पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फळपिक विमाधारकांना ई-पीक पाहणी आवश्यक

  फळपिक वि माधारकांना ई-पीक पाहणी आवश्यक अकोला, दि. २४ : पुनर्रचित हवामा ना धारित फळपिक विमा योज नेत जिल्ह्यात युनिवर्सल सोम्पो जनरल   इन्शुरन्स कंपनीमार्फत मृग बहा रा मध्ये डाळिंब, पेरू, मोसंबी, लिंबू, संत्रा या फळपिकांसाठी . तर अंबिया बहा रात सन २०२४-२५ मध्ये केळी, डाळिंब, पपई, मोसंबी, संत्रा या फळपीकांसाठी राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होणा-या शेतक-यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतक-यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे. परंतु फळ पी कांची ई – पी क पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे ( DCS ) मोबाइल अॅपद्वारे केलेली नाही. त्यांनी दि.२५ एप्रिलपर्यंत ई- पी क पाहणी पूर्ण करावयाची आहे. अन्यथा दि. १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार ७/१२ उता-यावर ई- पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही , असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी स्पष्ट केले आहे.   ज्या शेतक-यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे त्यांनी ई-पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाइल अॅपद्वारे दि.२५ एप्रिल,२०२५ पर्यंत पूर्ण करावी असे आव...

कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक बियाणे, खतांच्या विक्री, व्यवहारात पारदर्शकता ठेवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक बियाणे, खतांच्या विक्री, व्यवहारात पारदर्शकता ठेवा -          जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. २४ : खरीपासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यासाठी दर, साठा आदी सर्व बाबींचे सुस्पष्ट फलक, उन्हाळा लक्षात घेऊन विक्री केंद्रांवर सावली, पेयजल आदी सुविधा असाव्यात. भरारी पथकांनी कठोर निगराणी ठेवावी. शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.   जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे,  कृषी विकास अधिकारी महेंद्र साल्के यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कृषी निविष्ठा विक्रेते आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, कृषी निविष्ठांची सार्वत्रिक मुबलक उपलब्धता असावी. त्याचप्रमाणे, क...

अकोला, बुलडाणा येथील प्रवासी सुखरूप

  अकोला, बुलडाणा येथील प्रवासी सुखरूप अकोला, दि. २३ : ‘गुरूमाऊली टुर्स’च्या माध्यमातून काश्मिर येथे पोहोचलेले ३१ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली असून, तसे राज्य नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले, तसेच प्रवाश्यांशी संपर्क करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे देण्यात आली. पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने ‘गुरूमाऊली टुर्स अँड ट्रॅव्हल्स’चे समन्वयक अंबादास सप्रे यांच्यामार्फत दूरध्वनी संदेशान्वये जिल्हा नियंत्रण कक्षाला माहिती प्राप्त झाली. त्यानुसार या कंपनीने काश्मिर येथे यात्रा आयोजित केली. त्यात अकोला, बुलडाणा व पुणे येथील ३१ प्रवासी रेल्वेने काश्मिर येथे पोहोचले आहेत. सद्य:स्थितीत हे पर्यटक श्रीनगर येथील डल नेकजवळ असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असून, सर्व सुखरूप असल्याची माहिती श्री. सप्रे यांच्याकडून नियंत्रण कक्षाला मिळाली. ही माहिती मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे तातडीने माहिती व संबंधित यादी राज्य नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली, तसेच प्रवाश्यांशी संपर्क करण्यात येत आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकर...

‘मनरेगा’तून १२०० हे. फळबागा विकसित करणार

इमेज
    ‘मनरेगा’तून १२०० हे. फळबागा विकसित करणार अकोला, दि. २३ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्ह्यातील १ हजार २०० हे. क्षेत्रावर फळबागा लागवडीचे उद्दिष्ट आहे.   त्यात फळबागेसाठी खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचन आदी कामांसाठी   कमाल २ हेक्टर क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदान देय आहे. प्रति हे. कमाल अनुदान मर्यादेनुसार रक्कम लाभार्थ्याला ३ वर्षांच्या कालावधीत ५० : ३० : २० या प्रमाणे वितरित होईल. इच्छूकांनी जुलैअखेरपर्यंत ग्रामपंचायत किंवा कृषी सहायकांकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. योजनेतील फळपीकांमध्ये आंबा, संत्रा, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब, आवळा, चिंच, बोर, जांभुळ, कवठ, फणस, कोकम, ड्रॅगनफ्रुट, अव्हॅकडो, केळी, निशिगंध, मोगरा, गुलाब, तसेच बांबू, शेवगा, साग, शिंदी, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. कमाल २ हे. क्षेत्र मर्यादेत सलग लागवड, बांधावर लागवड आदींसाठी अनुदान देय आहे. ०००

ज्वारी, बाजरी व मका हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

  ज्वारी, बाजरी व मका हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू अकोला, दि. २३ : आधारभूत किंमत खरेदी योजनेत शेतकऱ्यांकडून ज्वारी, बाजरी व मक्याची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   बाळापूर, कवठा, निंबा फाटा, कान्हेरी गवळी, तेल्हारा, अकोट, मुंडगाव अकोला, लाखनवाडा, मूर्तिजापूर, पातूर, आलेगाव व बार्शीटाकळी येथील खरेदी केंद्रावर ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. खरेदी १ मे ते ३० जून   दरम्यान करण्यात येणार आहे.   संकरित ज्वारीचा हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ३७१ रू. असून, मालदांडी ज्वारीचा हमीदर ३ हजार ४२९ रू. आहे. मक्याचा हमीभाव प्रतिक्विंटल २ हजार २२५ रू. असून, बाजरीचा हमीदर प्र. क्विं. २ हजार ६२५ रू. आहे.   शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर एनईएमएल पोर्टलवर करण्यासाठी शेतक-यांचा पिकाचा उल्लेख असलेला सातबारा उतारा आधारपत्राची प्रत, आधार जोडणी असलेले बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, शेतकऱ्याचा फोटो आवश्यक आहे. देय रक्कम अदा करण्याची प्रणाली पीएफएमएस असून, संयुक्त बँक खाते चालणार नाही...

व्यावसायिक वाहनांवरील जाहिराती आता मराठीत बंधनकारक

  व्यावसायिक वाहनांवरील जाहिराती आता मराठीत बंधनकारक   अकोला, दि. २३ : मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, राज्यात नोंदणीकृत सर्व व्यावसायिक (कमर्शियल) वाहनांवरील सामाजिक संदेश, जाहिराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन मालकांना या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आवाहन केले आहे. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा असल्यामुळे आणि बहुतांश नागरिक हे मराठी भाषिक असल्यामुळे सार्वजनिक माहिती मराठीत देणे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लाभला आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन व सन्मान राखणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. अनेक व्यावसायिक वाहनांवर हिंदी अथवा अन्य भाषांतील जाहिरातींमुळे मराठीच्या प्रचार व प्रसारावर मर्यादा येतात.   त्यामुळे जाहिराती, तसेच प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहून मराठीचा योग्य सन्मान राखला जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी केले आहे. ०००

अनुसूचित जातीतील युवकांसाठी उपक्रम कपडेनिर्मितीबाबत विनामूल्य प्रशिक्षण

    अनुसूचित जातीतील युवकांसाठी उपक्रम कपडेनिर्मितीबाबत विनामूल्य प्रशिक्षण अकोला, दि. २३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील बेरोजगार युवक, युवती आणि महिलांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) वस्त्रनिर्मिती विनामूल्य प्रशिक्षण घेण्यात येत आहे.   हे ४५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण असेल. अमरावती येथील कस्तुरबा सौर खादी क्लस्टर परिसरात दि. २९ एप्रिल ते १४ जून २०२५ प्रशिक्षण होईल. या प्रशिक्षणात ४० पात्र लाभार्थ्यांची निवड होणार आहे. त्याद्वारे वस्त्रोद्योगातील सर्वसमावेशक तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात कापसापासून दोरा व कापड निर्मिती, त्यानंतर तयार कपडे निर्मितीचे   प्रात्यक्षिक, तसेच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, शासकीय योजनांची माहिती, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबी तज्ज्ञांकडून शिकविल्या जाणार आहेत.   प्रशिक्षणादरम्यान चहा, नाश्ता, भोजन व निवासाची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे. सहभागासाठी १८ ते ५० वर्षे या वयोमर्यादेतील किमान १० वी उत्तीर्ण किंवा आयट...

सेवा हक्क दिन 28 एप्रिलला साजरा होणार लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती; जिल्हास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन

  सेवा हक्क दिन 28 एप्रिलला साजरा होणार लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती; जिल्हास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन   अकोला, दि. २३: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून सेवा हक्क दिन जिल्ह्यात विशेष उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथे कार्यक्रम होईल. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अकोला ॲड. आकाश फुंडकर, तसेच विविध मान्यवर उपस्थित राहतील.   जिल्ह्यात ग्रामपातळीवर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांना लोकसेवा हक्क अधिनियम, राज्य सेवा हक्क आयोग आणि ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाइन सेवा यांची माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, त्याचप्रमाणे, प्रातिनिधीक स्वरूपात ५० लाभार्थ्यांना सेवा हक्क प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. आदर्श आपले सरकार केंद्राचे उद्घाटनही यादिवशी होईल. सर्व शासकीय कार्यालये आणि ‘आपले सरकार’ केंद्रांमध्ये सेवांची व शुल्कांची माहिती देणारे क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. नागरिकांना अधिक सुलभतेने सेवा व ...

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन संपर्क क्रमांक:- 022-22027990

 काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'राज्य आपत्ती व्यवस्थापन'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन संपर्क क्रमांक:- 022-22027990 मुंबई, दि. 23 : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि  त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्...

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

इमेज
  महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण By   Team DGIPR  - एप्रिल 23, 2025 मुंबई ,  दि. २३ :  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून, सर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणुका पार पडल्या आहेत. आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत दर तासाला सरासरी 58 लाख मतदारांनी मतदान केले. तथापि, शेवटच्या दोन तासांत अपेक्षित 116 लाखांच्या तुलनेत केवळ 65 लाख मतदारांनी मतदान केले, हे लक्षवेधी असले तरी त्यावरून कोणत्याही गैरप्रकाराचा निष्कर्ष काढता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून मतदानानंतर कोणतीही तक्रार अधिकृतपणे निवडणूक न...

पातूर तालुक्यात ’मनरेगा’द्वारे मोठी रोजगारनिर्मिती

अकोला, दि. २२ :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पातूर तालुक्यात सन 2024-25 मध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. यंदा 4 लक्ष 30 हजार 706 मनुष्य दिवस निर्मिती झाल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.  तालुक्यामध्ये अद्यापही मग्रारोहयोअंतर्गत वैयक्तीक सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, तुती लागवड, वृक्ष लागवड, नाला खोलीकरण, रस्ता खडीकरण, शेत/पाणंद रस्ते आदी वैयक्तीक व सार्वजनिक स्वरुपाची कामे सुरू असून सदर कामावर ग्राम पंचायत स्तरावरील मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात येते. तालुक्यात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मग्रारोहयो अंतर्गत एकूण 4 लक्ष 30 हजार 706 मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे. ०००  

कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराने जनसंपर्क क्षेत्रातील कामे प्रभावीपणे करावीत - प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

इमेज
  अकोला ,   दि.  22   : आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क क्षेत्र हे विश्वासावर चालते. कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI)   आणि चॅटजीपीटी ( ChatGPT)   आदीसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे. एआय ,   चॅटजीपीटी ,   कॅनव्हा आदी सगळी साधने आहेत ,   याचा वापर योग्यरित्या करायला शिका. या साधनांचा उपयोग करून जनसंपर्क क्षेत्रातील कामे अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीत ,   असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया ,   मुंबई विभागाच्यावतीने प्रेस क्लब ऑफ इंडिया ,   मुंबई येथे आयोजित  “ कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर : जनसंपर्काची भूमिका ”  या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी अतिथी वक्ते द इकॉनॉमिक टाईम्सचे कार्यकारी संपादक मुकबिल अहमर ,   इंडियन ऑइलच्या मुख्य महाव्यवस्थापक तथा पब्लिक रिलेशन्स सोसायटी ...

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या महिला व बालविकास विभागाचे आवाहन

  बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या महिला व बालविकास विभागाचे आवाहन   अकोला, दि. २१ :   आपल्या परिसरात कुठेही अनधिकृत, बालगृहे, वसतिगृहे चालवली जात असल्याचे आढळताच टोल फ्री क्रमांक १०९८ वर तत्काळ माहिती द्यावी व बालकांच्या शोषणास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे विनापरवानगी बालगृहे, वसतिगृहे आणि अनाथाश्रम चालवले जात असल्याचे वृत्त माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले. या ठिकाणी बालकांना जबरदस्तीने ठेवून त्यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. ही बाब अतिशय गंभीर असून बाल न्याय अधिनियम २०१५, २०२१ मधील सुधारित कायदा आणि महाराष्ट्र बाल न्याय नियम २०१८ यांचे सरळ उल्लंघन आहे. या अधिनियमाच्या कलम ४२ नुसार, अशा प्रकारच्या संस्थांना आवश्यक ती मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्राविना संस्था चालवणाऱ्या व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास व किमान १ लाख रुपयांचा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ...

शाखा डाकपालाचा गैरव्यवहार; टपाल खातेदारांना माहिती सादर करण्याचे आवाहन

    शाखा डाकपालाचा गैरव्यवहार; टपाल खातेदारांना माहिती सादर करण्याचे आवाहन     अकोला, दि. २१ : टपाल खात्याच्या वाई परगणे येथील शाखा डाकपालाने बचत योजनांतील शासकीय रकमेचा खासगी कामांसाठी वापर केला. त्याबाबत कारवाई सुरू आहे. दरम्यान, या शाखेच्या खातेदारांनी आपल्या बचत ठेव योजना, रकमा आदी माहिती कागदपत्रांसह दि. २५ एप्रिलपूर्वी सादर करण्याचे आवाहन खात्याच्या प्रवर अधिक्षकांनी केले आहे.   कारंजा उपडाकघरअंतर्गत वाई परगणे शाखा आहे. तेथील शाखा डाकपाल संजय शाळिग्राम भुयटे यांनी खातेदारांच्या बचत खाते, आवर्ती जमा, सुकन्या समृद्धी योजना अशा विविध खात्यांतील शासकीय रकमेचा गैरव्यवहार करून ती खासगी कामासाठी वापरल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला. त्याबाबत कारवाई सुरू आहे. दरम्यान, या शाखेच्या खातेदारांनी आपले संबंधित बचत योजनेचे खातेपुस्तक किंवा तत्सम कागदपत्रे दि. २५ एप्रिलपूर्वी सहाय्यक अधीक्षक, वाशिम पश्चिम उपविभाग, मूर्तिजापूर यांच्याकडे तपासणीसाठी सादर करावीत. जे खातेदार मुदतीत आपले पुस्तक तपासणीला सादर करणार नाहीत, त्यांचा कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही,...

घरकुल निर्मितीत अकोला जिल्हा राज्यात दुसरा 100 दिवसीय कार्यक्रमात उद्दिष्टापेक्षा 83 टक्के अधिक काम

इमेज
  अकोला, दि. 18 : ग्रामीण गृहनिर्माण योजनेत 100 दिवसांचे उद्दिष्ट पूर्ण करून अकोला जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. उद्दिष्टाच्या 183 टक्के काम करून साडेचार हजारावर घरकुले पूर्ण केली आहेत. शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमात महाआवास अभियान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना ग्रामीण भागात जिल्ह्याचे 2 हजार 516 उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण आवास योजनेच्या दुस-या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थींना घरकुल मंजुरीपत्र व २१ हजार ६२७ लाभार्थींना पहिला हप्त्याचे वितरण राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले होते. महाआवास योजनेत अधिकाधिक घरे पूर्ण करून गरजूंना लाभ मिळवून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार प्रक्रिया गतीने राबविण्यात आली. या प्रक्रियेत घरकुलांना मंजुरी देणे, प्रथम हप्ता वितरित करणे, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणे, घरकुल बांधकाम पूर्ण करणे असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. प्रशासनाकडून कामाला गती देत उद्दिष्टापलीकडे जाऊन एकूण 4 हजार 600 घरकुले पूर्ण  करण्यात आली. या उल्लेखनीय क...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नूतन इमारत शेतकरीभिमुख धोरणे राबविण्यास शासनाचे प्राधान्य पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

इमेज
  अकोला, दि. 18 /अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने   विविध बाबतीत अग्रेसर राहत राज्यात चांगला लौकिक मिळवला आहे. शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून  शेतकरीभिमुख धोरणे राबविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी केले.  चोहोट्टा बाजार येथील जिल्हा बँकेच्या नविन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर कानकिरड, संचालक रमेशराव हिंगणकर, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, शिरीष धोत्रे, अंबादास तेलगोटे, डॉ. जयराज कोरपे तसेच प्रमुख अतिथी म्हणून हिदायतउल्लाखॉ पटेल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य, सेवा सहकारी सोसायट्यांचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य व शेतकरी, ग्राहक ठेवीदार बँकेचे अधिकारी, गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री श्री. फुंडकर   म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उत्तम कारभाराने बँकेने शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. शेतकऱ्यांसाठी जिल्हा सहकारी बँक अत्यंत महत्त्वाची असते...

वेव्हज् : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ

विशेष लेख : वेव्हज् : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ   लेखक  :  आमिर   खान ,  अभिनेता   आणि   निर्माते मनोरंजन व्यवसायात योगदान देणाऱ्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाण - घेवाणीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या वेव्हज शिखर परिषद आणि   वेव्हज   बाजाराविषयी   भारत हा मनोरंजन आणि माध्यम उद्योग जगतातला एक आघाडीचा आणि तितकाच महत्त्वाचा देश . भारतात या उद्योग क्षेत्राची प्रगतीही तितक्याच झपाट्याने होत आहे आणि त्यासोबतच या परिसंस्थेच्या अवकाशात सातत्याने होत असलेल्या बदलांसह हे क्षेत्रही तितक्याच सातत्यपूर्णतेने बहरत चालले आहे . आज या क्षेत्राकडे नीट पाहिले तर विविध व्यासपीठांवरच्या आशय निर्मितीनेही मोठी उसळी घेतल्याचे दिसते . यामागचे कारण म्हणजे देशातील वाढत्या डिजिटल प्रसारण सेवा ,  प्रादेशिक भाषांमधील आशय सामग्री निर्मिती आणि सातत्याने नव्या ,  खिळवून ठेवणाऱ्या ,  सर्वसमावेशकतेच...