पोस्ट्स

इराणमधील तणावपूर्ण स्थिती ; भारताने जारी केली ट्रॅव्हल ॲडव्हायजरी

  इराणमधील तणावपूर्ण स्थिती  ; भारताने जारी केली ट्रॅव्हल ॲडव्हायजरी   नवी दिल्ली ,  दि.६  :  इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या  संघर्षामुळे  परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सध्या इराणमध्ये असलेल्या आणि तिकडे प्रवासास जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिकृत  प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायजरी) जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ,  इराणमधील सद्यस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा कोणताही बिगर-जरुरी प्रवास टाळावा. जे भारतीय नागरिक कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी सध्या इराणमध्ये वास्तव्य करत आहेत ,  त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ज्या भागात हिंसक आंदोलने किंवा मोठी गर्दी जमली आहे ,  अशा ठिकाणांपासून भारतीयांनी लांब राहावे ,  असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. भारत सरकारने इराणमधील भारतीयांना स्थानिक बातम्या आणि घडामोडींवर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तसेच ,  तेहरानम...

नरनाळा महोत्सवामुळे पर्यटनाला मिळणार चालना

इमेज
    नरनाळा महोत्सवामुळे पर्यटनाला मिळणार चालना सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. या महोत्सवामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास वनपर्यटनप्रेमी, कलावंत, अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.       अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या उत्तरेला शहानूर या छोट्याश्या गावाला लागून सातपुड्याच्या डोंगरात असलेला नरनाळा किल्ला आहे. या ऐतिहासिक किल्ल्याकडे पर्यंटकांचे लक्ष वेधण्यासाठी महोत्सव आयोजनाची संकल्पना पुढे आली. अकोला येथील कलावंत प्रदीप गुरुखुद्दे यांनी ही मागणी लावून धरली. स्थानिक कलावंत, पर्यटनप्रेमी कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन दि. २६ जानेवारी ते २८ जानेवारी २००८ दरम्यान नरनाळा महोत्सवाचे पहिले आयोजन करण्यात आले. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा झाला. पुढे हा महोत्सव काही कारणांमुळे होऊ शकला नाही. मात्र, आता तो पुन्हा उत्साहाने साजरा करण्यात येणार असून, ऐतिहासिक वारसा व समृद्ध वन्यजीवन लाभलेला हा किल्ल...

सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती

    सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती अकोला, दि.  5 : सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळाच्या (एसएसबी) परीक्षेची तयारी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राकडून करून घेतली जाते. नवे प्रशिक्षण सत्र लवकरच सुरू होत असून, इच्छूकांनी अकोला येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 13 जानेवारीला सकाळी 10 वा. उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.   नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात 19 जानेवारी ते 3 एप्रिल या कालावधीत प्रशिक्षण सत्र क्र. 66 होईल. इच्छूक युवक व युवतींनी सैनिक कल्याण विभागाच्या महासैनिक ( www.mahasainik.maharashtra.gov.in ) संकेतस्थळावर नोंद करून किंवा 9756073306 वर संबंधित प्रवेशपत्र व परिशिष्टांची चेकलिस्ट यांचे अवलोकन करून त्याची प्रत भरून मुलाखतीला येताना सोबत आणावी. उमेदवार कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी परीक्षा उत्तीर्ण व एसएसबी मुलाखतीस पात्र झालेला असावा किंवा एनसीसीचे सी प्रमाणपत्र ...

हरभ-यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

                 हरभ-यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन अकोला, दि. 5 : सद्य:स्थितीत हरभऱ्याचे पीक बहुतांश ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. या दरम्यान या पिकावर घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटेअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयातर्फे सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असुन या किडींची मादी पतंग पानावर , कोवळया शेंड्यांवर , कळयांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरितद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांदूरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोडया मोठ्या झालेल्या अळया संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांदयाच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलो-यावर आल्यावर हया अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळया प्रामुख्याने फुले व घाटयांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळया घाटयाला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः ३०-४० घाटयांचे...

दिव्यांग प्रेरणा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

दिव्यांग प्रेरणा पुरस्कारासाठी अर्ज मागविले अकोला, दि. 5 :  जिल्हास्तरीय दिव्यांग प्रेरणा पुरस्कारासाठी दि. 14 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्ती कार्यकर्ता, तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणारी संस्था यांना स्वतंत्रपणे जिल्हास्तरीय पुरस्कार दिला जाईल. पात्र व्यक्ती व संस्थांनी दि. 14 जानेवारीस सायं. 5 पर्यंत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस वसाहतीच्या बाजूला, अकोला येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले आहे. ०००  

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाद्वारे जनजागृती

अकोला : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग तसेच इतर संबंधित संस्था व संघटनांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच) यांच्या मार्गदर्शनानुसार या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, वाहनचालक व शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्रे, नेत्र तपासणी शिबीर तसेच विविध प्रचारात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

अकोला, दि. 2 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतीसाठी दि. १९ जानेवारी ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६६ आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.. जिल्हातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला येथे दि. १३ जानेवारी २०२६ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग (डीएसडब्लू), पुणे यांची वेबसाईट  www.mahasainik.maharashtra. gov.in  या संकेत स्थळावर सर्च करून त्यामधील एसएसबी- ६६ कोर्सेसाठी किंवा व्हॉटस्अप क्र. ९१५६०७३३०६ वर संबंधित प्रवेश पत्र व परिशिष्टांची चेक लिस्ट यांचे अवलोकन करून त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून (किंवा प्रिंट कार्यालयाकडून घ्यावी) ते पूर्ण भरून सोबत घेऊन य...

जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीची बैठक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिग्नल प्रणालीत सुधारणा करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  अकोला,दि २: शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता अद्ययावत सिग्नल प्रणाली कार्यान्वित करणे, सिग्नलच्या योग्य वेळा निर्धारित करणे तसेच अनावश्यक गतिरोधक काढून टाकण्याचे निर्देश रस्ते सुरक्षा समिती बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत रस्ते सुरक्षा समितीची बैठक महसूल सभागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक मनोज बहुरे,मनपा शहर अभियंता नीला वंजारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रतिनिधी उपस्थित होते.   या बैठकीत वाहतूक व पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.अवैध पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. अधिकृत वाहनतळांची पाहणी करावी आणि त्याच ठिकाणी पार्किंग होईल, अशी व्यवस्था करावी. शिवणी विमानतळासमोरील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले.

जयंती दिनानिमित्त विशेष लेख सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

  विशेष   लेख  : जयंती दिनानिमित्त विशेष लेख सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक   भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत प्रेरणादायी आहे. स्त्री शिक्षण ,  सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्ये यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या ,  तर त्या एक थोर समाजसुधारक ,  कवयित्री आणि परिवर्तनाच्या सर्वकालीन प्रतिक  होत्या आणि  आहेत.   ज्या काळात स्त्रीने शिकणे पाप मानले जात होते ,  त्या काळात त्यांनी शिक्षणाचा द ी प प्रज्वलित करुन सामाजिक अज्ञानाच्या अंधाराला आव्हान दिले. स्वत:च्या आयुष्याला आकार देतानाच भारतीय स्त्री- शिक्षणाच्या पायाही त्यांनी घातला.   सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे शेतकरी होते. बालवयातच त्यांचा विवाह महात्मा  जो तिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला.  जो तिरावांच्या परिवर्तनवादी झंझावाताला गती देणाऱ्या आदर्श पत्नी म्हणून त...

खुल्या प्रवर्गातील युवकांना २१ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण ‘अमृत’चा उपक्रम

  खुल्या प्रवर्गातील युवकांना २१ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण ‘अमृत’चा उपक्रम अकोला, दि. १ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे (अमृत) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने खुल्या प्रवर्गातील युवकांना २१ दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण शिबिराद्वारे दिले जाणार आहे.   खुल्या गटामधील ब्राह्मण, बनिया, वत्स, कम्मा, कायस्थ, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, मारवाडी, येलमार, त्यागी, गुजराथी, सेनगुनथर, सिंधी, नायडू, राजपूत, कोमटी या अमृत लक्षित गटातील ४० युवक व युवती उमेदवारांचे विनामूल्य २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. ७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान होईल. त्यात उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय गुण व संपदा, सुसंवाद कला, सरकारी कर्ज आणि अनुदान योजना, बँकेची कार्यप्रणाली, उद्योग उभारणी व उद्योग व्यवस्थापन, अभिप्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम, विक्री कला, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल, यशस्वी उद्योजकाचे मनोगत, उद्योगांना भेटी, विविध क्षेत्रातील संधी, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाची कर्ज प्रकरणे आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्...