पोस्ट्स

अकोल्यात २१ पासून वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव

                          अकोला : सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रमिलाताई ओक हॉल, अकोला या ठिकाणी दि. २१आणि २२जानेवारी २०२६ रोजी साय ६:३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे.  बुधवार दिनांक 21 रोजी सायंकाळी 6:30 वाजता प्रसिद्ध बंजारा नृत्य सादर होणार असून सादरकर्ता कला संघ हा बार्शीटाकळी तालुक्यातील साखरविरा या गावातील ललिता जाधव आणि कलावंत सादर करणार आहेत.  गुरुवार दि. 22 जानेवारी  रोजी सायंकाळी 6:30 वाजता.महाराष्ट्रची लोककला वासुदेव ,गौधळ,भारुड कलापथक खंडीगमत इत्यादी लोककलेचे प्रकार होणार आहेत. सादरकर्ते - शाहिर विशाल ना.राखोंडे व लोककवी सागर राखोंडे संच, साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातुर व स्व.विनायक  राखोंडे प्रतिष्ठान,पातुर या  कार्यक्रमात एकूण 15 कलावंत सहभागी होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य मंत्री  आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच विभागाचे संचालक  विभीषण चवरे यांच्या नियो...

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घ्यावा

इमेज
  हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले   नांदेड ,  दि. १७ : ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान ,  नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था ,  संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा ,  असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर ,  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे ,  कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान , तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते. मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० स्टॉल उभारण्यात येणार असून प्रत्येक सामाजिक संघटनेने...

‘ हिंद दी चादर’ गुरु तेगबहादुर साहिब यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण

  विशेष लेख :        ‘हिंद दी चादर’,श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत गेल्यावर्षी ७ डिसेंबर रोजी झालेल्या देखण्या आयोजनानंतर २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत नांदेड येथे भव्य अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी  यांनी धर्म व देश रक्षणासाठी दिलेले बलिदान अनन्य साधारण आहे.  त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही देशासाठी शहादत दिली. हा गौरवशाली इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचे स्मरण करणारा आणि गुरुंनी देश-धर्मासाठी दिलेल्या बलिदानावर प्रकाश टाकणारा हा लेख…             कश्मीरचा सुभेदार हा हिंदू धर्म धोक्यात आल्याने शिखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांच्या मदतीसाठी गेले. ‘ना पेह देना ! ना पेह सेना’ म्हणत (घाबरायचे नाही व घाबरवयाचेही नाही) हिंदू धर्मियांना मुस्लिम होण्यापासून वाचविण्यासाठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी गुरु तेगबहादुर साहिब यांनी ...

हिंद दी चादर - गुरु तेग बहादूर साहिबजी

  विशेष लेख हिंद दी चादर - गुरु तेग बहादूर साहिबजी भारतीय इतिहासात सत्य, करुणा आणि मानवतेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या  महान संत व योद्ध्यांचा समावेश आहे. अशा युगपुरुषांमध्ये शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी केवळ आपल्या श्रद्धेसाठी नव्हे, तर सर्व धर्मांच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले म्हणूनच ते “हिंद दी चादर” — भारताची संरक्षक ढाल म्हणून ओळखले जातात. समाजाचे स्वातंत्र्य धोक्यात आले असताना गुरु तेग बहादूर साहिबजी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध उभे राहिले. त्यांनी शस्त्रापेक्षा सत्य, संयम आणि नीतिमत्ता या मूल्यांना अधिक बळ दिले. त्यांच्या उपदेशात सेवा, साधेपणा, परोपकार आणि निर्भयता यांचा सातत्याने पुरस्कार दिसतो. त्यांच्या अनेक रचना आजही गुरु ग्रंथ साहिबमध्ये आदराने समाविष्ट आहेत.   जेव्हा संपूर्ण भारतात अन्याय वाढला होता, तेव्हा गुरु तेग बहादूर साहिबजींनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी प्रतिकार केला, पण द्वेषाने नव्हे तर आत्मबलाने. त्यामुळे त्यांना हिंद दी चादर ही उपाधी मिळाली — म्हणजेच संपूर्ण भारताला झाकणारी करुणेची ढाल....

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

 शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही मुंबई, दि. 15 : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.  मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी म...

शीख बांधवांची अखंड लंगर सेवा…

 शीख बांधवांची अखंड लंगर सेवा…        निस्वार्थ सेवा आणि एकाच देवाची उपासना सामाजिक सेवेत समुदायाचा सहभाग या सुत्रांनी समाज उभारणी करून श्री गुरू नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना केली. धर्म पुढे नेताना मुगल सम्राट औरंगजेब याचा काळ आला त्यावेळी धर्माची धुरा श्री गुरू तेग बहादूर साहेब यांच्याकडे आलेली होती.         कश्मीरी पंडितांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायावर तोडगा काढावा यासाठी बलिदान देण्याची तयारी श्री गुरू तेग बहादूर यांनी दाखवली व त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यामुळे मुगल सैन्याचा त्रास कमी झाला. त्यामुळे श्री गुरू तेग बहादूर यांना हिंद दी चादर म्हंटले जाते.         आपला धर्म सर्वसमावेशक अर्थात समाजातील सर्व घटकांना सामावणारा बनविण्याचे मोठे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. त्यांनी इ.स.1621 ला जन्म झालेल्या श्री गुरू तेग बहादूर यांनी 1675 साली सर्वोच्च बलिदान दिले.         त्यांच्या बलिदानानंतर त्यांचे पुत्र श्री गुरू गोविंदसिंह हे दक्षिणेत आले आणि नांदेड येथे अखेरपर्यंत निवास ...

सेवेतून भक्तीचा मार्ग * ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या*

 *विशेष लेख*.             १४ जानेवारी २०२६ भारतीय इतिहासात धर्म, मानवता, त्याग आणि बलिदान यांचे अद्वितीय प्रतीक म्हणून श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे नाव अजरामर आहे. धर्मस्वातंत्र्य, मानवमूल्ये आणि सत्यासाठी प्राणार्पण करणारे ते “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या महान शहिदीच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात २४ व २५ जानेवारी रोजी एक भव्य, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य समागम असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ५३ एकर विस्तीर्ण मैदानावर संपन्न होणार असून, देश-विदेशातून जवळपास १० लाखांहून अधिक भाविक या पवित्र समागम कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, सेवा, समानता आणि मानवतेचा महासंगम ठरणार आहे.  *नऊ समाजांचा ऐतिहासिक सहभाग*  या ऐतिहासिक शहीदी समागमाचे आयोजन नऊ समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग, “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच सीख, सिकलीकर,...

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*

इमेज
  अकोला, १४ : आदिशक्ती अभियान गावोगाव उत्कृष्टपणे  राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले. जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधीकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.  महिला सक्षमीकरणासाठी आदीशक्ती अभियान  राबविण्यात येत असून गावोगाव प्रभावी अंमलबजावणी व्हावी. ग्रामपंचायतीना तालुका ते राज्यस्तरापर्यंत लाखो रूपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी सांगितले. विशेष अभियानांतर्गत जिल्हयात ग्रामस्तरीय समित्या गावोगाव स्थापन झाल्या आहेत. ७ तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले. अभियानात गावोगाव  ग्रामसेवक यांनी wcdadhishakti.in या पोर्टलवर ग्रामपंचायतीची नोंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  यांनी केली.  शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील महिलांपर्यंत पोहचविणे, राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजीक, शैक्षणीक, आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणे जनजागृतीच्या माध्यमातून चळवळ निर्माण करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे हा...

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त श्रमदान

इमेज
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त श्रमदान ·           दोन हजारविद्यार्थ्यांचा ऐतिहासिक श्रमदानात सहभाग ·           नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ·           २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन   नांदेड ,  दि. १३ : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदान येथे भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   कार्यक्रमाच्या कालावधीत मैदानावर गुरुद्वारा प्रतिकृती (दरबार साहिब) असणार असल्याने भाविकांना चप्पल अथवा बूट न वापरता अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना चालताना कोणताही त्रास होऊ नये ,  यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत विशेष श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.   या श्रमदा...