पोस्ट्स

लेख तेजस्विनी भवन: महिला सक्षमीकरणाचा नवा 'अकोला पॅटर्न'

इमेज
    लेख तेजस्विनी भवन: महिला सक्षमीकरणाचा नवा 'अकोला पॅटर्न'   अकोला जिल्ह्यातील डाबकी रोड, उगलेवाडी येथे साकारलेले ‘तेजस्विनी भवन’ हे केवळ एक इमारत नसून महिलांच्या आर्थिक क्रांतीचे आणि जिद्दीचे प्रतीक आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सुवर्णमहोत्सवी वर्षात उभे राहिलेले हे भवन राज्यातील अशा प्रकारचे पहिलेच पाऊल आहे.   महिला जेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते, तेव्हा केवळ तिचे कुटुंबच नाही, तर संपूर्ण समाजाचा विकास होतो. हेच ब्रीदवाक्य समोर ठेवून अकोला जिल्ह्यातील लोकसंचालित साधन केंद्र (LRC) आणि बचत गटांतील महिलांनी आपल्या परिश्रमातून आणि योगदानातून 'तेजस्विनी भवन' ही वास्तू उभी केली आहे. ही इमारत केवळ सिमेंट-काँक्रीटचे बांधकाम नसून महाराष्ट्रातील महिलांच्या स्वयंपूर्णतेचे एक आदर्श उदाहरण आहे. महाराष्ट्रात 'माविम' अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात, परंतु साधन केंद्राने स्वतःच्या बळावर इमारत उभारण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. डाबकी रस्त्यावरील उगलेवाडी येथे हे भवन साकारण्यात आले असून, यासाठी बचत गटातील महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला...

जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा उष्माघात दक्षतेबाबत जनजागृती करा; यंत्रणा सुसज्ज ठेवा जिल्हाधिका-यांचे निर्देश

  जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा उष्माघात दक्षतेबाबत जनजागृती करा; यंत्रणा सुसज्ज ठेवा जिल्हाधिका-यांचे निर्देश अकोला, दि. १५ : जिल्ह्यात वाढते तापमान, उष्मालाटेचा इशारा लक्षात घेता दक्षतेबाबत प्रभावी जनजागृती करावी, तसेच सर्व रूग्णालये, यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आरती फुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.संजय सोनूने आदी यावेळी उपस्थित होते.   प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्रा. आ. केंद्र येथे 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओआरएस व औषधसाठा पुरेसा ठेवावा. त्याचप्रमाणे, नागरिकांमध्ये उष्माघातापासून दक्षता बाळगण्याबाबत प्रभावी जनजागृती करावी. ग्रामीण भागात दवंडी देऊन जनजागृती करावी महापालिका क्षेत्रात कचरा घंटा...

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १५ : जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर  आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करून या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. २०१५-१६ दरम्यान देशातील इतर राज्यांत जपानी मेंदूज्वरावरील लसीकरण मोहीम सुरू झाली होती. याच दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले. मात्र, महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली नव्हती. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली. त्यांनी त्यावेळी केंद्र सरकाराला विशेष विनंती केली आणि जपानी मेंदूज्वर आजारांवरील लसीकरण मोहीमेला राज्...

विशेष लेख मातृवंदना योजना

इमेज
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना .                                                                                                अनिल आलुरकर                                                                  ...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती

  मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार अकोला,दि.१४ : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे  उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे.        गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नावीन्य पूर्ण रु...

सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी संविधान हा देशाच्या सुदृढ लोकशाहीचा पाया जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे प्रतिपादन

  सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी  संविधान हा देशाच्या सुदृढ लोकशाहीचा पाया जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे प्रतिपादन अकोला, दि. १४ : भारतीय संविधान हे देशाच्या एकता व अखंडतेचा पाया असून सक्षम व सुदृढ लोकशाही निर्माण करण्याचे कार्य भारतीय संविधानाने केले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने ८ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह  कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मारुती वाठ, जिल्हा जात पडताळणी उपआयुक्त अमोल यावलीकर, व्याख्यात्या राजेश्वरी सोळंके यांच्यासह सामाजिक न्याय विभाग पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी आदी उपस्थित होते. श्रीमती मीना म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यांनी देशाला संपूर्ण जगाला आदर्शवत अशी राज्यघटना दिली. त्यांचे लेखनकार्य व विचार संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे. यावेळी इतर ...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 'कृषी अवजार बँक' : बचत गटांनी २५ एप्रिलपूर्वी अर्ज करावा आत्मा प्रकल्प संचालकांचे आवाहन

 > नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 'कृषी अवजार बँक' : बचत गटांनी २५ एप्रिलपूर्वी अर्ज करावा आत्मा प्रकल्प संचालकांचे आवाहन अकोला, दि. 13 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कृषी व्यवसायात भरारी घेण्याकरिता अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेतून गावपातळीवर 'कृषी अवजार बँक' स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्यांच्या ६० टक्क्यांपर्यंत, कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रकल्प गावातील उमेद, माविम पुरस्कृत व इतरमहिला बचत गट तसेच महिलांचे गाव संघ पात्र राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० सदस्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. एका गावात एकाच महिला गटाला लाभ देता येईल. त्यामुळे जर एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. प्रकल्पाचे मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्या...

रक्तदान शिबिराला युवकांचा प्रतिसाद

  रक्तदान शिबिराला युवकांचा प्रतिसाद अकोला, दि. १३ : जिल्हा समाजकल्याण कार्यालयातर्फे सामाजिक समता सप्ताहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी अनेक युवकांनी उपस्थित राहून रक्तदान करून सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय दिला. जिल्हयामध्ये सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,अकोला यांच्यावतीने समाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे निमित्ताने जिल्हयात आरोग्य अधिकारी   डॉ. अक्षता प्रधान, डॉ. मयुरेश वैराळे , शिल्पा तायडे , मयुरी गायगोले यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालय व महाविद्यालय,अकोला येथे रक्तदान शिबीरामध्ये इच्छुक व्यक्तीनी रक्तदान करुन कार्यक्रम साजरा करण्यात आला.   त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,निमवाडी अकोला येथे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभाग यांचे विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबददल महिला मेळावा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणुन श्रीमती. सपना लांडे मॅडम व्याख्याता (समाज सेवीका) यांनी महिला विषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले व शाहु,फुले,आंबेडकर व सावित्रीब...

सामाजिक समता सप्ताहात विविध कार्यक्रमांची रेलचेल

        सामाजिक समता सप्ताहात विविध कार्यक्रमांची रेलचेल अकोला दिनांक 13  : सामाजिक समता सप्ताहात वक्तृत्व स्पर्धा, भीमगीत गायन स्पर्धा व संविधान जागर आदी कार्यक्रम घेण्यात आले.                 सर्वाना समान न्याय,समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यभरात दि.08 एप्रिल 2026 पासुन सलग सात दिवस अभिनव पध्दतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले आहे.             याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणुन आज दिनांक 10 एप्रिल 2026 ते दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी अकोला जिल्हयामध्ये सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,अकोला व श्री.शिवाजी महाविद्यालय,अकोला यांच्या सयुक्त विद्यमाने समाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे निमित्ताने श्री.शिवाजी कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,अकोला येथे भव्य विदर्भस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा  व भीमगीत गायन स्पर्धा...

वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू नागरी सुविधा केंद्रामार्फत राज्यभर नोंदणी; कोणतेही शुल्क नाही

    वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू नागरी सुविधा केंद्रामार्फत राज्यभर नोंदणी; कोणतेही शुल्क नाही   अकोला, दि. १३ : राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक   योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आलेला आहे. वनहक्क अधिनियम , २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वनपट्टा धारक शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नागरी सुविधा केंद्र येथे भेट देऊन आवश्यक   कागदपत्रांसह शेतकरी आयडी नोंदणी करून घ्यावी. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शेतकरी नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना , अनुदान , पीकविमा , नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर ...