पोस्ट्स

इच्छुकांनी लाभ घ्यावा; जिल्हाधिका-यांचे आवाहन कृत्रिम वाळू युनिटसाठी पहिल्या 50 पात्र अर्जदारांना विविध सवलती

  इच्छुकांनी लाभ घ्यावा; जिल्हाधिका-यांचे आवाहन कृत्रिम वाळू युनिटसाठी पहिल्या 50 पात्र अर्जदारांना विविध सवलती अकोला, दि. 11 :   शासनाने एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) धोरण व त्याची मानक कार्यप्रणाली (एसओपी) निश्चीत केली आहे. त्यानुसार कृत्रिम वाळू युनिट स्थापण्यासाठी इच्छूक असलेल्या जिल्ह्यातील पहिल्या 50 पात्र अर्जदारांना विविध शासकीय सवलती देण्यात येणार आहेत. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. अशा आहेत सवलती : औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज अनुदान, वीज दर अनुदान, वीज शुल्क सवलत, मुद्रांक शुल्क माफी, रॉयल्टीमध्ये 400रू. प्रति ब्रास सवलत देऊन (200रुय प्रति ब्रास दराची तरतुद), शासकीय, निमशासकीय बांधकामांमध्ये सध्या एम-सॅन्डचा 20 टक्के वापर बंधनकारक, टप्प्याटप्प्याने हे प्रमाण 100 टक्के इतके वाढणार. कोणाला लाभ घेता येईल : मंजूर खाणपट्टा असलेले व्यक्ती, संस्था जर 100 टक्के एम-सॅण्ड उत्पादन करणार असतील, तर त्यांनाही धोरणांतर्गत लाभ घेता येईल. सदर धोरण अस्तित्वात येण्यापुर्वी ज्यांनी 100 टक्के एम-सॅण्ड उत्पादन" सुरु केले आहे त्यांनाही हेत...

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान

  अकोला, दि. ११ :  राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या संबंधित संस्था व शाळांनी सदर शासन निर्णयानुसार परिपूर्ण प्रस्ताव दि. १४ नोव्हेंबर जिल्हा नियोजन समिती, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला या कार्यालयास मिळतील या बेताने सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र नसतांना प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये, असे कळविण्यात आले आहे. ०००

जन्माची नोंदणी वेळेत व्हावी; विलंब झाल्यास प्राधिकृत दंडाधिका-यांद्वारेच व्हावी - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  अकोला, दि. 11 : जन्माची नोंद वेळेत होणे आवश्यक असते. एक वर्षाहून अधिक उशिराने जन्माची नोंदणी ठोस पुराव्यासह, तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मान्यतेखेरीज होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. पीसीपीएनडीटी कायदा, एड्स प्रतिबंध कार्यक्रम, तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा, कुष्ठरोग निवारण कार्यक्रम, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 कायदा आदी विविध विषयांचा आढावा बैठकांद्वारे जिल्हाधिका-यांनी घेतला. जन्म, मृत्यूच्या नोंदणी अधिनियमानुसारच व्हाव्यात. नियमाची कदापि पायमल्ली होता कामा नये, असे निर्देश त्यांनी दिले. सन 2030 पर्यंत कुष्ठरोगमुक्त भारत असे उद्दिष्ट निश्चित असून, त्यादृष्टीने संशयित रूग्णांचा मोहिम स्तरावर शोध घेऊन त्यांना योग्य उपचार मिळवून द्यावेत. कुष्ठरो...

विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
    जिल्हास्तरीय एकता पदयात्रेला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वपूर्ण -         जिल्हाधिकारी वर्षा मीना     अकोला, दि. ११ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त     ‘सरदार@१५०’ उपक्रमात जिल्हा प्रशासन, केंद्रीय क्रीडा मंत्रालय, मेरा युवा भारत केंद्र व विविध संघटनांच्या सहभागाने जिल्हास्तरीय पदयात्रा आज शहरात काढण्यात आली. विद्यार्थी व युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिलाभगिनी आदी उस्फूर्तपणे पदयात्रेत सहभागी झाले होते.   वसंत देसाई स्टेडियम येथे जिल्हास्तरीय वर्षा मीना यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून पदयात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी जयंत मसने, सिद्धार्थ शर्मा, रमेश अलकरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, मेरा भारत युवा केंद्राचे महेशसिंग शेखावत आदी उपस्थित होते. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन  जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.   ...

जिल्हास्तरीय एकता पदयात्रेला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
    अकोला, दि. ११ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त   ‘सरदार@१५०’ उपक्रमात जिल्हा प्रशासन, केंद्रीय क्रीडा मंत्रालय, मेरा युवा भारत केंद्र व विविध संघटनांच्या सहभागाने जिल्हास्तरीय पदयात्रा आज शहरात काढण्यात आली. विद्यार्थी व युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिलाभगिनी आदी उस्फूर्तपणे पदयात्रेत सहभागी झाले होते. वसंत देसाई स्टेडियम येथे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून पदयात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी जयंत मसने, सिद्धार्थ शर्मा, रमेश अलकरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, मेरा भारत युवा केंद्राचे महेशसिंग शेखावत आदी उपस्थित होते. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन  जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी यावेळी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती मीना व विविध मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर जिल्हाधिका-यांच्या हस्ते मशाल प्रज्ज्वलि...

तरुणांनो, ड्रोन पायलट व्हा; मोफत मिळणार प्रशिक्षण

 तरुणांनो, ड्रोन पायलट व्हा; मोफत मिळणार प्रशिक्षण अकोला दि. 11 : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना रोजगाराची नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत ड्रोन पायलटसाठीचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमातून तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण रोजगार क्षम बनवणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना दहा दिवसाचे डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिले जाईल. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत दूरसंवेदन पायलट परवाना मिळणार आहे. या परवान्यामुळे कृषी, सर्वेक्षण, बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन, छायाचित्रण आणि चित्रफीत निर्मिती अशा विविध क्षेत्रात नोकरी व व्यवसायाचे दरवाजे खुले होतील. प्रशिक्षणात एकूण आठ प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये मध्यम व लघु वर्गातील ड्रोन प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, कृषी व आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा वापर, नकाशांकन व सर्वेक्षण, ड्रोन देखभाल-दुरुस्ती आणि ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक

  स्थानिक स्वराज्य संस्था  निवडणूक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक अकोला, दि. १०: जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.   महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, वर्ष ११ अंक 32, गुरुवार, ऑक्टोबर 9, 2025/ 17, शके 1947 यानुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू ट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, ), संकेतस्थळे आदींचा समावेश होतो. निवडणुकीच्या अनुषंगाने ...

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

इमेज
      निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार अकोला, दि. 10 : शासनाच्या विविध सुविधा आणि सेवानिवृत्तधारकांना पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी डिसेंबरपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी त्यांना नाहक त्रास होत होता. परंतु आता हे प्रमाणपत्र पोस्टमनकडून घरपोच किंवा पोस्ट कार्यालयातून मिळवण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करून दिली आहे.   ‘नो टेन्शन फॉर पेन्शन’ हे ब्रीदवाक्य घेऊन डाक विभागाच्या वतीने हे प्रमाणपत्र घरपोच पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हयातीचे प्रमाणपत्र आता पोस्टातून आणि घरपोच सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक तसेच महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी आदींना पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी डिसेंबरपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सदर करावे लागते. याशिवाय विविध शासकीय सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुद्धा या प्रमाणपत्राची गरज भासते. हयातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ज्या बँकेतून पेन्शन मिळते त्या बँकेचे नाव, आधार कार्ड क्रमांक आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर या तीन बाबी महत्वाच्या आहेत. या ती...

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

इमेज
        कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह अकोला, दि. १० : कृषी विभागाने नवे बोधचिन्ह व घोषवाक्य निश्चित केले असून, यापुढील सर्व उपक्रमांत त्याचा वापर केला जाणार आहे.   सन १८८१ च्या फेमीन कमीशन ने शिफारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीत कृषी विभागा चे वापरले जात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य हे 38 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले आहे . आधुनिक शेतीच्या दृष्टीकोनात व विभागाच्या कार्यपद्धतीत झालेल्या मूलभूत बदलांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीचे बोधचिन्ह रचना , दृश्य व संवादात्मक ओळख कालबाह्य ठरू लागले. त्यामुळे खुली स्पर्धा घेण्यात आली . त्यातून भुसावळचे वी रेंद्र भाईदास पाटील यांनी सुचवलेले बोधचिन्ह , परभणी येथील सिद्धी भारतराव देसाई यांचे घोषवाक्य निवडण्यात आले.   त्यानुसार समितीद्वारे विचारविनिमय होऊन कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य निश्चित करण्यात आले. कृषी विभागाचे नवे कृषी कल्याण कर्तव्यम बोधचिन्ह व शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी घोषवाक्य यापुढे कृषी विभागाच्या सर्व उपक्रमामध्ये  वापरण्यात येणार ...

शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी महसूल प्रशासनाचे आवाहन

    शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी महसूल प्रशासनाचे आवाहन अकोला, दि. 10 : ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही ॲग्रीस्टॅक नोंदणी केली नसेल, त्यांनी ती तत्काळ करून घेण्याचे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी निखील खेमनार यांनी केले आहे.     कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दि. १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार सर्व शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेली रक्कम तात्काळ जमा करण्यात येत आहे. अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना ई- केवायसी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला गाव नमूना क्र. ७/१२ उतारा व आधारपत्रासह आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली अॅग्रीस्टॅक नोंदणी करुन शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे अकोला जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ०००