पोस्ट्स

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

इमेज
 नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण                                                                                                               मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा या...

अ. ज. विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेत प्रवेशाबाबत आवाहन

      अ. ज. विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेत प्रवेशाबाबत आवाहन   अकोला, दि. १३ : अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 लीमध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूकांसाठी विनामुल्य प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे, तसेच नजिकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत मिळतील. इतर कोणत्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता प्रकल्प कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश अर्ज प्राप्त करुन या कार्यालयास सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असुन अंतिम तारीख दि. 25 मे आहे. सदर योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिका-याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी. या योजनेचा लाभ घेउु इच्छिणा-या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लाखच्या आत अ...

वेध विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिका-यांकडून पूर्वतयारीचा आढावा

इमेज
  वेध विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिका-यांकडून पूर्वतयारीचा आढावा अकोला, दि. १२ : निवडणूक आयोगातर्फे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने समन्वय अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, न. प. प्रशासन अधिकारी विश्वनाथ वडजे, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, श्रीनिधी वाजपेयी आदी उपस्थित होते. अचूक, अद्ययावत व पारदर्शक मतदार यादी तयार करणे ही लोकशाही प्रक्रियेची अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यामुळे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षण, नियोजन आदी बाबींच्या अनुषंगाने मनुष्यबळ व इतर यंत्रणा सुसज्ज असावी. समन्वय अधिका-यांनी संनियंत्रण व समन्वयनाची जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. मयत, दुबार, कायम स्थलांतरितांची नावे वगळणे, मॅपिंग, उपलब्ध मनुष्यबळ, प्रशिक्षक, प्रशिक्षण, ‘बुक अ कॉल’ उपक्रम, पुनरीक्षण फॉर्म, अपेक्षित कामे आदी विविध बाबींविषयी यावेळी चर्चा झाली. श्री. ...

माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद अकोला जिल्ह्यात ५३४ पैकी ५३४ गावांचा सहभाग

 माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद अकोला जिल्ह्यात ५३४ पैकी ५३४ गावांचा सहभाग  ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम व निरोगी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानास अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण ५३४ गावांपैकी  ५३४ गावांनी या अभियानात सहभाग नोंदवून आरोग्यदायी गाव उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. या अभियानांतर्गत गावपातळीवर स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, लसीकरण, माता-बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग प्रतिबंध, कुपोषण निर्मूलन, तंबाखूमुक्त परिसर, नियमित आरोग्य तपासणी आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामपंचायत, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागामुळे अभियानाला गती मिळाली आहे. गावांमध्ये आरोग्य विषयक स्पर्धा, स्वच्छता मोहीम, रक्तदाब व मधुमेह तपासणी, पोषण जनजागृती, शाळांमधील आरोग्य शिक्षण तसेच पर्यावरण संवर्धन उपक्रमही आयोजित करण्यात येत आहेत. “निरोगी गाव – समृद्ध गाव” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे ...

विशेष लेख: भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा

      विशेष लेख:   भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा -           ब्रिजेश सिंह ,  प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय   भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच ,  १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिले आणि एक प्रतिज्ञा केली सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची. तो क्षण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पहिला मोठा जागर ;  आपल्या सभ्यतेच्या स्वाभिमानाच्या सार्वजनिक पुनर्प्राप्तीचा क्षण होता.   आणि आता ,  ११ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित तेजात सहभाग घेतला ,  तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने प्रज्वलित झाल्यासारखी वाटते. विशेष महापूजा ,  कुंभाभिषेक ,  ध्वजारोहण आणि लाखो भाविकांची उपस्थिती — हे सर्व मिळून भग्नावस्थेतून पुनर्निर्माण...

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

  ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ अकोला, दि. २५ : _भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतु हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. सदरील हस्तलिखितांचे ज्ञानभांडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे या दृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे._ भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला दिनांक १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे ...

एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
    एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   • भूजल पातळी वाढविण्यासाठी कामे करण्याचे निर्देश           मुंबई ,  दि. ८ : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे ,  असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.          मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मृद व जलसंधारण विभागाचा  आढावा घेतला. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ,  मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर ,  मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी ,  मुख्यमंत्र्यांचे जल -विषयक सल्लागार श्रीराम वेदिरे ,  विशेष कार्य अधिकारी प्रिया खान ,  मृद व जलसंधारण आयुक्त अंजली रमेश ,  महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे ...

संशोधन अधिकारी अनिल देव यांचा निवृत्तीनिमित्त गौरव

इमेज
  अकोला, दि. 8 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहायक संशोधन अधिकारी अनिल रामदास देव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. कार्यालयातर्फे त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव सोहळा आयोजिण्यात आला. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. एन. साळुंके अध्यक्षस्थानी होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (मुलींची) प्राचार्य एस. आर. ठोकरे उपस्थित होते. श्री. देव यांनी कार्यालयीन कामकाजात घेतलेले परिश्रम व विविध उपक्रम राबविण्यात दिलेले योगदान यांचा श्री. साळुंके यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला. श्री. ठोकरे यांनीही त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री. देव यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सांख्यिकी सहायक एन. टी. राखोंडे, मुख्य लिपीक एम. यू. बुटे, किरणताई घोगरे, मनोहर बदरखे यांनीही मनोगत व्यक्त केले. पंकज नागे यांनी सूत्रसंचालन केले. बी. बी. सुलताने यांनी आभार मानले. एन. टी. राखोंडे, एम. यू. बुटे, कु. किरण घोगरे, मनोहर बदरखे, भिमराव मोहाडे व संकेत मान...

महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस •जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता * अकोल्यातील नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन

    महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता * अकोल्यातील नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन मुंबई दि. ६ : महाराष्ट्राच्या विकास प्रवासात विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या (जायका) या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता वैद्यकीय क्षेत्रातही सहकार्याची नवी दिशा निर्माण होणार आहे. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्यास उत्सुक असून   ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता घेण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यापूर्वी आसाम आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये यशस्वी प्रकल्प राबविल्यानंतर, जायका आता महाराष्ट्रातही   ¬ ‘मेडिकल केअर सिस्टम ’ मजबूत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. विशेषतः राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत समन्वय साधून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रस्तावित भागीदारीत खालील महत्त्वाच्या बाबींवर लक्ष कें...

जिल्ह्यात यंदा तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी

  जिल्ह्यात यंदा तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी अकोला, दि. ६ : अकोला जिल्ह्यात २०२६ या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला. त्यानुसार रक्षाबंधन (शुक्रवार, २८ ऑगस्ट), ज्येष्ठागौरी पूजन (शुक्रवार, १८ सप्टेंबर) व लक्ष्मीपूजन (दुसरा दिवस- सोमवार, ९ नोव्हेंबर) या तीन दिवशी स्थानिक सुट्टी राहील. हा आदेश जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि बँका यांना लागू होणार नाही. ०००