जिल्ह्यात वादळी वारा व पावसाने नुकसान

 जिल्ह्यात वादळी वारा व पावसाने नुकसान

अकोला, दि. 12 : जिल्ह्यात मंगळवारी (11 जून) झालेल्या वादळी वारा व पावसाने वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू, तसेच 160 घरांची अंशत: हानी झाली आहे. 

आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर तालुक्यात वादळी वारा व पावसामुळे वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मौजे टिपटाळा येथील शालिग्राम श्रीराम डोंगरे (वय 65) तसेच मौजे खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे (वय 26) यांचा वीज पडून मृत्यू झाला. याबाबत तहसीलदारांनी अहवाल सादर केला आहे.

घरांची हानी

मूर्तिजापूर तालुक्यात 159 घरांचे व बार्शिटाकळी तालुक्यात एका घराचे अशा एकूण 160 घरांचे अंशत: नुकसान झाले. 

पशुहानी

अकोला तालुक्यातील डोंगरगाव येथे एक म्हैस, तसेच बार्शीटाकळी तालुक्यात एक बैल व पातूर तालुक्यात एक बैल दगावला. 

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज