृती यासह विविध संदेश साकारण्यात आले होते यासह विविध संदेश साकारण्यात आले होते.1 ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण महा साजरा केला जात असून राष्ट्रीय पोषण अभियानाच्या माध्यमातून कुपोषणाची पातळी कमी करणे आणि देशातील मुलांचा पोषण दर्जा हे उदिष्ट ठेवून 0 ते 6 वयोग

इव्हीएम व्हिव्हीपॅट यंत्रांबाबत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दाखवली हिरवी झेंडी 10 सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान जिल्हाभरात जनजागृती मोहीम

इमेज
  अकोला, दि. १० : आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये मतदान यंत्र वापराबाबत व मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी इव्हीएम व्हिव्हीपॅट यंत्रांबाबत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी(निवडणुक) महेश परांडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे,महिला व बालकल्याण कार्यक्रम अधिकारी राजश्री कोलखेडे आदी उपस्थित होते. 10 सप्टेंबर ते दि. 09 ऑक्टोबर दरम्यान जनजागृती मोहीम  जिल्हाभरात राबविण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट, बाळापूर, अकोला, मुर्तिजापूर तसेच उपजिल्हाधिकारी (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयाच्या ठिकाणी इव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे  (इव्हीएम डेमोस्ट्रेशन सेंटर इडीसी) निश्चित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार दोन मोबाईल व्हॅनद्वारे प्रत्येक गाव, मतदान केंद्र स्थळावर मतदारांना मतदान यंत्रांची

कपाशीवरील आकस्मिक मररोग नियंत्रणासाठी उपाययोजना

  कपाशी वरील आकस्मिक मररोग नियंत्रणासाठी उपाययोजना अकोला, दि. 9 : कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर  ( पॅरा वील्ट )  हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणात दिसून येते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे, कपाशी पि‍कास पावसाचा तान बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो.   आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तथा सुकल्यासारखे दिसते. तसेच त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बोंडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मूळे कुजत नाहीत .  रोगग्रस्त झाडास हमखास नविन फूट येते . आकस्मिक मर: उपाययोजना :  कापूस पिकाच्य

विविध कीड आणि रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना

          विविध कीड आणि रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना अकोला, दि. 9 : तूर, सोयाबीन आदी विविध पीकांवरील कीड व रोग नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. तूर पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ५ % निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट ३० % प्रवाही १५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मिटर अंतरावर शेतात उभारावेत. सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या १० % पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरानट्रानीलीप्रोल १८.५ % एस. सी ०.४ मिली प्रती लीटर पाणी किंवा स्पीनोटोराम ११.७ % एस सी ०.५ मिली प्रती लीटर पाणी किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ % एस जी ०.४ ग्राम प्रती लीटर पाणी वापरून फवारणी करावी.   भुईमूग पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी फ्लुबेन्डामाइड ३.५% + हेक्साकोनॅझो

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

इमेज
  ‘मुख्यमंत्री योजनादूत ’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन अकोला, दि. ६ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी   मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.   महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.   या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्य

अकोला पश्चिम मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

  अकोला पश्चिम मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध अकोला, दि. 6 : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी 307 मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी यादीत आपल्या नावाची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांनी केले आहे. यादीनुसार, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 1 लाख 72 हजार 840 पुरूष, 1 लाख 72 हजार 587 महिला व म 23 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 45 हजार 450 मतदार आहेत. पुनरीक्षणानुसार 8 हजार 678 नवीन मतदारांची नोंदणी झाली, तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मयत अशा 1 हजार 684 मतदारांची नावे वगळण्यात आली. भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळ व ॲपवरही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ०००