नदी नाला काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
अकोला,दि.31 (जिमाका)- भारतीय
मोसम विभाग नागपूर यांचे संदेशानुसार 2 ऑगष्ट पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस , विज पडणे,
अतिवृष्टी होण्याची
शक्यता वर्तविली आहे. तसेच दि.29
जुलैपासुन पुर्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच इतरही नदी नाल्यांना
पुर आला आहे. त्यानुसार नदी, नाला
काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून
क्षेत्रिय यंत्रणांनी
आपल्या कार्यक्षेत्राच्या मुख्यालयी हजर
रहावे असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा