पोस्ट्स

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

 शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही मुंबई, दि. 15 : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.  मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी म...

शीख बांधवांची अखंड लंगर सेवा…

 शीख बांधवांची अखंड लंगर सेवा…        निस्वार्थ सेवा आणि एकाच देवाची उपासना सामाजिक सेवेत समुदायाचा सहभाग या सुत्रांनी समाज उभारणी करून श्री गुरू नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना केली. धर्म पुढे नेताना मुगल सम्राट औरंगजेब याचा काळ आला त्यावेळी धर्माची धुरा श्री गुरू तेग बहादूर साहेब यांच्याकडे आलेली होती.         कश्मीरी पंडितांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायावर तोडगा काढावा यासाठी बलिदान देण्याची तयारी श्री गुरू तेग बहादूर यांनी दाखवली व त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यामुळे मुगल सैन्याचा त्रास कमी झाला. त्यामुळे श्री गुरू तेग बहादूर यांना हिंद दी चादर म्हंटले जाते.         आपला धर्म सर्वसमावेशक अर्थात समाजातील सर्व घटकांना सामावणारा बनविण्याचे मोठे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. त्यांनी इ.स.1621 ला जन्म झालेल्या श्री गुरू तेग बहादूर यांनी 1675 साली सर्वोच्च बलिदान दिले.         त्यांच्या बलिदानानंतर त्यांचे पुत्र श्री गुरू गोविंदसिंह हे दक्षिणेत आले आणि नांदेड येथे अखेरपर्यंत निवास ...

सेवेतून भक्तीचा मार्ग * ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या*

 *विशेष लेख*.             १४ जानेवारी २०२६ भारतीय इतिहासात धर्म, मानवता, त्याग आणि बलिदान यांचे अद्वितीय प्रतीक म्हणून श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे नाव अजरामर आहे. धर्मस्वातंत्र्य, मानवमूल्ये आणि सत्यासाठी प्राणार्पण करणारे ते “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या महान शहिदीच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात २४ व २५ जानेवारी रोजी एक भव्य, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य समागम असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ५३ एकर विस्तीर्ण मैदानावर संपन्न होणार असून, देश-विदेशातून जवळपास १० लाखांहून अधिक भाविक या पवित्र समागम कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, सेवा, समानता आणि मानवतेचा महासंगम ठरणार आहे.  *नऊ समाजांचा ऐतिहासिक सहभाग*  या ऐतिहासिक शहीदी समागमाचे आयोजन नऊ समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग, “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच सीख, सिकलीकर,...

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*

इमेज
  अकोला, १४ : आदिशक्ती अभियान गावोगाव उत्कृष्टपणे  राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले. जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधीकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.  महिला सक्षमीकरणासाठी आदीशक्ती अभियान  राबविण्यात येत असून गावोगाव प्रभावी अंमलबजावणी व्हावी. ग्रामपंचायतीना तालुका ते राज्यस्तरापर्यंत लाखो रूपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी सांगितले. विशेष अभियानांतर्गत जिल्हयात ग्रामस्तरीय समित्या गावोगाव स्थापन झाल्या आहेत. ७ तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले. अभियानात गावोगाव  ग्रामसेवक यांनी wcdadhishakti.in या पोर्टलवर ग्रामपंचायतीची नोंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  यांनी केली.  शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकातील महिलांपर्यंत पोहचविणे, राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजीक, शैक्षणीक, आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणे जनजागृतीच्या माध्यमातून चळवळ निर्माण करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे हा...

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त श्रमदान

इमेज
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त श्रमदान ·           दोन हजारविद्यार्थ्यांचा ऐतिहासिक श्रमदानात सहभाग ·           नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ·           २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन   नांदेड ,  दि. १३ : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदान येथे भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   कार्यक्रमाच्या कालावधीत मैदानावर गुरुद्वारा प्रतिकृती (दरबार साहिब) असणार असल्याने भाविकांना चप्पल अथवा बूट न वापरता अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना चालताना कोणताही त्रास होऊ नये ,  यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत विशेष श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.   या श्रमदा...

कलम 37 (1) (3) लागू

    कलम 37 (1) (3) लागू अकोला, दि. 13 : आगामी सण व निवडणूक कालावधी लक्षात घेता जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी वर्षा मीना यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील.     या कालावधीत मोर्चे, आंदोलने काढण्यास, तसेच पाच किंवा पाचहून जास्त इसमांना एकत्रित येण्यास मनाई आहे. स्फोटके, दाहक पदार्थ वाहून नेण्यास किंवा शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. समाजात तेढ निर्माण करणारे कोणतेही कृत्य करण्यासही मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.   ०००

श्री गुरू तेग बहादूर यांचे 350 वे शहिदी समागम वर्ष नांदेडमध्ये होणार भव्य सोहळा

श्री गुरू तेग बहादूर यांचे   350   वे शहिदी समागम वर्ष नांदेडमध्ये होणार भव्य सोहळा अकोला , दि. 13 :   ' हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर '   यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे.    श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी कार्य करताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य ,   संयम ,   मानवता ,   करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षा निमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने नागपूर व नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन झाले.  आता जानेवारीमध्ये त २४ व २५ जानेवारीला नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमधील भव्य कार्यक्रम यशस्वी करावा -मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी

    ‘ हिंद दी चादर ’  श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त  नांदेडमधील भव्य कार्यक्रम यशस्वी करावा -मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी   नांदेड ,  दि. 7:-  ‘ हिंद दी चादर ’  श्री गुरु तेग बहादूर यांच्या  350  व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून ,  त्यांच्या सुरक्षा ,  वाहतूक ,  वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री  यांचे प्रधान सचिव डॉ.  श्रीकर परदेशी यांनी दिल्या. नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज  मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी ,   राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते....

मतदानासाठी सुट्टी देण्याबाबत आस्थापनांना सूचना

  अकोला, दि. १२ : लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. त्यानुसार दि. १५ जानेवारी रोजी महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी आस्थापना व उद्योगांनी आपल्या कर्मचा-यांना भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश सहायक कामगार आयुक्त रा. रा. काळे यांनी दिले आहेत. काही संस्था/आस्थापना इ. त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किया सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. असे निदर्शनास आल्यास आस्थापनांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. हा आदेश खाजगी कंपन्या, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिग सेंटर, मॉल्सर, रिटेलर्स आदी सर्वांना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थ...

पीक विमा योजना : पिंपरी खु. येथे तूर पीक कापणी प्रयोग

इमेज
  अकोला, दि. 12 : अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळातील पिंपरी खु. येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तूर पिकाचा पीक कापणी प्रयोग शुक्रवारी यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या पीक कापणी प्रयोगावेळी नाबार्ड विभागाचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. श्रीराम वाघमारे सर, सौ. अस्मिता आवारे (तलाठी), भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. अमोल ठोसरे व श्री. क्षितिज वाकोडे, तसेच संबंधित शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक कापणी प्रयोग हा अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक घटक आहे. हा प्रयोग प्रत्यक्ष शेतावर शास्त्रीय व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येतो. यामध्ये निवडलेल्या क्षेत्रातून पिकाचे प्रत्यक्ष उत्पादन मोजले जाते व प्रति हेक्टर सरासरी उत्पादन निश्चित केले जाते. या प्रयोगातून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारे संबंधित क्षेत्रातील उत्पादनातील घट, हवामानातील प्रतिकूल परिणाम व इतर नैसर्गिक कारणांमुळे झालेल्या पिक नुकसानीचा अचूक अंदाज घेण्यात येतो. याच आधारे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विमा नुकसान भरपाईची गणना केली जाते. सदर पीक का...