पोस्ट्स

पेरणीची घाई नको; घरचे बियाणे वापरा कृषी विभागाचा सल्ला

    पेरणीची घाई नको; घरचे बियाणे वापरा कृषी विभागाचा सल्ला         अकोला, दि. १ : येत्या खरीप हंगामामध्ये अल-निनो च्या पार्श्वभूमीवर कमी व असमान पावसाचा अंदाज असून मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. 100 मी.मी पाऊस झाल्यानंतरच   पेरणीचे नियोजन करावे , असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.                बाजारातील महागडे सोयाबीन बियाणे न वापरता स्वतःजवळील घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी घेऊन ब ी जप्रकिया करून बियाणे म्हणून वापर करावा. सोयाबीन पिकाची पेरणी   रुंद वरंबा व सरी पद्धतीने   ( बीबीएफ ) किंवा बेडवर टोकन पद्धतीने केल्यास बियाण्याची बचत होऊन अधिक उत्पादनाची   हमी असते. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. ०००

कुष्ठरूग्ण शोधमोहिमेला जिल्ह्यात प्रारंभ

      कुष्ठरूग्ण शोधमोहिमेला जिल्ह्यात प्रारंभ अकोला, दि. १ : राज्यात सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण प्रसाराचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतर्फे जिल्ह्यात कुष्ठरूग्ण शोध मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्ह्यातील मागील पाच वर्षांमध्ये एकही कुष्ठरुग्ण आढळून न आलेल्या ५११ गावांमध्ये विशेष घरोघर सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण ४ लाख ४ हजार ८६३ लोकसंख्येची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी घरभेटी देत नागरिकांची कुष्ठरोगासंदर्भात तपासणी करीत आहेत. कुष्ठरोगाबाबत जनजागृती करून रोगाची लक्षणे, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे.   सर्वेक्षणादरम्यान आतापर्यंत ४२८ संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ४ नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. वेळेत निदान व उपचारामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.   या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रत्येक ...

हरवलेल्या मूकबधीर बालकाच्या कुटुंबाचा शोध जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत बालक कुटुंबाकडे सुपुर्द

इमेज
  हरवलेल्या मूकबधीर बालकाच्या कुटुंबाचा शोध जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत बालक कुटुंबाकडे सुपुर्द अकोला, दि. १ : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांमुळे आधार नोंदणीच्या माध्यमातून एका मुकबधीर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश मिळाले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत या बालकाला आज त्यांच्या कुटुंबाच्या सुपुर्द करण्यात आले. याबाबतची हकीकत अशी की, लोहमार्ग चाइल्ड हेल्पलाईनच्या कर्मचा-या दि. ८ एप्रिल रोजी अकोला रेल्वेस्थानकावर एक बालक एकटेच भटकत असताना आढळले. कर्मचा-यांनी त्याची विचारपूस करून त्याला बाल कल्याण समितीच्या आदेशाने शासकीय बालगृहात येथे दाखल केले. बालक मूकबधीर असल्याने पत्ता शोधण्याचे आव्हान होते. बालकल्याण समितीचे सुनील लाडुलकर यांना सुचना केल्यानुसार शासकीय मुकबधीर विद्यालयाच्या शिक्षिकेला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यानुसार संवाद साधण्याचा प्रयत्न झाला. तथापि, त्याद्वारे बालकाचा पत्ता कळू शकला नाही.   त्यानंतर आधार क्रमांकाच्या साह्याने पत्त्याचा शोध सुरू झाला. श्री. लाडुलकर यांनी त्या बालकाची आधार नोंदणी केली. त्यांनी 20 दिवस...

जिल्हा नियोजन समितीची ५ जूनला सभा

  जिल्हा नियोजन समितीची ५ जूनला सभा अकोला, दि. १ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची सभा दि. ५ जून रोजी दु. १ वा. नियोजनभवन येथे आयोजिण्यात आली आहे. सभेच्या विषयसूचीनुसार गत सभेचे इतिवृत्तवाचन व अनुपालन, जिल्हा वार्षिक योजनेत- सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना यांच्या २०२५-२६ च्या खर्चास मान्यता देणे, सन २०२६-२७ या वर्षाचा नियोजन आढावा आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ०००  

पीएम किसान योजनेची वार्षिक ई-केवायसी ३० जूनपूर्वी पूर्ण करा

                                    पीएम किसान योजनेची वार्षिक ई-केवायसी ३० जूनपूर्वी पूर्ण करा  प्रशासनाचे आवाहन              अकोला, दि. २९ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी ३० जूनपूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.              योजनेमध्ये पारदर्शकता आणणे , गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थींपर्यंतच शासनाचे अर्थसाहाय्य पोहचवणे हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यभरात २० मे २०२६ पासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावर यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून , गावपातळीवर याबद्दल जनजागृती करण्य...

‘बीएलओं’ना सहकार्य करा : मतदार नोंदणी अधिकारी

  ‘बीएलओं’ना सहकार्य करा : मतदार नोंदणी अधिकारी अकोला, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 'विशेष सखोल पुनरीक्षण' कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, नावात चूक दुरूस्ती करणे, मयत/स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळणे यांसारखी महत्त्वाची कामे केली जात आहेत. या अनुषंगाने आपल्या घरी येणारे बीएलओ  हे शासन नियुक्त कर्मचारी असुन त्यांनी विचारलेली माहिती देणे हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनातर्फे दि. 30 मे ते 2 जून या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण कागदपत्रांसह शिबिराला भेट देऊन आपले मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निखील खेमनार यांनी केले आहे.   नागरिकांकडून घेतली जाणारी माहिती पूर्णपणे सुरक्षित असून ती केवळ निवडणूक प्रक्रियेसाठीच वापरली जाते. तरी बीएलओ यांना ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड) आणि कुटुंबाची योग्य माहिती देऊन सहकार्य करावे  नागरिकांनी आपली किंवा कुटुंबाची योग्य ...

दिशा समितीची बैठक खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेत विविध योजना व विकासकामांचा आढावा

इमेज
दिशा समितीची बैठक खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेत विविध योजना व   विकासकामांचा आढावा कामे वेळेत पूर्ण करा -        खा. अनुप धोत्रे अकोला, दि. २९ : केंद्र शासनाच्या विविध योजनांतून जिल्ह्यात रस्ते, स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. अशी कामे रखडता कामा नयेत. ती वेळेत पूर्ण व्हावीत. आवश्यक कामांचे वेळेत प्रस्ताव द्यावेत, तसेच केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना करून द्यावा, असे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे दिले.   जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) समितीची बैठक खासदार श्री. धोत्रे यांच्या अध्यक्षतेत नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार नितीन देशमुख, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, महापौर शारदा खेडकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांच्य...

वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

  अकोला, दि. 29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (आदर्श कॉलनी), अकोला येथील इयत्ता ८ वी ते वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी वसतिगृहातील रिक्त जागांनुसार प्रवेश अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, तसेच अनाथ, अपंग व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी ही सुविधा उपलब्ध असून, वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पात्र व गरजू विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल व्ही. बी. कुळकर्णी यांनी केले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून अर्जदारांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

  अकोला, दि. २९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान बस्ती, अकोला येथे विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वसतीगृहात इयत्ता ८ वी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी निवास, भोजन, अभ्यासिका आदी सर्व सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दि. २५ मे २०२६ पासून सुरू झाली आहे. शालेय विभागातील (इयत्ता ७ वी उत्तीर्ण) विद्यार्थिनींनी दि. ३० जून पर्यंत अर्ज सादर करावेत. तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी दि. १५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी https://hmas.mahait.org ही लिंक उपलब्ध असून, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची झेरॉक्स प्रत तसेच सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती वसतीगृह कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वसतीगृहाच्या गृहपाल आर. जे. लेंडे यांनी विद्यार्थिनींनी व पालकांनी पुढील क्रमांकावर (९४२०४३३९७४, ९५६१३१६०१६, ७४९९६०११६२) संपर्क...

शेतकरी बंधूनी डिएपी खतास पर्यायी खते वापरावीत

अकोला, दि. 29 : राज्यामध्ये मागील ३ वर्षात खरीप हंगामात ४४ लाख मे.टन रासायनिक खतांचा वापर झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते व एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खतांचा वापर केला जातो. महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये लवकरच पेरणीला सुरुवात होणार असून डिएपी खताची शेतक-यांकडून जास्त मागणी होणार आहे. डिएपी (डी अमोनिअम फॉस्फेट) खता मध्ये १८ टक्के नत्र तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. राज्यामध्ये डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही त्यामुळे पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-१६ टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस ...