पोस्ट्स

मैदानावरील रणरागिणी: अकोल्यातील महिला खेळाडूंची झेप

इमेज
  मैदानावरील रणरागिणी: अकोल्यातील महिला खेळाडूंची झेप  अकोला : महाराष्ट्राच्या मातीला खेळाचा मोठा वारसा लाभला आहे. अकोला जिल्ह्याने कला, साहित्य आणि राजकारणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अलीकडच्या काही वर्षांत अकोल्यातील मुलींनी परिस्थितीवर मात करून मैदाने गाजवायला सुरुवात केली आहे. अकोला जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात अनेक महिला खेळाडूंनी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. महिला सक्षमीकरणाअंतर्गत महिला खेळाडूंना राज्य शासनाने जिल्हा क्रीडा कार्यालय व विविध माध्यमातून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. क्रिकेट असो वा ॲथलेटिक्स, अकोल्याच्या कन्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर पदकांची लयलूट केली आहे. प्रशिक्षक संदीप ढोके, बॉक्सिंग कोच सतीशचंद्र भट, बुद्धिबळ प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल, क्रिकेट प्रशिक्षक प्रवीण मुळे यांच्यासारखे उत्तमोत्तम प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रात चांगले काम करत आहेत. राष्ट्रीय पदकविजेता यमिनी ठाकरे यांनी ॲथेलॅटिक्समधील 10 हजार मी. स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. खुशी तायडे यांनी 100 मी. व 200 मी. स्पर्धेत महाराष्ट...

सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक शिबिरे घेऊन प्राप्त अर्जांचा आठवड्यात निपटारा करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश

इमेज
  सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक शिबिरे घेऊन प्राप्त अर्जांचा आठवड्यात निपटारा करा -         जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश अकोला, दि. २० : सेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित सेवा नागरिकांना कालमर्यादेत पुरविणे आवश्यक आहे. त्यात एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये. सर्व यंत्रणांनी शिबिर स्तरावर काम करून आठवडाभरात सर्व अर्जांचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. सेवा हक्क अधिनियमानुसार प्राप्त अर्जांवर विविध यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, अधिनियमानुसार  कालमर्यादा लक्षात घेऊन अर्जांचे निराकरण व्हावे. या बाबीचा विभागप्रमुखांनी आपल्या विभागात प्रत्येक तालुक्यात आढावा घ्यावा. शिबिरांचे आयोजन करून आठवडाभरात सर्व अर्ज निकाली काढा. एकही अर्ज प्रलंबित राहता कामा न...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

  लेख मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना              मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी राबविण्यात आलेली एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे ,  त्यांच्या आर्थिक गरजा भागवणे आणि समाजात त्यांचे स्थान अधिक मजबूत करणे होय. महाराष्ट्र राज्यात महिलांचे सक्षमीकरण हे सामाजिक व आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे घटक मानले जाते. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना केवळ आर्थिक सहाय्य देणारी नसून महिलांच्या सन्मान ,  स्वाभिमान आणि आत्मविश्वासाला बळकटी देणारी एक प्रभावी सामाजिक उपक्रम आहे. आजच्या आधुनिक युगातही अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्याची संधी मिळत नाही. विशेषतः ग्रामीण भागात आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमध्ये महिलांना स्वतःच्या गरजांसाठीही इतरांवर...

जिल्ह्यात उष्णतेची लाट; हवामान विभागाचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

  जिल्ह्यात उष्णतेची लाट ;  हवामान विभागाचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन अकोला ,  दि.  17 :  नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे दि.  17  एप्रिल ते दि.  19  एप्रिल दरम्यान अकोला ,  तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी दुपारी  12  ते  4  या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे ,  बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत ,  उन्हात वाहने शक्यतो चालवू नये ,  ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे ,  लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नयेत ,  तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे ,  अशक्तपणा ,  स्थूलपणा ,  डोकेदुखी ,  सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा ,  पशुधनास तसेच प...

अक्षयतृतीयेला गावात बालविवाह होऊ नये याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन

  अक्षयतृतीयेला गावात बालविवाह होऊ नये याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन            अकोला, दि. 17 : अक्षयतृतीया दि. 19 एप्रिल रोजी असुन यादिवशी अनेक ठिकाणी विवाह सोहळे आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कुठेही बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. अक्षयतृतीयेचा मुहुर्त हा शुभमुहुर्त असुन त्यावेळी सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजीत केले जातात. विवाहाकरिता शासनाने मुलांचे वय २१ वर्ष व मुलींचे वय १८ वर्ष निश्चीत करण्यात आले आहे   यापेक्षा कमी वयाचे मुलामुलींचा विवाह झाल्यास तो विवाह बालविवाह ठरतो व असे विवाह बालविवाह प्रतिबंध अधिनीयम २००६ नुसार बेकायदेशीर ठरतात. अशा कृतीविरोधात गुन्हा नोंदविला जातो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी असुन शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी हे बालविवाह प्रतिबंधअधिकारी आहेत. गावांमध्ये ग्...

दुचाकी वाहनांकरिता नविन मालिका (MH30CD)

                       प्रादेशिक परिवहन कार्यालय,अकोला येथे अकोला जिल्हा कार्यक्षेत्रातील निवासी पत्ता असलेल्या नागरिकांसाठी दुचाकी वाहनांकरिता नविन मालिका (MH30CD) सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना दुचाकी करीता नियमित विहित शुल्क भरुन तसेच खाजगी चारचाकी व   इतर वाहन वर्गाच्या वाहनांसाठी त्या संवर्गातील वाहनांच्या विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरुन आकर्षक/पसंती क्रमांक राखीव करावयाचे आहेत, त्यांनी दिनांक 21/04/2026 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान पसंतीचे क्रमांकाच्या विहित नमुन्यातील अर्जासह आधार कार्ड, रहिवाशी पत्ता पुरावा, पॅनकार्ड या कागदपत्रांच्या साक्षंकित प्रती खुल्या लिफाफ्यात कार्यालयाच्या रोख विभागात जमा कराव्यात. सदर लिफाफ्यावर वाहन मालकाचे नाव, वाहन वर्ग, पसंती क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक लिहिलेला असावा.                        ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिबिर ३३५ जात वैधता प्रमाणपत्रे वितरीत

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिबिर ३३५ जात वैधता प्रमाणपत्रे वितरीत      अकोला दि. १७ :   जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जात वैधता प्रमाणपत्र वितरण शिबिर घेण्यात आले. त्यात ३३५ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.   प्रकरणांसोबत जोडण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रानुसार परिपुर्ण असलेल्या प्रकरणाप्रमाणे समितीने निर्णय घेऊन तातडीने प्रमाणपत्रे वितरित केली. ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने वितरीत करण्यात आले आहे. त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणे निकाली काढण्याकरीता १७ व २० एप्रिलला विशेष त्रुटी पुर्तता कार्यशाळा घेण्यात येत असून, विद्यार्थ्यांकडून आवश्यक पूर्तता करून घेतली जाईल.   तसेच ११ वी १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेऊ इच्छित असलेले विद्यार्थी पुढील प्रवेशापासुन वंचित राहु नये ही बाब लक्षात घेता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी,...

नागरिकांना जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागाची संधी; स्वगणनेची सुविधा जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 नागरिकांना जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागाची संधी; स्वगणनेची सुविधा  जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन  स्वगणना लिंक:  se.census@gov.in अकोला, दि. १७ : भारत सरकारकडून यंदा देशाची 16 वी जनगणना राबवली जात आहे. ही जनगणना विशेष आहे कारण यावेळी 'डिजिटल सेन्सस' आणि 'स्व-गणना' ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना सुविधेचा लाभ घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज केले.  स्व-गणना म्हणजे काय?  आपण स्वतः आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून जनगणनेच्या पोर्टलवर आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरू शकतो. यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाच्या आधारे लॉगिन करावे लागेल. स्व-गणना कालावधी हा दिनांक 01 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 असा आहे, ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय आहे. अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण, शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती स्व-गणनेद्वारे भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. सामान्य ...

नागरिकांना जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागाची संधी; स्वगणनेची सुविधा जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

  स्वगणना लिंक:  se.census@gov.in  नागरिकांना जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागाची संधी; स्वगणनेची सुविधा  जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन अकोला, दि. १७ : भारत सरकारकडून यंदा देशाची 16 वी जनगणना राबवली जात आहे. ही जनगणना विशेष आहे कारण यावेळी 'डिजिटल सेन्सस' आणि 'स्व-गणना' ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना सुविधेचा लाभ घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज केले.  स्व-गणना म्हणजे काय?  आपण स्वतः आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून जनगणनेच्या पोर्टलवर आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरू शकतो. यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाच्या आधारे लॉगिन करावे लागेल. स्व-गणना कालावधी हा दिनांक 01 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 असा आहे, ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय आहे. अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण, शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती स्व-गणनेद्वारे भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. सामान्य...

जननी शिशु सुरक्षा योजनेचा १७ हजार ७२६ महिलांना लाभ

      जननी शिशु सुरक्षा योजनेचा १७ हजार ७२६ महिलांना लाभ   अकोला, दि. १६ : जननी शिशु सुरक्षा योजनेत यंदा जिल्ह्यातील १७ हजार ७२६ महिलांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य यंत्रणेतर्फे देण्यात आली. जननी शिशु सुरक्षा योजनेत गर्भवती महिलांना आणि त्यांच्या नवजात बालकांना मोफत आणि सुरक्षित प्रसूती सेवा पुरविली जाते. यामध्ये मोफत वाहतूक, औषधोपचार, निदान, रक्त आणि आहार यांचा   समावेश आहे. सन २०२५-२६ मध्ये १७ हजार ७२६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे.   त्याचप्रमाणे, जननी सुरक्षा योजनेमध्ये एस.सी., एस.टी., बीपीएलधारक लाभार्थी यांना प्रसूतीनंतर सात दिवसात सातशे रुपये दिले जातात. खाजगी रुग्णालयात सिजर झाले तर २ हजार २०० रुपये दिले जातात. सन २०२५-२६ मध्ये   २ हजार ४१२    लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे.     माता-मृत्यूदर व अर्भक मृत्यूदर कमी करणे हे कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण चांगले आहे. शासकीय संस्थांमध्ये प्रसूत होणा-या मातांना औषधे, विविध तपासण्या, प्रसंगी सिझेर...