पोस्ट्स

शाळांतील जंक फूडवर नियंत्रणासाठी १ हजार ८४७ मुख्याध्यापकांची कार्यशाळा ; ‘हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट’ पदार्थांपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याचे आवाहन

इमेज
अकोला : विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शाळांमधील अन्नाची सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, अकोला आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल १ हजार ८४७ मुख्याध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. अन्न व औषध प्रशासन (FDA) अकोला कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळेत HFSS (High Fat, High Sugar, High Salt) म्हणजेच जास्त चरबी, साखर व मीठ असलेल्या अयोग्य आहाराचे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट करण्यात आले. चिप्स, कँडी, कोल्ड ड्रिंक्स, बेकरी पदार्थ आणि तळलेले पदार्थ यांचा अतिरेक लठ्ठपणा, मधुमेह तसेच एकाग्रतेशी संबंधित समस्या निर्माण करू शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या परिसरापासून ५० मीटरच्या आत कोणत्याही प्रकारचे जंक फूड व HFSS पदार्थ विक्री अथवा जाहिरात करण्यास FSSAIच्या नियमानुसार मनाई असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. ‘ईट राइट स्कूल’ उपक्रमांतर्गत शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाची स्वच्छता राखणे, विद्यार्थ्यांच्या डब्यात ताजी फळे, उ...

अकोल्यात ‘खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा युवकांशी संवाद युवकांचा मोठा प्रतिसाद

इमेज
      अकोल्यात ‘खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां चा युव कां शी संवाद युवकांचा मोठा प्रतिसाद अकोला , दि . २७ : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माय युवा भारत केंद्राच्या वतीने अकोल्यातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथे‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रम हजारो विद्यार्थांच्या उपस्थितीत झाला. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी माध्यमातून संवाद साध त तरूणांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन माय युवा भारत केंद्राने केले. या माध्यमातून युवकांना क्रीडा विकास , युवकांच्या आकांक्षा आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल , ताराताई हातवळणे , माय भारत यु वा केंद्राचे जिल्हा युवक अधिकारी अक्षय निपाणे , मदन घेघाटे, जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी , शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जगदीश साबू , शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त हरीश टावरी , प्राचार्य डॉ. राजेश चंद्रवंशी, डॉ. शैलेंद्र...

राज्य महोत्सव गणेशोत्सवाच्या स्पर्धेत अधिकाधिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा -जिल्हाधिकारी वर्षा मीना * ऑनलाईन सहभागासाठी ७ सप्टेंबर पर्यंत मुदत * ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ganeshostav.pldmka.co.in पोर्टल उपलब्ध

इमेज
           राज्य महोत्सव गणेशोत्सवाच्या स्पर्धेत अधिकाधिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा                                                        - जिल्हा धिकारी वर्षा मीना      * ऑनलाईन सहभागासाठी ७ सप्टेंबर पर्यंत मुदत * ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ganeshostav.pldmka.co.in पोर्टल उपलब्ध        अकोला , दि. २ ७   : शासनाने राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा ' राज्य महोत्सव ' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून , या अंतर्गत ' उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा ' आता तालुका , जिल्हा , राज्य , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार या भव्य स्पर्धेची...

अकोल्यात ३१ ऑगस्ट रोजी 'जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद'; उद्योजकांसाठी मोठी संधी

इमेज
  अकोल्यात ३१ ऑगस्ट रोजी ' जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद '; उद्योजकांसाठी मोठी संधी   अकोला , दि. २७ : उद्योग विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणुकीला गती देण्यासाठी आणि व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एकदिवसीय ' जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे ' आयोजन दि. ३१ ऑगस्ट रोजी हॉटेल आर. जी. एक्सक्लुझिव्ह येथे सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.     पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या परिषदेमध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदार आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार केले जाणार आहेत.    गुंतवणूक परिषदेची ठळक वैशिष्ट्ये :   * गुंतवणुकीला प्रोत्साहन: जिल्ह्यात नवीन व्यवसायांना आकर्षित करणे आणि चालना देणे. * परवानग्या सुलभ करणे: उद्योगांसाठी आवश्यक परवाने व मंजुरी वेळेत मिळवून देण्यासाठी ' मैत्री '  कायदा व सुविधा कक्षाबाबत मार्गदर्शन. * तज्ज्ञांचे मार्गदर्शन: औद्योगिक सुविधा , व्यापार आणि गुंतवण...

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळेल आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात मातृ आरोग्याला प्राधान्य; उपचारांना गती

  तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मि ळेल   आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे    उपचार मुख्य मंत्र्यांच्या मार्गदर्शना त मातृ आरोग्याला प्रा धान्य; उपचारांना गती   अकोला ,   दि.   27   :   तीव्र रक्‍तक्षय    हे माता व नवजात शिशु मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण असून, सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोजसोबत ,   अधिक प्रभावी असलेले इंजेक्‍शन फेरीक कार्बोक्सी माल्टोजही उपलब्ध करून देण्यात येत आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शना त मातृ आरोग्याला प्रा धान्य देत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे रक्तक्षयावरील उपचारांना गती देण्यात आली आहे. ग र्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून योग्य आहार व देखरेखीद्वारे माता व नवजात शिशुचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. भारतात अंदाजे ५२ टक्के गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. रक्तक्षयामुळे प्रसूतीदरम्यान/नंतर मातेच्‍या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तीव्र रक्‍तक्षय    हे माता व नवजात शिशु मृत्यूचे एक मह...

अकोला जिल्ह्यातील १०१२ गावांमधील भू-नकाशांचे डिजिटायझेशन ; भूमि अभिलेख विभागाव्दारे बाह्य यंत्रणेकडून दरपत्रके मागविली !

  अकोला जिल्ह्यातील १०१२ गावांमधील भू-नकाशांचे डिजिटायझेशन ; भूमि अभिलेख विभा गाव्दारे बाह्य यंत्रणे कडून दरपत्रके मागविली !   अकोला , दि. २५ :   अकोला जिल्ह्यातील जमिनींच्या नकाशांची अचूकता आणि स्थानिय अचूकता  वाढवण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील १ हजार १२ गावांमधील १ लाख ७८ हजार ७५९ पॉलिगॉनच्या भूसंदर्भिकरण  केलेल्या नकाशांचे पडताळणी आणि अद्ययावतीकरणाचे काम बाह्य एजन्सीमार्फत केले जाणार आहे. या नुषंगाने इच्छुक पात्र संस्थांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह आपली सीलबंद दरपत्रके ४ सप्टेंबर पर्यंत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात सादर करा वी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख भारती खंडेलवाल यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.   प्रकल्पाची पार्श्वभूमी : राज्यातील मूळ भूमापन व जमाबंदीच्या वेळी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म हाराष्ट्र राज्य) , पुणे या कार्यालयाच्या वतीने ३० सें.मी. हाय रिझोल्यूशन सॅटेलाइट इमेजचा वापर करून एकत्रिकरण योजनेनंतरचे गट नंबर नकाशे डिजिटाईज व जिओ-रेफरन्स करण्यात ...

खोट्या अफवांना व भूलथापांना बळी पडू नये — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आवाहन

 खोट्या अफवांना व भूलथापांना बळी पडू नये — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आवाहन अकोला, दि. २५   : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या खोट्या अफवा व दिशाभूल करणारी माहिती पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यक्तींकडून लाभार्थी महिलांना “ज्या महिलांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत, त्यांनी महा-आयडी कार्ड काढल्यास पैसे पुन्हा सुरू होतात”, “महा-आयडी कार्ड काढल्यामुळे KYC पूर्ण होते”, “महा-आयडी कार्ड काढले नाही तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे” तसेच “आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केल्यास लाभ तात्काळ सुरू होतो” अशा स्वरूपाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. या प्रकारच्या खोट्या भूलथापा व अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पैसे देऊ नयेत किंवा वैयक्तिक व बँकिंग संबंधित माहिती, OTP, आधार क्रमांक अथवा इतर गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. योजनेबाबतची अधिकृत माहिती व मार्गदर्शन मिळविण्यासाठी लाभार्थी महिलांनी आपल्या तालुक्यातील बाल...

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी आदिवासी विकास विभाग: अॅनिमिया निवारण कार्यक्रमासाठी ‘सीएसीआर’सोबत करार

          आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी आदिवासी विकास विभाग: अॅनिमिया निवारण कार्यक्रमासाठी ‘सीएसीआर’सोबत करार           अकोला, दि. २५ : राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांमधील अॅनिमिया (रक्तक्षय) ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागामार्फत सध्या राज्यभरात ' अॅनिमिया निवारण कार्यक्रम ' युद्धपातळीवर राबविण्यात येत असून , या मोहिमेअंतर्गत राज्यात अवघ्या दीड महिन्यात २०४ शाळांमधील ७९ , ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.             अॅनिमियामुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने ' सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स ' ( सीएसीआर) या संस्थेशी सामंजस्य करार केला असून , त्याअंतर्गत आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची एचबी पातळी तपासली जात आहे.   आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य...

अकोल्यात २७ ऑगस्टला ‘खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार युवकांशी संवाद युवकांना कल्पना, सूचना मांडण्याची संधी माय युवा भारत केंद्राचे आवाहन

  अकोल्यात २७ ऑगस्टला ‘खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार युवकांशी संवाद युवकांना कल्पना , सूचना मांडण्याची संधी माय युवा भारत केंद्राचे आवाहन अकोला , दि. २५   : राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त माय युवा भारत यांच्या वतीने ‘खेलो इंडिया संवाद – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन २७ ऑगस्ट ला शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय येथे सकाळी १० वा . करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवकांशी आभासी माध्यमातून संवाद हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असून, युवकांना क्रीडा विकास , युवकांच्या आकांक्षा आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू आणि राष्ट्रीय क्रीडा प्रतीक मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. यानिमित्त देशभरात युवकांचा सहभाग , क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘ युवा कनेक्ट’ उपक्रमाच्या माध्यमातून युवक , खेळाडू , युवा नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एका व्...

नरनाळा पर्यटनास पर्यटकांचा वाढता प्रतिसाद जंगल सफारीसह बोटिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंगमुळे पर्यटकांची संख्या वाढली

इमेज
 नरनाळा पर्यटनास पर्यटकांचा वाढता प्रतिसाद जंगल सफारीसह बोटिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंगमुळे पर्यटकांची संख्या वाढली अकोला, दि. २५ : सातपुड्याच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक नरनाळा किल्ला सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत असून, जंगल सफारी, बोटिंग, ट्रेकिंग, सुळई धबधबा, व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंग अशा विविध उपक्रमांना पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  समुद्रसपाटीपासून सुमारे ३ हजार १६१ फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ ३९२ एकर असून, किल्ला सुमारे २४ मैल (३८.५ किमी) लांब आहे. किल्ल्यात २२ तलाव, २२ दरवाजे आणि सुमारे ३६० बुरुज आहेत. महाकाली दरवाजा, जाफराबाद व तेलियागड यांसह ऐतिहासिक वास्तू पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागातर्फे पर्यटकांसाठी नरनाळा किल्ला जंगल सफारी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत जंगल सफारीची सुविधा असून, ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत एक हजार ६२३ जिप्सीतून ९ हजार १२ पर्यटकांनी सफारी केली. तर ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत दोन हजार ७६२ जिप्...