पोस्ट्स

‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियान राबविणार

इमेज
‘सीईओं’च्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समितीची बैठक अकोला, दि. 4 : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात “माझं गाव आरोग्य संपन्न गाव”या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून वर्षभर होणार आहे. अभियानाच्या नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या अध्यक्षतेत झाली. ग्रामीण आरोग्यसेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि परिणामकारक करण्यासाठी हे अभियान राबविले जात असून अधिकाधिक परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश श्रीमती मेश्राम यांनी यावेळी दिले. रोग प्रतिबंधक, प्रोत्साहनात्मक व प्रारंभिक आरोग्यसेवा अधिक बळकट करणे, आरोग्यविषयक जनजागृती व सामाजिक वर्तनात सकारात्मक बदल घडविणे, स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, पोषण व मानसिक आरोग्यावर विशेष भर, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण, मातृ व बाल आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे ही अभियानाची उद्दिष्टे आहेत. अभियानात ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना “आरोग्य संपन्न गाव” म्हणून घोषित करून त्यांना राज्य, विभाग व जिल्हा स्तरावर आर्थिक पुरस्कार दिले जाणार आहेत. ...

बार्टीतर्फे अकोल्यात ग्राफिक्स डिझायनिंगचे प्रशिक्षण

  बार्टीतर्फे अकोल्यात ग्राफिक्स डिझायनिंगचे प्रशिक्षण अनुसूचित जाती   प्रवर्गातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन अकोला, दि. 4 : बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी फोटोशॉप व ग्राफिक्स डिझाईनिंग या विषयांवरील दोन महिन्यांचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. शास्त्रीनगरातील डाटामेट संगणक केंद्र येथे दि. ७ मार्च ते ११ मे दरम्यान हे प्रशिक्षण होईल. इच्छूकांनी दि. ५ मार्च रोजी दु. २ पूर्वी श्री. शिरसाठ, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, शुक्ल सदन, दुर्गा चौक, अकोला येथे हजर राहावे. वय १८ ते ४५, जात प्रमाणपत्र, आधारपत्र, पॅनकार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, छायाचित्र आदी कागदपत्रे सोबत आणावीत. दि. ६ मार्चला दु. १२ वा. मुलाखती होतील. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी, विजय बेदरकर यांच्याशी संपर्क साधावा. ०००

सर्व सामान्यांसाठी उपयुक्त “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” ‘अर्थसंकल्प कसा वाचावा’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहा वर्षांपूर्वीच पुस्तक !

     सर्व सामान्यांसाठी उपयुक्त  “ अर्थसंकल्प  सोप्या भाषेत ”   ‘अर्थसंकल्प कसा वाचावा’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहा वर्षांपूर्वीच पुस्तक !   नागपूर, दि. ४ :  येत्या ६ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ष २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सर्व सामान्यांना समजावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले  “ अर्थसंकल्प सोप्या भाषेत ”  हे पुस्तक उपयुक्त ठरणार असून सर्वांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.               राज्याच्या आर्थिक प्रगतीचे धोरण असणारा अर्थसंकल्प सर्व सामान्यांना समजावा यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी    “ अर्थसंकल्प सोप्या भाषेत ”  हे पुस्तक लिहिले. आजच्याच दिवशी (४ मार्च) २०२० मध्ये हे नागपूर येथील लाखे प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.             या पुस्तकात ‘बजेट’ शब्...

‘अमृत' तर्फे प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना

    ‘अमृत' तर्फे प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना अकोला, दि. 2 : सी-डॅक या नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या 'अमृत' लक्षित गटातील उमेदवारांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देण्याची योजना राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी 'अमृत' च्या अधिकृत संकेतस्थळावर ३१ मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फ राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०२६ च्या बॅचमध्ये सी-डॅकमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षणासाठी कमाल २० लाभार्थ्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अमृत लक्षित गटात ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगू...

युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी आत्पकालीन कार्य केंद्राकडून सूचना जिल्हा नियंत्रण कक्षाचे आवाहन

  युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी आत्पकालीन कार्य केंद्राकडून सूचना   जिल्हा नियंत्रण कक्षाचे आवाहन अकोला ,   दि. २ : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून ,   परदेशात वास्तव्यास असलेल्या व अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या आहेत.   राज्यात मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई (०२२) २२०२७९९०, ९३२१५८७१३४३ ही हेल्पलाईन सुरू आहे. त्याचप्रमाणे, अकोला जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा नियंत्रण कक्ष (०७२४) २४२४४४४ आणि पोलीस नियंत्रण कक्ष (०७२४) २४३५५००   हेल्पलाईन सुरू असून, संबंधितांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.   भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने ,   तसेच विविध भारतीय दूतावासांनी २४ × ७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केले असून ,   राज्य शासन या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अनावश्यक...

महसूल विभाग आपल्या दारी > छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर – टप्पा‑1 महसूल मंडळ व न. प. स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन विविध दाखले, सेवांचा मिळणार लाभ; अडचणींचे तत्काळ निराकरण अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा

महसूल विभाग आपल्या दारी > छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर – टप्पा‑1 महसूल मंडळ व न. प. स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन विविध दाखले, सेवांचा मिळणार लाभ; अडचणींचे तत्काळ निराकरण अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. २ : जिल्ह्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा‑1’ राबविण्यात येत असून, सर्व तालुक्यांत महसूल मंडळ व नगर परिषद पातळीवर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. या शिबिरांमध्ये सात‑बारा, नमुना‑९, नामबदल, महसूल कर, वन‑विभागाच्या मान्यता, नाहरकत प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र अशा अनेक महसूल आणि इतर सरकारी सेवांचा लाभ एकाच ठिकाणी घेता येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव व नागरिकांना कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहणार नाही. एकाच छताखाली महसुली सेवांचा लाभ मिळणार असल्याने वेळ वाचणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या मार्गदर्शन...

गुरु तेगबहादूर जी : सहिष्णुता, करुणा आणि धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक

 गुरु तेगबहादूर जी : सहिष्णुता, करुणा आणि धर्मस्वातंत्र्याचे प्रतीक   -प्रो. डॉ. दीपक मो. शिंदे  परीक्षा नियंत्रक, केंद्रीय जन जाती विद्यापीठ, विजयानगरम (विशाखापट्टणम) माजी संचालक – श्री गुरु गोबिंद सिंघ जी      अध्यासन संकुल व संशोधन केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, भारतीय इतिहासात अशी काही महान व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत की, ज्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरते अशा महान विभूतींचे  कार्य एखाद्या धर्माच्या चौकटीत न अडकता संपूर्ण मानवजातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरले आहे. शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर जी, हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य, न्याय, करुणा, धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अर्पण केले. त्यांच्या बलिदानाला  350 वर्षे पूर्ण होत असताना, त्यांचे सामाजिक सुधारक म्हणून असलेले कार्य आणि विचार आजही तितकेच सुसंगत आणि मार्गदर्शक आहेत. प्रत्यक्षात शीख धर्म असा एक धर्म आहे की या धर्माच्या धर्म गुरुनी दिलेल्या बलिदाना मुळे हिंदू धर्माचे रक...

‘स्कॉच अवॉर्ड’साठी ई-भूमिती प्रकल्पाचे नामांकन अकोलेकरांनी मत नोंदविण्याचे आवाहन

  ‘स्कॉच अवॉर्ड’साठी ई-भूमिती प्रकल्पाचे नामांकन अकोलेकरांनी मत नोंदविण्याचे आवाहन अकोला, दि.   २६ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या “ ई-भूमिती प्रकल्प ” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रतिष्ठित स्कॉच अवॉर्डच्या अंतिम नामांकन यादीसाठी निवड झाली आहे. ही   जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असून आता या यशाला अधिक उंचीवर नेण्यासाठी आपल्या प्रत्येक मताची गरज आहे. त्यामुळे संबंधित लिंकवर जाऊन मताची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   हा प्रकल्प नागरिकांना भूमी संदर्भातील सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आला आहे. डिजिटल प्रशासनाच्या दिशेने अकोला जिल्ह्याने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपले एक मत अकोला जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देऊ शकते. त्यामुळे 🔗 https://exhibition.skoch.in/beacon-of-hope/collector-officer-akola/ या लिंकवर “ e-Bhoomiti Project – Collector Office Akola ” ला आपले अमूल्य मत द्यावे. अकोला जिल्ह्याचा डिजिटल प्रगतीचा ध्वज उंचावणार आहे. मत देताना दिनांक २५ फेब्रुवारी ...

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

इमेज
  शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू   बुलडाणा, दि. २५ : आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ भविष्या'ची ग्वाही देणारी आहे. त्याचा अवलंब व प्रसार होत असतानाच, औषधी वनस्पतींचे संवर्धनही  होणे आवश्यक आहे. हा केवळ शासन–प्रशासनाचा उपक्रम न  राहता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केले. केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्यातर्फे शेगाव येथील विसावा भक्तनिवास संकुल परिसरात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा,  अ. भा. आयुर्वेद ...

जिल्हाधिका-यांनी घेतला जलजीवन मिशनचा आढावा कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
    जिल्हाधिका-यांनी घेतला जलजीवन मिशनचा आढावा कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा जिल्हाधिकारी वर्षा मीना   अकोला, दि. २४ : जिल्ह्यातील नागरिकांना जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणीद्वारे शुद्ध पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट असून, ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन- जलजीवन मिशन समितीची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. मिशनमधील उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या अनुषंगाने प्रत्येक योजनेचा सातत्याने पाठपुरावा होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.     यावेळी कार्यकारी अभियंता श्री. राठोड म्हणाले, योजनेत अकोला तालुक्यातील ८९, अकोटमधील १४५, तेल्हारा तालुक्यातील ९६, बाळापूर तालुक्यातील ६५, पातूर तालुक्यातील २८, मूर्तिजापूर तालुक्यातील ७१, ...