पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न करा जिल्हाधिकारी वर्षां मीना

इमेज
    विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न करा जिल्हाधिकारी वर्षां मीना   अकोला, दि. 18: विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्ये सुधारण्यासाठी निपुण कार्यक्रम राबवला जातो. जिल्ह्याची स्थिती फारशी समाधानकारक नसून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण यंत्रणा व शिक्षकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.   महसूल सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय निपुण सुकाणू समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य रत्नमाला खडके, एकात्मिक बालविकास उपमुख्य कार्यकारी अमित रायबोले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि गणित यासारख्या मूलभूत गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी निपुण कार्यक्रम राबवला जातो. राज्याच्या क्रमवारीतील जिल्ह्याचे स्थान पाहता या शैक्षणिक स्थितीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तावाढीसाठी सर्व घटकांनी जबाबदारीने काम करावे.   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरि...

महाराष्ट्र बालविवाहमुक्त करण्यात योगदान द्यावे जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  महिला व बालविकास विभागाचे 100 दिवसांचे अभियान महाराष्ट्र बालविवाहमुक्त करण्यात योगदान द्यावे जिल्हाधिकारी वर्षा मीना बालविवाहाच्या पत्रिका न छापण्याचा मुद्रक संघाचा निर्धार धार्मिक नेते व विविध घटकांचा अभियानात सहभाग अकोला, दि. 18 : महिला व बालविकास विभागाकडून बालविवाहमुक्त महाराष्ट्र अभियानात सर्व विभाग, धार्मिक नेते,स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना व नागरिक यांना एकत्र आणण्यात येत आहे.   त्यासाठी दि. 26 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून, सर्वांनी समन्वयाने कार्य करून महाराष्ट्र बालविवाहमुक्त करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.   बालविवाहमुक्त महाराष्ट्र या 100 दिवसांच्या मोहिमेच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, समिती सदस्य, बालकांच्या क्षेत्रात कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, धार्मिक नेते यांच्यासह विवाहासंबंधित सेवा पुरवठादार हॉलमालक, मंडपमालक, लग्न पत्रिका छापणारे म...

बालगृहातील 110 मुलांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग

इमेज
    बालगृहातील 110 मुलांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग अकोला, दि. 17: महिला व बालविकास विभाग, बाल संरक्षण कक्ष, सुर्योदय बालगृह, मैत्री नेटवर्क, सुखाय फाऊंडेशन व एन्करेज एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे बालहक्क सप्ताहानिमित्त सुर्योदय बालगृहाच्या प्रांगणात रविवारी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात बालगृहातील 110 मुलांना सहभागी होऊन सुंदर चित्रे रेखाटली. उपक्रमाचा उद्देश स्पर्धेचा नसून, मुलांच्या गुणांना वाव देणे हा आहे. खेळात हार-जीत महत्वाची नसून, सहभागी होणे हेच महत्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रोशनी बन्सल यांनी यावेळी केले.     जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, ॲड. अनिता गुरव, प्रांजली जयस्वाल, सारिका वानखडे, नितेंद्र उंबरकर, राजू लाडुलकर आदी उपस्थित होते. सुर्योदय बालगृहाचे अधिक्षक शिवराज खंडाळकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. राधा कात्रे, दिव्या जी., सपना खंडारे, गौरी सरोदे,   दिनेश लोहकार, पद्माकर मोरे, ऋतुजा घ्यार, दीपक लुंगे,जयश्री इखारे, रेखा बावणे, सचिन सातपुते, राधिका कोरडे, आम्रपाली अंभोरे, साधना इंगळ...

जि. प. व पं. स. निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या

  जि. प. व पं. स. निवडणूकीसाठी     निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या अकोला, दि. 17: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबतचा आदेश जारी केला. पातूर पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. राहूल वानखडे काम पाहतील. अकोटसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी माया वानखडे काम पाहतील. मूर्तिजापूरसाठी तहसीलदार शिल्पा बोबडे या निवडणूक निर्णय अधिकारी व गटविकास अधिकारी मिलींद मोरे हे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.     अकोला पं. स. क्षेत्रात उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे हे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार गौरी धायगुडे हे सहा. नि. नि. अधिकारी असतील. बाळापूर क्षेत्रासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष येवलीकर हे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक नि. नि. अधिकारी म्हणून बंडू ...

शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रारूप मतदार यादी 3 डिसेंबरला प्रसिद्ध होणार निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम

  शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रारूप मतदार यादी 3 डिसेंबरला प्रसिद्ध होणार निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम अकोला, दि. 14 : शिक्षक   मतदार संघासाठी 1.11.2025   अर्हता   दिनांकावर आधारित मतदारयाद्या   नव्‍याने तयार करण्याचा नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. मतदार नोंदणीसाठी प्राप्त अर्जांवर कार्यवाही पूर्ण होण्यासाठी पुरेसा अवधी मिळण्यासाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. तसा सुधारित कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार, प्राप्त अर्जांनुसार प्रारूप मतदारयाद्या तयार करणे, छपाई आदी कार्यवाही दि. 28 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. प्रारूप मतदारयाद्यांच्या प्रसिद्धीचा दिनांक 3 डिसेंबर (बुधवार) असा करण्यात आला आहे. दि. 3 ते 18 डिसेंबर दरम्यान दावे, हरकती स्वीकारण्याचा कालावधी असेल. मतदारयादीच्या अंतिम प्रसिद्धीचा दिनांक 12 जानेवारी (सोमवार) असा करण्यात आला आहे. ०००

श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन देशभर कार्यक्रम; स्थानिक स्तरावरही कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
श्री गुरू तेग बहादूर यांच्या   350   व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन देशभर कार्यक्रम; स्थानिक स्तरावरही कार्यक्रमाचे आयोजन अकोला, दि. १४ :   ' हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर '   यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले असल्याची माहिती ‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम’ राज्यस्तरीय समितीने दिली आहे.   समितीच्या उपस्थितीत स्थानिक समिती व समाजबांधवांच्या उपस्थितीत बैठक नियोजनभवनात झाली. राज्य समितीचे नियंत्रक सुखविंदर सिंग, पंजाबी साहित्य अकादमीचे प्रमुख मलकितसिंग बल, सहसमन्वयक जसपालसिंग सिद्धू, चरणजीतसिंग, विदर्भ क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष गुरमितसिंग खोकर, परमजीतसिंग भट्टी, अनमोलसिंह बछेर, अधिक्षक श्याम धनमने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.   श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्...

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा अकोला जिल्हा दौरा

  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा अकोला जिल्हा दौरा अकोला, दि. 14 : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे शनिवार दि. 15 नोव्हेंबर रोजी अ.कोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा खालीलप्रमाणे: शनिवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामभवन, अकोला येथे आगमन. दुपारी 3 वाजता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते भगवान बिरसा मुंडा यांचे 150 व्या जयंतीनिमित्त जनजागृती गौरव वर्ष अंतर्गत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला). सोयीनुसार मातोश्री, शिवाजीनगर, मेहकरकडे प्रस्थान. ००००

अतिवृष्टीबाधित शेतक-यांना मदतीचे वितरण ऑगस्ट – सप्टें.मधील अतिवृष्टीबाधितांना 255 कोटी मदत निधीचे वितरण अतिवृष्टी व पूर बाधितांना रब्बी हंगाम बियाण्यासाठी 191 कोटी मदत

    अतिवृष्टीबाधित शेतक-यांना मदतीचे वितरण ऑगस्ट – सप्टें.मधील अतिवृष्टीबाधितांना 255 कोटी मदत निधीचे वितरण अतिवृष्टी व पूर बाधितांना रब्बी हंगाम बियाण्यासाठी 191 कोटी मदत अकोला, दि. 14 : जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पावसाने झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने एकूण 2 लक्ष 70 हजार शेतक-यांना 255 कोटी 15 लक्ष 67 ह. मदत वितरण, तसेच अतिवृष्टी व पुरामुळे बाधित 2 लक्ष 21 हजार 707 शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर बाबींकरिता प्रतिहेक्टरी रू. 10 हजार रू. प्रमाणे   191 कोटी 43 लक्ष डीबीटी पद्धतीने मदत वितरण झाले. अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने मदत व सवलती जाहीर केल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनीही यासंदर्भात बैठका घेऊन सविस्तर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार ऑगस्ट-सप्टेंबरमधील नुकसानीच्या अनुषंगाने मदत वितरण व रब्बी हंगाम बियाणे आदींसाठी मदतीची वितरण प्रक्रिया प्रशासनाने राबवली.   ऑगस्टमधील अतिवृष्टीने शेतीपिकांचे (2 हे. पर्यंत) झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने 1 लक्ष ...

बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाक्षरी अभियान

इमेज
  बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाक्षरी अभियान अकोला, बाल दिनानिमित्त बालकांची हक्क व अधिकार याबाबत जनजागृतीसाठी महिला व बालविकास विभागातर्फे स्वाक्षरी अभियान जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्वाक्षरी करून अभियानाचा शुभारंभ केला. बालकांसाठी समाजात, परिसरात सुरक्षित, आनंददायी वातावरण निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बालकांचे हक्क, स्वातंत्र्य या मूल्यांची जपणूक करतानाच त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर, सुनील लाडुलकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

नामनिर्देशनपत्रातील माहिती सोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. 15)देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

                                       नामनिर्देशनपत्रातील माहिती सोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. 15)देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार   मुंबई   (रानिआ): नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेवून व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे ,  असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने  https://mahasecelec.in   हे संकेतस्थळ विकसित...

शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी 14 नोव्हेंबरला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्ज शिबिर; जागेवरच कर्ज मंजुरी!

 शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी 14 नोव्हेंबरला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्ज शिबिर; जागेवरच कर्ज मंजुरी!         अकोला, दि. 13 (जिमाका): 'आत्मनिर्भर भारत'च्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अकोला यांच्या वतीने  ,  दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता विशेष कर्ज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे शेतकरी आणि गरजू वर्गाला बँकिंग सुविधा व कर्ज योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.        हे शिबिर अकोला परिसरात  बारोमसी हॉटेल, MIDC  परिसर, नानाजी देशमुख सभागृह, अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, बँकेच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांमध्येही हे विशेष शिबिर होणार आहे. या शिबिराचा उद्देश शेतकरी, स्वयंसहायता समूह आणि समाजातील इतर गरजू वर्गाला विविध कर्ज योजनांचा लाभ मिळवून देणे आहे.        येथे किसान क्रेडिट कार्ड, कुक्कुटपालन, दुग्धशाळ...

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा ‘एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

इमेज
  पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम -           कौशल्य ,  रोजगार ,  उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा ‘ एआय ’  मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त   मुंबई ,  दि १३ : जगभरात आता विविध क्षेत्रात  ‘ एआय ’  तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती घडत असून प्रसिद्धी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.  ‘ एआय ’  तंत्रज्ञान अत्याधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून यामुळे पत्रकारांचा अमूल्य वेळ ही वाचणार आहे. प्रत्येक क्षेत्रात अपस्किलींगला खूप महत्व आहे हे लक्षात घेवून राज्यात असा नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विकास विभागाने राबविला असल्याचे कौशल्य ,  रोजगार ,  उद्योजकता न नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.          रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्य...

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची भरती; माजी सैनिकांना संधी

  सैनिक कल्याण विभागात लिपिकांची भरती; माजी सैनिकांना संधी   अकोला, दि. 13 : सैनिक कल्याण विभाग व विभागात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांसाठी सरळसेवेने लिपिक टंकलेखक पदांची भरती होत आहे. त्यासाठी केवळ माजी सैनिकांकडून दि. 26 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यापूर्वी प्रसारित भरतीच्या सूचनेमध्ये ५ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. तथापि, जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, दि. २६ नोव्हेंबर रोजी रा. २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. तरी जिल्ह्यातील पात्र आणि इच्छुक माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर यांनी केले आहे.   000

दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांना नोंदणी अनिवार्य

  दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांना नोंदणी अनिवार्य अकोला, दि. 12 : दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्थांना नोंदणी अनिवार्य असून, त्यांनी ती 30 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले. दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणा-या संस्थांना नोंदणी आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2000 नुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांना सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत नोंदणी प्रमाणपत्र मिळते. इच्छूक संस्थांनी नोंदणी प्रस्ताव दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अकोला यांच्याकडे दि. 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करावा. विनानोंदणी संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. ०००

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करावा कोषागाराचे आवाहन

    निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करावा कोषागाराचे आवाहन अकोला, दि. 12 : जिल्हा कोषागारामार्फत निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक, माजी आमदार तसेच इतर सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या बँकेत जाऊन विहीत नमुन्यात हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी, असे आवाहन जिल्हा कोषागाराने केले आहे. पेन्शनरांच्या संबंधित बँकेत विहीत नमुन्यातील हयात प्रमाणपत्र यादी उपलब्ध आहे. सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी उपलब्ध यादीमध्ये आधारकार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, दुरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. त्याशिवाय डिसेंबर 2025 चे निवृत्तीवेतन देय होणार नाही. ज्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना वयाची 80 वर्षे पूर्ण झाले आहेत व निवृत्तीवेतनात 20 टक्के व अधिक वाढ मिळाली नाही, त्यांनी तत्काळ जन्म दाखला, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँकखाते असलेल्या बँक शाखा प्रमुखांचे प्रमाणपत्र, शासकीय,निमशासकीय आस्थापनेचे प्रमाणपत्र, सेवापुस्तकातील नोंद,ओळखपत्र, सेवानिवृत्त झालेल्या ...

मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे घडणार दर्शन जानेवारीअखेरीस नरनाळा महोत्सव महोत्सवात दर्जेदार कार्यक्रमांचे नियोजन करावे - जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे यंत्रणांना निर्देश

 मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे घडणार दर्शन जानेवारीअखेरीस नरनाळा महोत्सव  महोत्सवात दर्जेदार कार्यक्रमांचे नियोजन करावे - जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे यंत्रणांना निर्देश अकोला, दि. 12: सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे नियोजन असून, त्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.  महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची ऑनलाईन बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व इतर अधिकारी उपस्थित होते.  पर्यटक, निसर्गमित्र व वनप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला नरनाळा पर्यटन महोत्सव 13 वर्षांनंतर पुन्हा आयोजित करण्यात येत आहे. मेळघाटचे समृद्ध वनवैभव, ऐतिहासिक नरनाळा किल्ला, आदिम संस्कृती व परंपरांचे दर्शन महोत्सवातून घडेल. ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज करण्याचे आवाहन

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज करण्याचे आवाहन अकोला, दि. १२ : शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र मात्र, विद्यार्थी क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी, तसेच त्यापुढील   व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते. पात्र विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.     योजनेद्वारे विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. विभागाच्या होस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम ( https://hmasscrutinyworkflow.mahait.org ) संकेतस्थळावर दि. ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे आवश्यक आहे. प्रवेश क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी स्वाधार योजनेकरिता पात्र असतील.   तालुका स्तरावरही स्वाधार योजना लागू करण्यात आ...

पुरवठा योजनांसाठी 90.34 दलघमी पाणी आरक्षण मंजूर

  पुरवठा योजनांसाठी 90.34 दलघमी पाणी आरक्षण मंजूर अकोला, दि. 12 : जिल्ह्यातील प्रकल्पातून बिगर सिंचनअंतर्गत पाणी पुरवठा योजनांसाठी सन 2025-26 साठी शासन मंजूरीनुसार आरक्षण 73.436 दलघमी इतके व आकस्मिक पाणी आरक्षण 16.904 दलघमी आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीकडून एकूण 90.34 दलघमी पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे.   अकोला शहरासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून मंजूर आरक्षणाइतके 24.03 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, काटेपूर्णा प्रकल्पातून महान मत्स्यबीज केंद्रासाठी 0.86 दलघमी, तसेच 60 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 5.03 दलघमी, 4 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 1.96, मूर्तिजापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 3.35 दलघमी आणि म. औ. वि. महामंडळासाठी 0.74 दलघमी पाणी आरक्षित आहे. वाण प्रकल्पातून अकोट शहरासाठी 5.40, तेल्हारा शहरासाठी 1.80, शेगावसाठी 5.27, 84 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 10.75,   जळगाव जामोदसाठी 1.204 आणि 140 खेडी योजनेसाठी 6.416 दलघमी पाणी आरक्षण आहे. मोर्णा प्रकल्पातून पातूर शहरासाठी 0.70 दलघमी, देऊळगाव पास्टुल 16 गावे योजनेसाठी 1.9...

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अद्ययावतीकरणामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी अफवांवर विश्वास ठेवू नका - व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अद्ययावतीकरणामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी अफवांवर विश्वास ठेवू नका -          व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख अकोला, दि. 12 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच े कामकाज बंद झाल्याच्या व व्याज परतावा थांबविण्यात आल्याच्या अफवा काही समाजकंटकांकडून समाजमाध्यमांतून पसरवल्या जात आहेत. त्यात कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु आहेत , असे स्पष्टीकरण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.   महामंडळाच्या सर्व योजना नियमित सुरू आहेत. त्याचप्रमाणे, वेब प्रणालीचे अद्ययावतीकरण सुरू असून सेवा 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत देण्याचे बंधन महामंडळाने स्वत: वर घालून घेतले आहे. याबाबत आवश्यक ते बदल वेब प्रणालीमध्ये करणे सुरु आहे. एजंटमार्फत लाभार्थ्यांची होणारी आर्थ‍िक पिळवणूक थांबावी यासाठी म्हणून महामंडळाने सामाईक सेवा केंद्रांद्वारे फक्त 70 रुपयांत सेवा उपलब्ध करण्यात येत...

'अमृत दुर्गोत्सव'ची विश्वविक्रमाला गवसणी

  ' अमृत दुर्गोत्सव ' ची विश्वविक्रमाला गवसणी अकोला, दि. 12 :   महाराष्ट्र संशोधन , उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे (अमृत) दिवाळीत '' अमृत दुर्गोत्सव 2025' हा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य , पराक्रम , संस्कृती रक्षण , स्वभाषा , स्वधर्म यासारख्या अनेक गुणांना उजाळा देऊन अनेकांच्या मनावर सुसंस्कार करणे , या दृष्टीने समाजमन घडविणे आणि शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देणे हे उद्दिष्ट होते.   महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेले आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या बारा गडांपैकी कोणत्याही एकाची प्रतिकृती अंगणात , सोसायटी , शाळेत , मैदानात तयार करून त्यासोबत फोटो घेऊन तो संकेतस्थळावर करणे असे स्वरूप होते. सहभागींना मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र मिळणार होते.        अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम व्यापक झाला. महारा...

इच्छुकांनी लाभ घ्यावा; जिल्हाधिका-यांचे आवाहन कृत्रिम वाळू युनिटसाठी पहिल्या 50 पात्र अर्जदारांना विविध सवलती

  इच्छुकांनी लाभ घ्यावा; जिल्हाधिका-यांचे आवाहन कृत्रिम वाळू युनिटसाठी पहिल्या 50 पात्र अर्जदारांना विविध सवलती अकोला, दि. 11 :   शासनाने एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) धोरण व त्याची मानक कार्यप्रणाली (एसओपी) निश्चीत केली आहे. त्यानुसार कृत्रिम वाळू युनिट स्थापण्यासाठी इच्छूक असलेल्या जिल्ह्यातील पहिल्या 50 पात्र अर्जदारांना विविध शासकीय सवलती देण्यात येणार आहेत. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. अशा आहेत सवलती : औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज अनुदान, वीज दर अनुदान, वीज शुल्क सवलत, मुद्रांक शुल्क माफी, रॉयल्टीमध्ये 400रू. प्रति ब्रास सवलत देऊन (200रुय प्रति ब्रास दराची तरतुद), शासकीय, निमशासकीय बांधकामांमध्ये सध्या एम-सॅन्डचा 20 टक्के वापर बंधनकारक, टप्प्याटप्प्याने हे प्रमाण 100 टक्के इतके वाढणार. कोणाला लाभ घेता येईल : मंजूर खाणपट्टा असलेले व्यक्ती, संस्था जर 100 टक्के एम-सॅण्ड उत्पादन करणार असतील, तर त्यांनाही धोरणांतर्गत लाभ घेता येईल. सदर धोरण अस्तित्वात येण्यापुर्वी ज्यांनी 100 टक्के एम-सॅण्ड उत्पादन" सुरु केले आहे त्यांनाही हेत...

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान

  अकोला, दि. ११ :  राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या संबंधित संस्था व शाळांनी सदर शासन निर्णयानुसार परिपूर्ण प्रस्ताव दि. १४ नोव्हेंबर जिल्हा नियोजन समिती, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला या कार्यालयास मिळतील या बेताने सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र नसतांना प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये, असे कळविण्यात आले आहे. ०००

जन्माची नोंदणी वेळेत व्हावी; विलंब झाल्यास प्राधिकृत दंडाधिका-यांद्वारेच व्हावी - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  अकोला, दि. 11 : जन्माची नोंद वेळेत होणे आवश्यक असते. एक वर्षाहून अधिक उशिराने जन्माची नोंदणी ठोस पुराव्यासह, तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मान्यतेखेरीज होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. पीसीपीएनडीटी कायदा, एड्स प्रतिबंध कार्यक्रम, तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा, कुष्ठरोग निवारण कार्यक्रम, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 कायदा आदी विविध विषयांचा आढावा बैठकांद्वारे जिल्हाधिका-यांनी घेतला. जन्म, मृत्यूच्या नोंदणी अधिनियमानुसारच व्हाव्यात. नियमाची कदापि पायमल्ली होता कामा नये, असे निर्देश त्यांनी दिले. सन 2030 पर्यंत कुष्ठरोगमुक्त भारत असे उद्दिष्ट निश्चित असून, त्यादृष्टीने संशयित रूग्णांचा मोहिम स्तरावर शोध घेऊन त्यांना योग्य उपचार मिळवून द्यावेत. कुष्ठरो...