पोस्ट्स

'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे मा. मुख्यमंत्री यांचे निर्देश

  ' एल-निनो 'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क ' जिल्हा चारा सुरक्षा आराखडा ' तयार करण्याचे मा. मुख्यमंत्री यांचे निर्देश   भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार , २०२६ च्या मान्सूनवर ' एल-निनो ' (El-Nino) या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते. ' एल-निनो ' मुळे पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ' जिल्हा नियोजन व विकास समिती ' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे. बियाणांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता , मका , ज्वारी , बाजरी यांसारख्या चारा बियाणांचे कार्यारंभ आदेश महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) , अकोला यांना तात...

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान शासकीय कर्मचारी गटात हृषिकेश आंग्रे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार वितरण

इमेज
    राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान शासकीय कर्मचारी गटात हृषिकेश आंग्रे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार वितरण अकोला, दि. २१ :   राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानात सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रमांर्तगत शासकीय कर्मचारी या गटात गव्हर्नमेंट ॲसेट मॅपिंगकरिता प्रथम पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूलसेवक ऋषिकेश आंग्रे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज प्रदान करण्यात आला. नागरी सेवा दिन   2026   आणि   ‘ राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा   2025-26’   अंतर्गत पारितोषिक वितरण सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. कौशल्य ,   रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा ,   मुख्य सचिव राजेश अग्रवाल ,   सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकजकुमार तसेच पुरस्कारार्थी उपस्थित होते. ई-भूमिती हा एक अभिनव जीआयएस-आधारित डिजिटल उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून, त्याच्या निर्मिती व अंमलबजावणीत श्री. आंग्रे या...

आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

इमेज
 आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर   मुंबई, दि. २१: राज्यातील आयटी  क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्सथान करावी, असे निर्देश ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.  मंत्रालयात पुणे शहरातील हिंजवडी येथील आय टी पार्क मधील विविध आय टी कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कामगार मंत्री बोलत होते.  बैठकीस आमदार शंकर जगताप, अपर मुख्य सचिव श्रीमती आय. ए कुंदन, कामगार आयुक्त एच पी तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदींसह आय टी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.  कामगार मंत्री ॲड फुंडकर म्हणाले, आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर होणारी जबरदस्ती, अन्यायकारक राजीनामा घेण्याची प्रक्रिया आणि एचआर (HR) नियमांमधील त्रुटी दूर करण्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यासोबतच  विशेष अभ्यास गट गठीत करण्यात यावा. आयटी कंपन्यांमध्ये कर्...

अकोला जिल्ह्यात 536 रुग्णांना सुमारे 4.36 कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

    अकोला जिल्ह्यात 536 रुग्णांना सुमारे 4.36 कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती अकोला, दि. 21 : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे.   अकोला जिल्ह्यात आर्थिक वर्षात 536 रुग्णांना सुमारे 4 कोटी 36 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींचे सहकार्य लाभत आहे.               मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मद...

मैदानावरील रणरागिणी: अकोल्यातील महिला खेळाडूंची झेप

इमेज
  मैदानावरील रणरागिणी: अकोल्यातील महिला खेळाडूंची झेप  अकोला : महाराष्ट्राच्या मातीला खेळाचा मोठा वारसा लाभला आहे. अकोला जिल्ह्याने कला, साहित्य आणि राजकारणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अलीकडच्या काही वर्षांत अकोल्यातील मुलींनी परिस्थितीवर मात करून मैदाने गाजवायला सुरुवात केली आहे. अकोला जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात अनेक महिला खेळाडूंनी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. महिला सक्षमीकरणाअंतर्गत महिला खेळाडूंना राज्य शासनाने जिल्हा क्रीडा कार्यालय व विविध माध्यमातून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. क्रिकेट असो वा ॲथलेटिक्स, अकोल्याच्या कन्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर पदकांची लयलूट केली आहे. प्रशिक्षक संदीप ढोके, बॉक्सिंग कोच सतीशचंद्र भट, बुद्धिबळ प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल, क्रिकेट प्रशिक्षक प्रवीण मुळे यांच्यासारखे उत्तमोत्तम प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रात चांगले काम करत आहेत. राष्ट्रीय पदकविजेता यमिनी ठाकरे यांनी ॲथेलॅटिक्समधील 10 हजार मी. स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. खुशी तायडे यांनी 100 मी. व 200 मी. स्पर्धेत महाराष्ट...

सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक शिबिरे घेऊन प्राप्त अर्जांचा आठवड्यात निपटारा करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश

इमेज
  सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक शिबिरे घेऊन प्राप्त अर्जांचा आठवड्यात निपटारा करा -         जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश अकोला, दि. २० : सेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित सेवा नागरिकांना कालमर्यादेत पुरविणे आवश्यक आहे. त्यात एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये. सर्व यंत्रणांनी शिबिर स्तरावर काम करून आठवडाभरात सर्व अर्जांचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. सेवा हक्क अधिनियमानुसार प्राप्त अर्जांवर विविध यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, अधिनियमानुसार  कालमर्यादा लक्षात घेऊन अर्जांचे निराकरण व्हावे. या बाबीचा विभागप्रमुखांनी आपल्या विभागात प्रत्येक तालुक्यात आढावा घ्यावा. शिबिरांचे आयोजन करून आठवडाभरात सर्व अर्ज निकाली काढा. एकही अर्ज प्रलंबित राहता कामा न...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

  लेख मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना              मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी राबविण्यात आलेली एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे ,  त्यांच्या आर्थिक गरजा भागवणे आणि समाजात त्यांचे स्थान अधिक मजबूत करणे होय. महाराष्ट्र राज्यात महिलांचे सक्षमीकरण हे सामाजिक व आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे घटक मानले जाते. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना केवळ आर्थिक सहाय्य देणारी नसून महिलांच्या सन्मान ,  स्वाभिमान आणि आत्मविश्वासाला बळकटी देणारी एक प्रभावी सामाजिक उपक्रम आहे. आजच्या आधुनिक युगातही अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्याची संधी मिळत नाही. विशेषतः ग्रामीण भागात आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमध्ये महिलांना स्वतःच्या गरजांसाठीही इतरांवर...

जिल्ह्यात उष्णतेची लाट; हवामान विभागाचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

  जिल्ह्यात उष्णतेची लाट ;  हवामान विभागाचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन अकोला ,  दि.  17 :  नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे दि.  17  एप्रिल ते दि.  19  एप्रिल दरम्यान अकोला ,  तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी दुपारी  12  ते  4  या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे ,  बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत ,  उन्हात वाहने शक्यतो चालवू नये ,  ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे ,  लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नयेत ,  तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे ,  अशक्तपणा ,  स्थूलपणा ,  डोकेदुखी ,  सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा ,  पशुधनास तसेच प...

अक्षयतृतीयेला गावात बालविवाह होऊ नये याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन

  अक्षयतृतीयेला गावात बालविवाह होऊ नये याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन            अकोला, दि. 17 : अक्षयतृतीया दि. 19 एप्रिल रोजी असुन यादिवशी अनेक ठिकाणी विवाह सोहळे आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कुठेही बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. अक्षयतृतीयेचा मुहुर्त हा शुभमुहुर्त असुन त्यावेळी सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजीत केले जातात. विवाहाकरिता शासनाने मुलांचे वय २१ वर्ष व मुलींचे वय १८ वर्ष निश्चीत करण्यात आले आहे   यापेक्षा कमी वयाचे मुलामुलींचा विवाह झाल्यास तो विवाह बालविवाह ठरतो व असे विवाह बालविवाह प्रतिबंध अधिनीयम २००६ नुसार बेकायदेशीर ठरतात. अशा कृतीविरोधात गुन्हा नोंदविला जातो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी असुन शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी हे बालविवाह प्रतिबंधअधिकारी आहेत. गावांमध्ये ग्...

दुचाकी वाहनांकरिता नविन मालिका (MH30CD)

                       प्रादेशिक परिवहन कार्यालय,अकोला येथे अकोला जिल्हा कार्यक्षेत्रातील निवासी पत्ता असलेल्या नागरिकांसाठी दुचाकी वाहनांकरिता नविन मालिका (MH30CD) सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना दुचाकी करीता नियमित विहित शुल्क भरुन तसेच खाजगी चारचाकी व   इतर वाहन वर्गाच्या वाहनांसाठी त्या संवर्गातील वाहनांच्या विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरुन आकर्षक/पसंती क्रमांक राखीव करावयाचे आहेत, त्यांनी दिनांक 21/04/2026 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान पसंतीचे क्रमांकाच्या विहित नमुन्यातील अर्जासह आधार कार्ड, रहिवाशी पत्ता पुरावा, पॅनकार्ड या कागदपत्रांच्या साक्षंकित प्रती खुल्या लिफाफ्यात कार्यालयाच्या रोख विभागात जमा कराव्यात. सदर लिफाफ्यावर वाहन मालकाचे नाव, वाहन वर्ग, पसंती क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक लिहिलेला असावा.                        ...