पोस्ट्स

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन

  महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन अकोला, दि १८: शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात  १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. दि २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिली आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो ( Save Soil, Save Water, Secure ...

‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या 'जलसंधारण सप्ताहात' रील्स स्पर्धेचे आयोजन

  ‘रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे  -जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या 'जलसंधारण सप्ताहात' रील्स स्पर्धेचे आयोजन अकोला, दि १८: माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने दि. १५ ते २१ ऑगस्ट २०२६  हा कालावधी 'जलसंधारण सप्ताह' म्हणून राबविण्यात येणार आहे. या दरम्यान मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे‘ आयोजन करण्यात आले आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी 'रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत युवक - युवतींनी उत्स्फूर्त  सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. यानिमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येण...

अण्णासाहेब पाटील महामंडळाला ३०० कोटींचा निधी प्राप्त ; प्रलंबित व्याज परतावा वितरणाला गती

                    अण्णासाहेब पाटील महामंडळाला ३०० कोटींचा निधी प्राप्त ;                           प्रलंबित व्याज परतावा वितर णाला गती             अकोला, दि. १७ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला ₹ ३०० कोटींचा निधी नुकताच महामंडळाच्या खात्यात जमा झाला असून , प्रलंबित व्याज परतावा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे , अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंग देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.        व्याज परतावा योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून एकूण ₹ ७५० कोटी मंजूर करण्यात आला होते.   पहिला हप्ता २० मे २०२६ रोजी ₹ १५० कोटी प्राप्त झाला होता आणि योजनेतील लाभार्थ्यांना तो वितरित करण्यात आला. त्यानं...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (टप्पा-२) ; शेतकरी, बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध घटकांतर्गत अनुदानाची मोठी संधी ; · प्रस्ताव सादर करण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन

  नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (टप्पा-२) शेतकरी , बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यां साठी विविध घटकांतर्गत अनुदानाची मोठी संधी ·          प्रस्ताव सादर करण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन अकोला , दि. १७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत जिल्ह्यातील कृषी व ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी शेतकरी , महिला स्वयंसहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुषार जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या , आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट , महिला बचत गट , गाव संघ , प्रभाग संघ , लोकसंचालित साधन केंद्र आणि पेसा क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायती आदी पात्र असून कृषी व्यवसाय विकासासाठी संस्थांना ६० लाखांपर्यंत अनुदा न दिले जाते. गोदाम उभारणी , बीज प्रक्रिया केंद्र , प्राथमिक प्रक्रिया केंद्र , मूल्यवर्धन , पॅकिंग व साठवणूक केंद्र आदी उपक्रमांचा यात समावेश ...

जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीत सहभागी होण्याची संधी ; इच्छुकांकडून अर्ज आमंत्रित

  जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीत सहभागी होण्याची संधी ; ·          इच्छुकांकडून अर्ज आमंत्रित अकोला ,दि. १७ :   प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम , १९६० च्या कलम ४ च्या अन्वये महाराष्ट्र शासनाने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती स्थापन केली आहे. प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणारे पशुसंवर्धन विभागातील अधिकारी तसेच प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी सदस्यांनी मिळून ही समिती स्थापन केल्या जाते. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. या समितीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले परिपूर्ण अर्ज योग्य त्या कागदपत्रासह (आधार कार्ड व बायोडाटा) १ सप्टेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या नियम ३(२) ( i) आणि ( ii) अन्वये इतर ११ अशासकीय सद स्यांची नियुक्ती दर तीन वर्षांनी करण्यात येते. तसेच अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा राहतो. अश...

थेंब थेंब जपूया, गावे जलसमृद्ध करूया! (लेख)

  थेंब थेंब जपूया, गावे जलसमृद्ध करूया! पर्जन्यमानाची अनिश्चितता पाहता पाण्याची बचत ही काळाची गरज झाली आहे.  पाऊस अनियमित पडणे, कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस होणे आणि पडलेले पाणी वाहून जाणे हीदेखील मोठी आव्हाने आहेत. अशा काळात पाण्याची जपणूक हा दिनचर्येचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे. पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे आणि भूजलपातळी वाढवणे आवश्यक आहे.  जलसंधारण ही  केवळ शासकीय यंत्रणेची नव्हे तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पाण्याच्या योग्य वापरातून बचत साधता येते. त्याचप्रमाणे, गावातील नाले, ओढे, तलाव आणि जलस्रोत जपणे आवश्यक आहे.   मृदा व पाण्याची बचत सर्वांनी अंगीकारली पाहिजे. पाणी बचतीची सुरूवात स्वत:पासून, घरापासून केली तर परिसर, गाव, शहर अशी ही कृती व्यापक होत जाते.   याच उद्देशाने जनजागृतीसाठी मृद व जलसंधारण विभागातर्फे महावॉकेथॉन आणि रीळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महावॉकेथॉन हा केवळ चालण्याचा कार्यक्रम नाही. तो जलजागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे. या माध्यमातून मृदा आणि पाणी  वाचविण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात ...

अनुसूचित जाती कल्याण समितीचा दि. १९ व २० रोजी दौरा

 अनुसूचित जाती कल्याण समितीचा दि. १९ व २० रोजी दौरा अकोला, दि. 19 :महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती दि. १९ व २० ऑगस्ट रोजी अकोला येथे येत आहे. या दौ-यात विविध कार्यालयांतील भरती व अनुषंगिक बाबींचा, तसेच योजनांचा आढावा, संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा आणि विकासकामांची पाहणी आदी कार्यक्रम होतील.                                                                        समितीत आमदार नारायण कुचे हे समितीप्रमुख असून, आमदार सर्वश्री भीमराव केराम, तान्हाजी मुटकुळे, डॉ. अशोक माने, श्याम खोडे, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, संजय बनसोडे, सचिन पाटील, गजानन लवटे, संजय मेश्राम, अमित गोरखे, जगन्नाथ अभ्यंकर आदींचा समावेश आहे. समितीसह अवर सचिव जयश्री म्हात्रे, कक्ष अधिकारी राहूल लिंगरवार, समितीप्रमुखांचे स्वीय सहायक रणजीत गमरे उपस्थित असतील. समितीचा दौरा : दि. १९ ऑगस्टला सकाळी ९ ते १० वा. दरम्यान शासकीय विश...

पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्याकडून म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा प्रकल्पाची पाहणी

इमेज
    पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्याकडून   म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा प्रकल्पाची पाहणी अकोला, दि. 15 :   राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाला भेट देऊन तेथील विविध उपक्रमांची पाहणी केली. संस्थेचे सचिव प्रा. विवेक बिडवई, संघाचे प्रांत सरकार्यवाह अजय नवघरे यांच्यासह अधिकारी व विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. फुंडकर यांनी सप्तगौ परिक्रमा मंदिराला भेट देऊन गौपूजन केले. त्यानंतर त्यांनी गोशाळेची पाहणी केली. तेथील धन्वंतरीभवन औषधे निर्मिती केंद्र आणि खत निर्मिती केंद्रालाही त्यांनी भेट दिली. त्याठिकाणी सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली. 00000

शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

इमेज
  शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण अकोला, दि. १५ :   जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नूतनीकरण झालेल्या कामांचे लोकार्पण राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभानंतर केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव व विविध कार्यक्रम झाले. त्यात विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामांचेही लोकार्पण झाले. आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे ५० लक्ष रू. निधीतून नूतनीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली. त्यात विश्रामगृह येथील आवार भिंत, प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात आले आहे. कक्ष व परिसर सुशोभीकरण करण्यात आले आहे. ०००  

केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी उपलब्धी पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

इमेज
  केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी उपलब्धी पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर अकोला, दि. १५ : केंद्रीय विद्यालयासारखी महत्वपूर्ण शैक्षणिक संस्था अकोल्यात सुरू झाली आहे. अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात ही मोठी उपलब्धी आहे.   त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी व उज्ज्वल भविष्याची हमी मिळाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय दिवशी केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, केंद्रीय विद्यालय समितीचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर यंत्रणांचे अधिकारी   आदी उपस्थित होते.   पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आयआयटी, केंद्रीय विद्यालयासारख्या महत्वपूर्ण शैक्षणिक संस्थांचा विस्तार होत आहे. अकोल्यात केंद्रीय व...