पोस्ट्स

'पॉश' कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

इमेज
  पॉश'  कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई, १० : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अर्थात 'पॉश ' च्या अधिक परिणामकारक अंमलबजावणी करावी, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. या बैठकीस कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड,  उपसचिव रोशनी कदम, उपसचिव दीपक पोकळे, यशस्वी ग्रुपचे विश्वेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. कामगार मंत्री म्हणाले, या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  पथदर्शी व्यवस्था उभी करावी, अशी व्यवस्था असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, तिथे 'अंतर्गत समिती'  स्थापन करणे बंधनकारक आहे. खाजगी आस्थापनांमध्ये या समित्यांचे कामकाज योग्य रीतीने चालते की नाही,  याची तपासणी करावी. या अंतर्गत समितीच्या अंतर्गत परीक्षणाची व्यवस्था उभारावी.  त्यासाठी  काही अभ्यासक्रम  तयार करत येतो का याबाबत पडताळणी...

पेरणीपूर्वी बीज उगवण तपासणे आवश्यक

 

अकोला पीक विमा प्रकरणाचा तपासणी अहवाल सादर करा - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

इमेज
  अकोला पीक विमा प्रकरणाचा तपासणी अहवाल सादर करा  - कृ षी मंत्री दत्तात्रय भरणे   मुंबई , दि. १० : अकोला जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ आणि खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीक विमा भरपाई संदर्भातील तक्रारींचा जिल्हाधिकारी यांचा अहवाल शासनाला सादर करावा , असे निर्देश देत या प्रकरणासंदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकींचे इतिवृत्त मागवून चौकशी करण्याचे आदेश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले.                            खरीप व रब्बी हंगाम २०२३ – २४ व खरीप हंगाम २०२४ – २५मधील एचडीएफसी इरगो इन्श्युरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणेबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृ षी मंत्री भरणे बोलत होते. बैठकीला कामगार मंत्री आकाश फुंडकर , कृ षी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल , आमदार हरीष पिंपळे , कृ षी विभागाचे सचिव परिमल सिंह , ( व्ही.सी.व्दारे ) कृ षी आयुक्त सुरज मांढरे , कृषि संचालक विनयकुमार आवटे , अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना ,...

मंत्रिमंडळ निर्णय (एकूण - ४)

  मंत्रिमंडळ निर्णय (एकूण - ४)   सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त...

बाळापुरात प्रतिबंधित पान मसाला जप्त ‘एफडीए’ची कारवाई

  बाळापुरात प्रतिबंधित पान मसाला जप्त ‘एफडीए’ची कारवाई अकोला, दि. ९ : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी बाळापूर येथील कारवाईत १५ हजार रू. किमतीचा प्रतिबंधित पान मसाला जप्त केला. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनात प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात मोहिम सुरू आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात गुटखा, पान मसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण व विक्री विरोघात मोहिम राबवली जात आहे. बाळापूर येथे पथकाने पप्पू पान बहार सेंटरवर छापा मारून १५ हजार रू. किमतीचा पान मसाला जप्त केला, तसेच आस्थापनामालकाविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात आला. यापुढेही प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी जोरदार मोहिम राबविणार असल्याचे सहायक आयुक्त दे. गो. वीर यांनी सांगितले. ०००

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत बैठक प्रलंबित कामे मार्गी लावा, प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत बैठक प्रलंबित कामे मार्गी लावा, प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी  -         जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि ९ : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे भविष्यात जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन, शेतीसाठी उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी तसेच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित जमीन संपादन, मान्यता, प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. नदीजोड प्रकल्पाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, मृद व जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, पाटबंधारे विभागाचे चिन्मय वाकोडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन, जलसंपदा तसेच इतर संबंधित विभागांची भूमिका म...

राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान

इमेज
  राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान   नवी दिल्ली, दि. 9 : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष ‘रक्षा अलंकरण’ सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.   शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती श्यामबाला जंजाळ आणि आई श्रीमती शाहू प्रभाकर जंजाळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.   या सोहळ्यास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच अन्य केंद्रीय मंत्री, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.   6 जुलै 2024 रोजी काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान शिपाई प्रवीण जंजाळ आपल्या तुकडीस...

किलकारी आरोग्य योजना माता व बालकांसाठी विनामूल्य आरोग्य माहिती सेवा

इमेज
  किलकारी आरोग्य योजना माता व बालकांसाठी विनामूल्य आरोग्य माहिती सेवा अकोला, दि. ९ : किलकारी मोबाईल आरोग्य योजना ही गर्भवती महिला आणि नवजात बाळांच्या पालकांसाठी केंद्र सरकारची मोबाईल-आधारित आरोग्य माहिती सेवा आहे. या योजनेत नोंदणीकृत महिलांना त्यांच्या मोबाईलवर आठवड्यातून एकदा स्वयंचलित व्हॉइस कॉल येतो. त्या कॉलमध्ये गर्भधारणा, प्रसूती, बाळाची काळजी, लसीकरण, स्तनपान, पोषण आणि कुटुंब नियोजन याबाबत मार्गदर्शन दिले जाते. ही योजना गर्भवती महिला आणि १ वर्षापर्यंतच्या बाळांच्या पालकांसाठी आहे.   स्थानिक भाषेत (मराठीसह) ऑडिओ संदेश दिले जातात.गर्भधारणेच्या टप्प्यानुसार आणि बाळाच्या वयानुसार माहिती दिली जाते. मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य जागरूकता वाढवणे हा उद्देश आहे महिलेची नोंदणी सरकारी आरोग्य यंत्रणेत (एएनएम, आशा, आरसीएच पोर्टल इ.) झाल्यानंतर तिचा मोबाईल क्रमांक प्रणालीमध्ये नोंदवला जातो. त्यानंतर नियमित आरोग्यविषयक कॉल येऊ लागतात. ही सेवा लाभार्थ्यांसाठी मोफत आहे. किलकारी योजनेत नाव नोंदवायचे असल्यास आशा सेविका किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संप...

अकोला तालुक्यातील घरगणना पूर्ण

इमेज
  अकोला तालुक्यातील घरगणना पूर्ण जिल्हाधिका-यांच्या हस्ते तहसीलदारांचा गौरव अकोला, दि. ९ : अकोला जिल्ह्यातून अकोला तालुक्याने सर्वात प्रथम घरगणनेचे काम पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते तहसीलदार कुणाल झाल्टे यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. प्रधान जनगणना अधिकारी जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या अधिनस्त जनगणना २०२७ चे पहिल्या टप्प्यातील एकुण ३७६ गटांचे घरगणनेचे कार्य जिल्ह्यात सर्वात प्रथम अकोला तालुक्यात पूर्ण झाले. विहित वेळेआधी काम पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी तहसीलदार कुणाल झाल्टे व त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करून त्यांना जनगणनेच्या पुढील कार्याकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजेंद्र मालठाणे व जनगणना विभागातील कर्मचारी उपस्थित होते. ०००

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची मोहिम ३ लक्ष १४ हजार रू. चा मुद्देमाल जप्त

  राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची मोहिम ३ लक्ष १४ हजार रू. चा मुद्देमाल जप्त   राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची मोहिम ३ लक्ष १४ हजार रू. चा मुद्देमाल जप्त अकोला, दि. ८ : राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने जिल्ह्यात हातभट्ट्यांविरूद्ध मोहिम राबवून ३ लक्ष   १४ हजार रू. चा मुद्देमाल जप्त केला. मेथेनॉल मिश्रित विषारी मद्य प्राशनामुळे सुमारे २० नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना नुकतीच पुण्यात घडली.   अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक सीमा झावरे यांच्या नेतृत्वात २९ मे ते दि.७ जून दरम्यान मोहिम राबविण्यात आली. कार्यक्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली वेगवेगळी पथके तयार करून अनधिकृत हातभट्टी विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या पथकांच्या नेतृत्वात खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली. एकूण गुन्हे प्रकरणांत ३ लक्ष १४ हजार ७२० रू. चा मुद्देमाल जप्त झाला. आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ ई आणि कलम ६५ एफ अंर्तगत कारवाई करण्यात आली. हातभट्टीसाठी वापरण्यात येत असलेला सडवा ...