पोस्ट्स

सामाजिक न्याय योजनांचे छायाचित्र प्रदर्शन आजपासून

  सामाजिक न्याय योजनांचे छायाचित्र प्रदर्शन आजपासून अकोला, दि. २४: जिल्हा माहिती कार्यालय व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २७ मार्च या कालावधीत सामाजिक न्याय योजनांचे प्रदर्शन उद्यापासून (२५ मार्च) उपविभागीय कार्यालय (तहसील) येथे सुरू होईल. शासनाकडून अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचा शुभारंभ दु. १२.३० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. छायाचित्र प्रदर्शनामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती छायाचित्रे, माहिती फलक व दृकश्राव्य माध्यमांच्या साहाय्याने सादर करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी शिक्षण, स्वयंरोजगार, निवास व आर्थिक सहाय्य योजनांविषयी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिक, अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थ्यांनी छायाचित्र प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. 0000000

निक्षयमित्रांचा गौरव; टीबीमुक्तीसाठी १०० दिवसांची मोहिम जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त व्हावा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  निक्षयमित्रांचा गौरव; टीबीमुक्तीसाठी १०० दिवसांची मोहिम जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त व्हावा -         जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. २४ : जिल्ह्यात २८२ ग्रा. पं. क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. आता संपूर्ण जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रयत्न व्हावेत. त्यासाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच लोकसहभाग मिळविण्याचीही गरज आहे. त्यादृष्टीने निक्षयमित्रांचे कार्य महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. क्षयरोगमुक्त भारत अभियान-१०० मोहिम, तसेच निक्षयमित्रांचा गौरव सोहळा जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ, विनोद करंजीकर, जागतिक आरोग्य संघटनेतर्फे डॉ. सम्यक खैरे यांच्यासह मान्यवर निक्षयमित्र उपस्थित होते. जिल्ह्यात निक्षयमित्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. क्षयरोगमुक्त भारत अभियानात निक्षय...

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी  राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई. दि. 24 : महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली  खारघर, नवी मुंबई येथील सिडकोच्या जागेवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र उभे राहिले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री सत्य साई संजीवनी केंद्रामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत टू-डी-इको शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांद्वारे विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये हृदयरोग तज्ञांकडून एकूण २,५०७ टू-डी-इको तपासण्या करण्यात आल्या. तसेच जन्मजात हृदयरोग (सीएचडी) उपचारासाठी राज्यभरातील आरबीएसके पथकांमार्फत ३२२६ बालकांवर श्री सत्य साई संजीवनी...

जागतिक क्षयरोग दिन : जनजागृतीतून क्षयरोगावर नियंत्रणाची दिशा

 *जागतिक क्षयरोग दिन : जनजागृतीतून क्षयरोगावर नियंत्रणाची दिशा* दरवर्षी २४ मार्च हा दिवस संपूर्ण जगभर *जागतिक क्षयरोग दिन* म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे समाजामध्ये क्षयरोग (टीबी) या गंभीर संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती निर्माण करणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी प्रयत्नांना गती देणे. २४ मार्च १८८२ रोजी जर्मन शास्त्रज्ञ Robert Koch यांनी क्षयरोगाचे जिवाणू Mycobacterium tuberculosis शोधून काढले, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सन २०२६ साठी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य आहे – “Yes, We Can End TB: Leadership Powered” (होय, आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो – नेतृत्व समर्थित). या घोषवाक्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध माध्यमांतून जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. क्षयरोगाचा इतिहास आणि उपचारातील प्रगती क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात काही महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत: * १९२१ मध्ये BCG Vaccine ही पहिली लस विकसित करण्यात आली. * १९४०-५० च्या दशकात Streptomycin आणि Isoniazid यांसारख्या प्रतिजैविकांचा शोध लागला, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी झाले. क्षयरोग...

ग्राहक हक्क संरक्षणासाठी सजगता महत्वाची : जिल्हाधिकारी वर्षा मीना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा

इमेज
      ग्राहक हक्क संरक्षणासाठी सजगता महत्वाची : जिल्हाधिकारी वर्षा मीना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा     अकोला, दि. २३ : ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येकाला ग्राहक म्हणून सुरक्षेचा,माहितीचा,म्हणणे मांडण्याचा,निवड करण्याचा अधिकार आहे. ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी सजगता महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम काटेपूर्णा सभागृहात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना निमजे यांच्यासह ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. ग्राहकांचे हक्क राखून व्यवहारातील विश्वासार्हता टिकवणे, वृद्धिंगत करणे ही सशक्त समाजाची ओळख असते. ग्राहकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्री. कुलकर्णी ...

‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण

इमेज
  ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण नियोजनभवनात सामूहिक गायन; शहिदांना अभिवादन अकोला, दि. २३ : ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनभवनात ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन झाले. थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड , मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार उपस्थित होते. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा ठरले. आजही व सदैव हे गीत युवकांसाठी स्फूर्तीदायी आहे, अशी भावना विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. ०००

वेध जनगणनेचे : विशेष प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  वेध जनगणनेचे : विशेष प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला दि २३: जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी जनगणनाविषयक तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ  आज नियोजनभवनात झाला. जनगणना कक्षाचा शुभारंभही यावेळी झाला. विविध लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अचूक जनगणना महत्वपूर्ण असते. त्यादृष्टीने अचूक नोंदी घेणे आवश्यक आहे. संकलनातून कोणतीही माहिती सुटता कामा नये, तसेच कुठल्याही नोंदीची पुनरावृत्ती होणार नाही, याचीही खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी यावेळी केले. प्रशिक्षणातून जनगणना प्रक्रियेची प्रत्येक तरतूद समजून घेऊन त्यानुसार परिपूर्ण अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने,निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे,सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले,सहायक संचालक (जनगणना) प्रवीण भगत, ऋषीकेश पाठारे, जिल्हा  प्रश...

समाजकल्याण कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

  समाजकल्याण कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन अकोला, दि. २० : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह शताब्दी वर्ष, तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त एम. जी. वाठ यांनी दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपक्रमाचा शुभारंभ झाला. उपक्रमात सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय निवासी शाळा, वसतिगृहे, कार्यालये येथे दि. २० ते २२ मार्चदरम्यान महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह व भारतीय संविधान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, व्याख्याने, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, लघुनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ०००

अंशकालीन स्त्री परिचरांचे मासिक मानधन दुपट्ट

  अंशकालीन स्त्री परिचरांचे मासिक मानधन दुपट्ट अकोला, दि. २० : आरोग्य उपकेंद्रांमध्ये स्वच्छता राखणे, गृहभेटी देणे, गरोदर मातांना गोळ्यांचे वाटप करणे, गरोदर मातांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे अशा अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचारांचे मासिक मानधन दुपट्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. यामुळे ३ हजारांचे मासिक मानधन थेट ६ हजार होणार असून स्त्री परिचरांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यासोबतच रुग्णांसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या स्त्री परिचरांच्या कार्याचा यथोचित सन्मान होणार आहे, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. दि. १ एप्रिल २०२६ पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी देखील केली जाणार आहे. 000

जनगणनाविषयक प्रशिक्षण सोमवारपासून

  जनगणनाविषयक प्रशिक्षण सोमवारपासून अकोला, दि. २० : जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी जनगणनाविषयक प्रदर्शन दि. २३ ते २५ मार्च दरम्यान नियोजनभवनात होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (२३ मार्च) सकाळी ९.३० वा. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जनगणना कक्षाचे उद्घाटनही होईल. तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी प्रशिक्षणात सहभागी होतील. ०००