पोस्ट्स

तयारी नरनाळा महोत्सवाची; दरपत्रके मागवली

तयारी नरनाळा महोत्सवाची; दरपत्रके मागवली अकोला, दि. 26 : जिल्हा प्रशासनातर्फे अकोट वन्यजीव विभागाच्या सहकार्याने दि. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान    नरनाळा निसर्गपर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाची पूर्वतयारी सुरू असून, विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सेवा पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात आली आहेत.   त्यानुसार विविध कार्यक्रमांसाठी 3 दिवस सलग स्टेज, 40 बाय 60 फूट (एलईडी स्टेज), 500 व्यक्तींसाठी बसण्याची व्यवस्था असलेला मंडप, अनुषंगिक साहित्यासह प्रदर्शनासाठी दालने, प्रकाशयोजना, ध्वनीक्षेपण यंत्रणा, जनरेटर, निवासी तंबू (लहान व मोठे), संपूर्ण महोत्सवादरम्यान स्वच्छतेची व्यवस्था करणे आदी कामे होणे आवश्यक आहे. इच्छूक पुरवठादारांनी दि. 6 जानेवारी 2026 पर्यंत पाकिटबंद दरपत्रक उपविभागीय अधिकारी कार्यालय, अकोट येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. हे दरपत्रक दि. 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, अकोट येथे उघडण्यात येतील. हे दस्तऐवज आवश्यक दरपत्रक सादर करताना दोन लिफाफे असावेत. लिफाफा क्र. 1 मध्ये बयाणा रक्कम रु. २५ हजार रू. चा उपवि...

विभागातील निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांचे अकोल्यात स्नेहसंमेलन

    विभागातील निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांचे अकोल्यात स्नेहसंमेलन   अकोला, दि. 26 : सामाजिक न्याय विभागातर्फे शासकीय निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांचे विभागीय स्नेहसंमेलन, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम दि. ३० व ३१ डिसेंबर रोजी अकोला येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. अमरावती विभागातून पाचही जिल्ह्यातून सुमारे ८५० विद्यार्थी त्यात सहभागी होतील.                                                                        समाजकल्याण विभागाच्या नियंत्रणातील पाचही जिल्ह्यांतील शासकीय निवासी शाळा सहभागी होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धांमध्ये सांघिक व वैयक्तिक मैदानी खेळांचा समावेश राहील. त्याबाबत स...

रब्बी हंगाम ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपूर्वी नोंदणी करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  रब्बी हंगाम ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपूर्वी नोंदणी करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन अकोला : रब्बी हंगाम ई पीक पाहणीची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारी 2026पूर्वी आपल्या पिकांची नोंदणी फोनद्वारे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा निमा यांनी केले आहे. आतापर्यंत अत्यल्प नोंदणी  ई- पीक पाहणीत शेतक-यांनी स्वत: 7/12 वर पीक पेरा अँड्रॉइड फोनव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेवटची तारीख 24 जानेवारी आहे. अकोला जिल्ह्यात एकूण 3 लक्ष 81 हजार 714 ओनर प्लॉटची संख्या असून, त्यापैकी 12 हजार 753 ओनर प्लॉटची नोंदणी झाली आहे. हे प्रमाण 3.34 टक्के इतकेच आहे.  अकोला जिल्ह्यात डिजिटल क्रॉपसर्व्हेअंतर्गत ई पीक पाहणीची नोंदणी 15 हजार 776.43 हे.क्षेत्रावर रब्बी पिकाची नोंद झाली असून, उर्वरित क्षेत्रावर नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी अॅपद्वारे पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीक पाहणीची नोंदणी ‘ई पीक पाहणी व्हर्जन 4.0.5’ या मोबाईल अॅपद्वारे होते. ते प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. ई पीक पाहणी अॅपद्वारे शेत बांधावर जावुन पिकांची नोंदणी करू...

शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपूर्वी नोंदणी करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  अकोला : रब्बी हंगाम ई पीक पाहणीची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारी 2026पूर्वी आपल्या पिकांची नोंदणी फोनद्वारे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा निमा यांनी केले आहे. आतापर्यंत अत्यल्प नोंदणी  ई- पीक पाहणीत शेतक-यांनी स्वत: 7/12 वर पीक पेरा अँड्रॉइड फोनव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेवटची तारीख 24 जानेवारी आहे. अकोला जिल्ह्यात एकूण 3 लक्ष 81 हजार 714 ओनर प्लॉटची संख्या असून, त्यापैकी 12 हजार 753 ओनर प्लॉटची नोंदणी झाली आहे. हे प्रमाण 3.34 टक्के इतकेच आहे.  अकोला जिल्ह्यात डिजिटल क्रॉपसर्व्हेअंतर्गत ई पीक पाहणीची नोंदणी 15 हजार 776.43 हे.क्षेत्रावर रब्बी पिकाची नोंद झाली असून, उर्वरित क्षेत्रावर नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी अॅपद्वारे पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीक पाहणीची नोंदणी ‘ई पीक पाहणी व्हर्जन 4.0.5’ या मोबाईल अॅपद्वारे होते. ते प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. ई पीक पाहणी अॅपद्वारे शेत बांधावर जावुन पिकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी.  अडचण आल्यास स्थानिक कर्मचा-यांची मदत घ्यावी त्यासाठी संबंधित शे...

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किरकोळ शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन

इमेज
   जिल्ह्यात जिल्हाधिकारी वर्षा मिना व उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्या नियोजनात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विविध आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून  DEIC, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे रविवारी किरकोळ शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. असलम तसेच सोलर फ्लेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. कृष्णकुमार केसान यांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करण्यात आल्या. शिबिरामध्ये जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 47 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी 40 रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान करण्यात आले असून, या सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व DEIC कार्यक्रमांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असले...

सौर ऊर्जा अक्षय ऊर्जा काळाची गरज : जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त कार्यशाळा अकोला, दि २४: जिल्ह्यात सौर ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज असून पर्यावरण संरक्षणासोबतच शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. त्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह निमित्त नियोजन भवन येथे ऊर्जा बचत काळाची गरज ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व व सध्याची शासनाची धोरणे या विषयावर आधारित कार्यशाळेत बोलत होत्या. यावेळी महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापक विजय काळे,ऊर्जा व्यवस्थापन परीक्षक अच्युत मेहंदळे व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर १५० किलोवॅट पारेषण संलग्न सौर विद्युत निर्मिती प्रकल्प सुरू झाल्यामुळे वीजबिलात बचत होत असून ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भरता साधण्यासाठी हा महत्वाचा टप्पा ठरत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सौर व हरित ऊर्जेचा स्वीकार करून हरित आणि उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे. ऊर्जा परीक्षक श्री. मेहेंदळे म्हणाले की, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि ऊर्जा गरजा लक्षात घेता पारंपरिक ...

रब्बी हंगाम २०२५ पीकस्पर्धा स्पर्धेत पाच पिकांचा समावेश, जिल्ह्यातील शेतक-यांना सहभागाचे आवाहन

    रब्बी हंगाम २०२५ पी कस्पर्धा स्पर्धेत पाच पिकांचा समावेश, जिल्ह्यातील शेतक-यांना सहभागाचे आवाहन         अकोला, दि. 23 : कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी अन्नधान्य , कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा जाहीर केली असून, अधिकाधिक शेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.   राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छा मनोबलामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल , तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल , हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी , गहू , हरभ...

सुशासनासाठी जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा आवश्यक - उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर

इमेज
  अकोला, दि. 23 : जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवेतून सुशासन साकार होते. त्यामुळे  केवळ उपक्रमापुरतेच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा देऊन सुशासन निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी, असे प्रतिपादन निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर यांनी आज येथे केले.     सुशासन आठवड्यानिमित्त कार्यशाळा नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. भूमी अभिलेख अधिक्षक भारती खंडेलवाल, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  उपजिल्हाधिकारी श्री. परंडेकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसंदर्भात नागरिकांना माहिती व्हावी  या उद्देशाने  ‘प्रशासन गावाच्या दिशेने’ हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यात सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे.  हे लक्षात घेऊन कामे पारदर्शक व जलदरीतीने व्हावीत. प्रत्येक विभागाने आपले सरकार, सीपी ग्राम पोर्टल व पीजी पोर्टलवर आलेल्या नागरिकांच्या तक्रारीचे निवारण तत्काळ करण्याचे आवाहन श्री. परंडेकर यांनी केले, सुशासन सप्ताहामध्ये "प्रशासन गावाच्या...

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

  स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६   मुंबई ,  दि.२३ : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२५ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) ,  तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी ,  २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक १ जानेवारी ,  २०२५ ते ३१ डिसेंबर ,  २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.   या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव ,  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,  रवींद्र नाट्यमंदिर इमारत्त ,  दुसरा मजला ,  सयानी मार्ग ,  प्रभादेवी ,  मुंबई ४०० ०२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्...

आचारसंहिता शस्त्र वापरावर निर्बंध

  आचारसंहिता शस्त्र वापरावर निर्बंध अकोला, दि. 22 ; अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता पालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात लागू असून, या कालावधीत शस्त्र वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबतचा आदेश जारी केला. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 नुसार महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातील शस्त्र परवानाधारकाला शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. बँक, खेळाडू, सुरक्षारक्षक (खनिकर्म विभाग, बँक, कॅश व्हॅन) पीक संरक्षणार्थ आदींना वगळण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडनीय कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे. ०००