पोस्ट्स

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात प्रमाणित हरभरा बियाणे वितरण

  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात प्रमाणित हरभरा बियाणे वितरण शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; एसएओंचे आवाहन  अकोला, दि. 21 : शे तकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदा नि त दरावर उपलब्ध व्हावे कडधान्य पिकांच्या नवीन वाणाचा प्रचार प्रसार व्हावा व शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय अन्न व पोषण  सुरक्षा अभियान कडधान्य व  नवीन बियाणे अर्थसहाय्य सन २०२५-२६ अंतर्गत प्रमाणित  बियाणे वितरण हरभरा (१० वर्षाआतील) बियाणे रु.५००० प्रति क्वि. (क्षेत्र ०.२० ते २.०० हे. ) मर्यादेत वितरित करण्यात येत आहे. हरभरा या पिकाच्या अनुदान तत्वावर बियाणे लाभ मिळ ण्या करिता सातबारा व फार्मर आयडीसह प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS)  या तत्वावर   जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  लाभ घ्यावा  असे आ वाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता कृषि विभागाच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.     ०००

आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती गठित करावी जिल्हा महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन

  आस्थापनांनी महिला   तक्रार   निवारण समिती गठित करावी जिल्हा महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन     अकोला ,   दि. 21 : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस    प्रतिबंध कायद्यानुसार ,   10   किंवा   10   पेक् षा अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनेमध्ये महिला तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय ,   निमशासकीय ,   सार्वजनिक ,   खासगी आस्थापनांनी अशा समितीचे गठन करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.   शासकीय ,   निमशासकीय कार्यालय ,   संघटना ,   महामंडळे ,   आस्था पना ,   स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी किंवा नगरपरिषद किंवा सहकारी संस्था अशा सर्व आस्थापना ,   तसेच कोणतेही खाजगी क्षेत्र ,   संघटना किंवा खाजगी उपक्रम/संस्था ,   एंटरप्रायजेस ,   अ शासकीय संघटना ,   पुरवठा ,   वितरण व विक्री यासह वाणिज्य ,   व्यावसायिक ,   शैक्षणिक ,   करमणूक ,   औद्योगिक ,   आरोग्यसेवा किं...

लघु, मध्यम उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा कर्ज महामेळावा; कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण उद्योजकांना पाठबळ मिळण्यासाठी उपयुक्त उपक्रम खासदार अनुप धोत्रे

इमेज
  लघु, मध्यम उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा कर्ज महामेळावा; कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण उद्योजकांना पाठबळ मिळण्यासाठी उपयुक्त उपक्रम खासदार अनुप धोत्रे अकोला, दि. 21 : जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे लघु, मध्यम उद्योजकांसाठी कर्ज महामेळावा खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत आज झाला. छोट्या उद्योजकांना आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास खासदार श्री. धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केला.   औद्योगिक वसाहतीतील अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. खासदार श्री. धोत्रे यांनी उपस्थित राहून बँकेच्या उपक्रमांचे कौतुक केले. असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक बिनिता राणी, विभागीय प्रमुख पंकज कुमार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा व आरबीआयचे पीयुष अग्रवाल उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योग, उद्योजक व सूक्ष्म-मध्यम व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ दिले जाईल, असे पंकज कुमार यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात ग्राहक संवाद उपक्रमाचेही...

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा रब्बी हंगाम २०२५

  अन्नधान्य , कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा रब्बी हंगाम २०२५          अकोला, दि. 21 :  राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छा मनोबलामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल , तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल , हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.        शासन निर्णय क्र.पीकस्पर्धा -२०२०/प्र.क्र.११३/४ए , दि.२० जुलै २०२३ अन्वये रब्बी हंगाम २०२५ मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका , जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी , गहू , हरभरा , करडई ...

आला हिवाळा, तब्बेत सांभाळा हिवाळ्यातील आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाचे आवाहन

  आला हिवाळा, तब्बेत सांभाळा हिवाळ्यातील आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाचे आवाहन अकोला, दि. 21 : हिवाळ्यात हवेत आर्द्रतेत घट येते, तापमान घसरते आणि जास्तीत-जास्त वेळ घरात राहण्यामुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढते. हिवाळ्यातील काही सामान्य आजार आणि त्यांना टाळण्यासाठीच्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. त्या पाळण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.   हिवाळ्यात सर्दी, फ्लू, नोरोव्हायरस, ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनियासारखे आजार सामान्यत: दिसून येतात. थंडी सहन करणे कठीण होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन इतर आजारांचा धोका वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत.   सर्दी स र्दी म्हणजे श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला झालेला विषाणू संसर्ग. यामध्ये घसा बसणे, खोकला, शिंका, नाक गळणे आणि हलका ताप येणे या लक्षणांचा समावेश होतो. सर्दी हिवाळ्यात सामान्यत: होण्याची शक्यता असते, आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच सर्दी होऊ शकते.   इन्फ्लुएन्झा (Flu) इन्फ्लुएन्झा विषाणूंमुळे होणारा फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य ...

शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला; जिल्ह्यात 20 परीक्षा केंद्रे केंद्रांवर कडक बंदोबस्त

  शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला; जिल्ह्यात 20 परीक्षा केंद्रे केंद्रांवर कडक बंदोबस्त अकोला, दि. 20 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टेट २०२५) दि. २३ नोव्हेंबरला होणार आहे. जिल्ह्यात एकूण 20 परीक्षा केंद्रे असतील.   परीक्षेत पहिला पेपर सकाळी १०:३० ते दु. १ या वेळेत व दुसरा पेपर दुपारी २:३० ते ५ या कालावधीत होईल. पहिल्या पेपरसाठी एकूण १४ केंद्रे निश्चित असून, ४ हजार २०० परीक्षार्थी व दुस-या पेपरसाठी एकूण २० केंद्रांची निश्चित असून, परीक्षार्थी ५ हजार ५९४ आहेत. दोन्ही पेपर मिळून ९ हजार ७९४ परिक्षार्थी परीक्षेला बसतील. त्यातील १५९ परिक्षार्थी हे दिव्यांग असून त्यांना नियमानुसार अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील. परीक्षार्थींना ओळखीचा पुरावा व परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.   जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेतील जिल्हास्तर परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीमार्फत आयोजन होते. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे उपाध्यक्ष व प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव आहेत. परीक्षेच्या सुयोग्य आयोजनासाठी प्राथमिक  शिक्...

जिल्ह्यातील 2 लक्ष 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 191 कोटी मदत जमा

अकोला दि. 20 : जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी नुकसान मदत व शेतकरी अनुदान वाटपांतर्गत जिल्ह्यातील 2  लक्ष  42  हजार  335  शेतकऱ्यांच्या खात्यात  191 कोटी 7  लक्ष  7  हजार निधी  डीबीटी पोर्टलद्वारे  जमा  करण्यात आले.    जुन ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी, आपत्तीच्या अनुषंगाने शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळण्यासाठी जलद कार्यवाही राबविण्यात निर्देश दिले. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे पंचनाम्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना मदत प्राप्त झाली आहे. अकोला तालुक्यात  41  हजार  71  शेतकऱ्यांच्या खात्यात  34  कोटी 67 लक्ष 44 हजार, तसेच  अकोट तालुक्यात  37  हजार  366  शेतकऱ्यांच्या खात्यात  32 कोटी 92 लक्ष 78 हजार,  बाळापूर तालुक्यात  37  हजार  448  शेतकऱ्यांच्या खात्यात  28 कोटी...

एमआयडीसीमध्ये लीड बँकेतर्फे एमएसएमई क्रेडिट आऊटरिच शिबिर

  एमआयडीसीमध्ये लीड बँकेतर्फे एमएसएमई क्रेडिट आऊटरिच शिबिर अकोला, दि. २० : स्थानिक उद्योजक, सूक्ष्म-लघु उद्योग व्यावसायिक व नवउद्योजकांना व्यवसायवाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन व अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अकोला कार्यालय आणि इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एमएसएमई क्रेडिट आऊटरिच शिबिर दि. २१ नोव्हेंबरला सकाळी ११.३० वाजता एमआयडीसीतील अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात होणार आहे. खासदार अनुप धोत्रे, महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक बुवनेश्वरी एस. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. एमएसएमईचे कर्ज सुविधा व पात्रता, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,मुद्रा व इतर सरकारी योजना, डिजिटल पेमेंट व उद्यम नोंदणी प्रक्रिया, महिला उद्यमीसाठी विशेष योजना, उद्योग वाढीसाठी वित्तीय साक्षरता आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.         स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि स्टार्ट-अप्सनी या संधीचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी नजीकच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन...

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न करा जिल्हाधिकारी वर्षां मीना

इमेज
    विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न करा जिल्हाधिकारी वर्षां मीना   अकोला, दि. 18: विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्ये सुधारण्यासाठी निपुण कार्यक्रम राबवला जातो. जिल्ह्याची स्थिती फारशी समाधानकारक नसून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण यंत्रणा व शिक्षकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.   महसूल सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय निपुण सुकाणू समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य रत्नमाला खडके, एकात्मिक बालविकास उपमुख्य कार्यकारी अमित रायबोले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि गणित यासारख्या मूलभूत गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी निपुण कार्यक्रम राबवला जातो. राज्याच्या क्रमवारीतील जिल्ह्याचे स्थान पाहता या शैक्षणिक स्थितीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तावाढीसाठी सर्व घटकांनी जबाबदारीने काम करावे.   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरि...

महाराष्ट्र बालविवाहमुक्त करण्यात योगदान द्यावे जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  महिला व बालविकास विभागाचे 100 दिवसांचे अभियान महाराष्ट्र बालविवाहमुक्त करण्यात योगदान द्यावे जिल्हाधिकारी वर्षा मीना बालविवाहाच्या पत्रिका न छापण्याचा मुद्रक संघाचा निर्धार धार्मिक नेते व विविध घटकांचा अभियानात सहभाग अकोला, दि. 18 : महिला व बालविकास विभागाकडून बालविवाहमुक्त महाराष्ट्र अभियानात सर्व विभाग, धार्मिक नेते,स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना व नागरिक यांना एकत्र आणण्यात येत आहे.   त्यासाठी दि. 26 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून, सर्वांनी समन्वयाने कार्य करून महाराष्ट्र बालविवाहमुक्त करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.   बालविवाहमुक्त महाराष्ट्र या 100 दिवसांच्या मोहिमेच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, समिती सदस्य, बालकांच्या क्षेत्रात कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, धार्मिक नेते यांच्यासह विवाहासंबंधित सेवा पुरवठादार हॉलमालक, मंडपमालक, लग्न पत्रिका छापणारे म...